शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
3
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
4
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
5
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
6
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
7
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
8
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
9
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
10
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
11
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
12
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
13
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
14
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
15
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
16
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
17
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
18
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
19
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
20
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...

वसुली आघाडी सरकारकडून खिसे भरण्याचे काम : जयकुमार गोरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:49 IST

दहिवडी : ‘आपली मंत्रिपदाची खुर्ची कधीही जाईल या भीतीने वसुली आघाडी सरकार फक्त खिसे भरायचे काम करत आहे. तर ...

दहिवडी : ‘आपली मंत्रिपदाची खुर्ची कधीही जाईल या भीतीने वसुली आघाडी सरकार फक्त खिसे भरायचे काम करत आहे. तर शेतकरी, मराठा आणि ओबीसी समाज आरक्षणाच्या प्रश्नापासून पळ काढण्यासाठीच अधिवेशन गुंडाळण्याचा कारनामा या सरकारने केला आहे,’ असा घणाघात आमदार जयकुमार गोरे यांनी केला.

मुंबई येथे विधानभवन परिसरात आघाडी शासनाच्या विरोधात भाजप आणि मित्रपक्षांच्या वतीने आयोजित अभिरुप विधानसभा सभागृहात ते बोलत होते.

आमदार गोरे म्हणाले, ‘आघाडी शासनाने सगळे नियम धाब्यावर बसवून अधिवेशनात जनतेच्या, शेतकऱ्यांच्या, आरक्षणाच्या प्रश्नावर बोलण्यास विरोधी पक्षांना बंदी घातली आहे. पावसाळी अधिवेशन कशा प्रकारे गुंडाळता येईल, मराठा, ओबीसी आरक्षण प्रश्न कसे प्रलंबित रहातील, विरोधी पक्षाची कशी अडवणूक करता येईल हे सर्व ठरविण्यासाठी सत्ताधाऱ्यांना अधिवेशनाच्या अगोदर पाच तास कॅबिनेटची बैठक घ्यावी लागली. सभागृह सुरु होताच ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न अंगलट येताच मंत्रिपदासाठी ओबीसी समाजाचा उपयोग करून घेणाऱ्या छगन भुजबळ यांची ढाल करून सरकारने पळवाट शोधली. भुजबळांनीही सरकारचा चेहरा वाचवायचे काम केले आहे.

आघाडी सरकारने शेतकऱ्यांना दिलेले कर्जमाफीचे आश्वासन पाळले नाही. शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करायचे सोडाच उलट शेतीपंपांचे वीजजोड तोडण्याचे काम केले. आता तर गावेच्या गावे अंधारात असून गावांचा पाणीपुरवठाही ठप्प झाला आहे. या सरकारला अजिबात दयामाया नाही. निर्ढावलेले आघाडी सरकार सर्वसामान्य जनता आणि शेतकऱ्यांच्या विरोधातील आहे. मराठा आणि ओबीसी आरक्षणाबाबतीत केंद्र सरकारकडे बोट दाखवून राज्यसरकार जबाबदारी झटकत आहे.

भास्कर जाधव यांनी सभागृहात न घडलेल्या खोट्या गोष्टी सांगून भाजपाच्या १२ आमदारांचे निलंबन करुन अध्यक्षपदाच्या खुर्चीचा अपमान केला आहे. प्रत्येक मंत्र्याला आपली खुर्ची कधीही जाईल याची भीती वाटत आहे. खुर्चीत असेपर्यंत प्रत्येकजण स्वतःचा खिसा भरायचे काम करत आहे. राज्य चालविण्याची क्षमताच या सरकारमध्ये नाही, असा टोलाही आमदार जयकुमार गोरे यांनी लगावला.