शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
2
ऑनलाइन फॅन्टसी गेमिंगवर अखेर बंदी; नवीन विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची मोहोर
3
भारतावरील 'टॅरिफ'वरून' ट्रम्प यांच्यावर टीका केली, माजी अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या घरावर एफबीआयचा छापा
4
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
5
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
6
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
7
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
8
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
9
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
10
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
11
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
12
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1
13
विवाह नोंदणी कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा; मेहुणीसोबत दाजी करणार होता लग्न, तितक्यात...
14
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
15
या मल्टीबॅगर स्टॉकला मिळालं 499.95 कोटींचं काम, रेल्वे सेक्टरशी संबंधित आहे नवी वर्क ऑर्डर; जाणून घ्या सविस्तर
16
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
17
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?
18
'कॅस्पियन समुद्र' गायब होतोय का? पाच वर्षात ३ फूट पाणी कमी झालं; 'या' ५ देशांना धोका, कारण...
19
डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन
20
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?

दुष्काळी पट्ट्यातील शेतकरी काढताहेत आल्याचे विक्रमी उत्पादन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्क औंध: खटाव तालुक्यातील विशेषतः औंध परिसरातील शेतकरी आता आपल्या शेतीकडे आधुनिकतेच्या नजरेने पाहावयास लागला आहे. स्वतःच ...

लोकमत न्यूज नेटवर्क

औंध: खटाव तालुक्यातील विशेषतः औंध परिसरातील शेतकरी आता आपल्या शेतीकडे आधुनिकतेच्या नजरेने पाहावयास लागला आहे. स्वतःच आपल्या शेताचा अभ्यास करून कोणते पीक करावे, याकडे लक्ष देऊ लागला आहे. पारंपरिक पद्धतीने पिके न घेता अधिक उत्पन्नाची बागायती पिके करून विक्रमी उत्पन्न घेण्याकडे दुष्काळी पट्टा वळू लागल्याचे दिसून येत आहे.

दुष्काळी भाग म्हणून ओळख पुसण्यास उरमोडीच्या पाण्याची मदत शेतकऱ्यांना होत आहे. जिथे कुसळे उगवत नव्हती तिथे आता आले, ऊस, वाटाणा, ढब्बूचे प्लॉट दिसू लागले आहेत. एकेकाळी उसाच्या कांड्यासाठी ट्रकच्या मागे धावणारी लहान मुले आता मोठी होऊन शेकडो टनांनी ऊस कारखान्यांना पाठवत आहेत तर चहासाठी आले बाजारातून आणणाऱ्या माऊलीची मुले आता हजारो टनाने आल्याचे उत्पादन घेत आहेत. त्यामुळे पीकपद्धती बदलू लागली आहे.

गोपूज येथील पृथ्वीराज घार्गे या शेतकऱ्याने २० गुंठे क्षेत्रात २० टन आल्याचे उत्पन्न घेतले आहे. त्यासाठी शेणखत व सेंद्रियवर अधिक भर दिला आहे. वडी, औंध, पळशी याठिकाणीही शेतकऱ्यांनी आल्याचे विक्रमी उत्पन्न घेतले आहे. हळूहळू अभ्यास करून शेतकरी आता आधुनिकतेची कास धरू लागला आहे. त्यामुळे दर कमी असला तरी जास्त उत्पन्न काढून नफ्यात राहण्याचा प्रयत्न शेतकरी करू लागला आहे; मात्र एवढ्या उत्पन्नात दर चांगला मिळाला असता तर अधिक नफा मिळाला असता, अशीही खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

कोट..

माझ्या आल्याच्या उत्पादनात सेंद्रियचा सत्तर टक्के वापर केला. तर तीस टक्के रासायनिक गरजेनुसार वापरले. स्वतः जीवामृत तयार करून आले पिकाला दिल्यामुळे उत्पन्न वाढले. रोगराई कमी झाली.

-पृथ्वीराज घार्गे, शेतकरी, गोपूज

फोटो:-गोपूज येथील पृथ्वीराज घार्गे यांनी आल्याचे विक्रमी उत्पादन घेतले आहे. (छाया : रशिद शेख)