शहरं
Join us  
Trending Stories
1
Video:"...आता मला काय विचारताय तुम्ही"; एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळेंवर का संतापले?
2
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
3
कॅनरा बँकेतील सोन्यावर मारला डल्ला, ५३.२६ कोटींची चोरी; शाखा मॅनेजरच निघाला मुख्य सूत्रधार
4
नोकरीचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीची विक्री करून परस्पर लावले लग्न, पित्याने घेतला गळफास
5
विठ्ठल दर्शनाची आस अधुरीच राहिली; वारीतच २ वारकऱ्यांवर काळाचा घाला,  हरिनामाचा गजर शेवटचा ठरला
6
कधीही फसणार नाही! ‘या’ स्ट्रॅटजीनं कराल म्युच्युअल फंडात गुंतवणूक; बनू शकेल मोठा पैसा, अनेकांना माहितच नाही
7
शाळेत जायला रस्ताच नाही, कोणत्या 'भाषेत' सांगितल्यावर ही समस्या सुटेल? फांदीचा आधार घेत पार करतात नदी...
8
Share Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; ट्रेंट, इटर्नलमध्ये तेजी; एनटीपीसी, Reliance घसरले
9
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
10
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
11
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
12
"आता सगळं ठीक झालंय...", परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'मध्ये कमबॅक; नक्की काय घडलं होतं?
13
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
14
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
15
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
16
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
17
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
18
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
19
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
20
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले

वसुली आघाडी सरकारकडून खिसे भरण्याचे काम : जयकुमार गोरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:49 IST

दहिवडी : ‘आपली मंत्रिपदाची खुर्ची कधीही जाईल या भीतीने वसुली आघाडी सरकार फक्त खिसे भरायचे काम करत आहे. तर ...

दहिवडी : ‘आपली मंत्रिपदाची खुर्ची कधीही जाईल या भीतीने वसुली आघाडी सरकार फक्त खिसे भरायचे काम करत आहे. तर शेतकरी, मराठा आणि ओबीसी समाज आरक्षणाच्या प्रश्नापासून पळ काढण्यासाठीच अधिवेशन गुंडाळण्याचा कारनामा या सरकारने केला आहे,’ असा घणाघात आमदार जयकुमार गोरे यांनी केला.

मुंबई येथे विधानभवन परिसरात आघाडी शासनाच्या विरोधात भाजप आणि मित्रपक्षांच्या वतीने आयोजित अभिरुप विधानसभा सभागृहात ते बोलत होते.

आमदार गोरे म्हणाले, ‘आघाडी शासनाने सगळे नियम धाब्यावर बसवून अधिवेशनात जनतेच्या, शेतकऱ्यांच्या, आरक्षणाच्या प्रश्नावर बोलण्यास विरोधी पक्षांना बंदी घातली आहे. पावसाळी अधिवेशन कशा प्रकारे गुंडाळता येईल, मराठा, ओबीसी आरक्षण प्रश्न कसे प्रलंबित रहातील, विरोधी पक्षाची कशी अडवणूक करता येईल हे सर्व ठरविण्यासाठी सत्ताधाऱ्यांना अधिवेशनाच्या अगोदर पाच तास कॅबिनेटची बैठक घ्यावी लागली. सभागृह सुरु होताच ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न अंगलट येताच मंत्रिपदासाठी ओबीसी समाजाचा उपयोग करून घेणाऱ्या छगन भुजबळ यांची ढाल करून सरकारने पळवाट शोधली. भुजबळांनीही सरकारचा चेहरा वाचवायचे काम केले आहे.

आघाडी सरकारने शेतकऱ्यांना दिलेले कर्जमाफीचे आश्वासन पाळले नाही. शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करायचे सोडाच उलट शेतीपंपांचे वीजजोड तोडण्याचे काम केले. आता तर गावेच्या गावे अंधारात असून गावांचा पाणीपुरवठाही ठप्प झाला आहे. या सरकारला अजिबात दयामाया नाही. निर्ढावलेले आघाडी सरकार सर्वसामान्य जनता आणि शेतकऱ्यांच्या विरोधातील आहे. मराठा आणि ओबीसी आरक्षणाबाबतीत केंद्र सरकारकडे बोट दाखवून राज्यसरकार जबाबदारी झटकत आहे.

भास्कर जाधव यांनी सभागृहात न घडलेल्या खोट्या गोष्टी सांगून भाजपाच्या १२ आमदारांचे निलंबन करुन अध्यक्षपदाच्या खुर्चीचा अपमान केला आहे. प्रत्येक मंत्र्याला आपली खुर्ची कधीही जाईल याची भीती वाटत आहे. खुर्चीत असेपर्यंत प्रत्येकजण स्वतःचा खिसा भरायचे काम करत आहे. राज्य चालविण्याची क्षमताच या सरकारमध्ये नाही, असा टोलाही आमदार जयकुमार गोरे यांनी लगावला.