शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
2
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
3
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
4
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
5
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'
6
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
7
१ वर्षात केली स्पर्धा परीक्षेची तयारी, पहिल्याच प्रयत्नात यश; MBBS डॉक्टर बनली IAS अधिकारी
8
केस कलर करण्याची हौस बेतली जीवावर; तरुणीसोबत घडलं भयंकर, अवस्था पाहून बसेल धक्का
9
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
10
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
11
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
12
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा
13
अमेरिकन लढाऊ विमानाला हवेतच आग लागली, अलास्कामध्ये F-35 विमान कोसळले
14
प्रेमासाठी काय पण...! क्वांटम डेटिंग म्हणजे काय, नव्या पिढीमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
15
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
16
रोज फोनवर बोलता बोलता मित्राच्या पत्नीवर जीव जडला, अडथळा ठरलेल्या नवऱ्याचा प्रियकरानेच खेळ खल्लास केला! 
17
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
18
बॉयफ्रेंडने लाथा-बुक्क्यांनी मारलं, सर्व पैसे चोरले, माझं घर घेतलं; प्रसिद्ध गायिकेचा गंभीर आरोप
19
ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?
20
पहिलाच टी-२० सामना ठरला शेवटचा; जाणून घ्या 'त्या' ५ भारतीय खेळाडूंबद्दल!

विद्युत वितरण नियंत्रणच्या बैठकीत तक्रारींचाच पाढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:43 IST

सातारा : साताऱ्यातील जिल्हास्तरीय विद्युत वितरण नियंत्रण समितीच्या बैठकीत सदस्यांकडून तक्रारींचाच पाढा वाचण्यात आला. यामुळे पालकमंत्री बाळासाहेब पाटील ...

सातारा : साताऱ्यातील जिल्हास्तरीय विद्युत वितरण नियंत्रण समितीच्या बैठकीत सदस्यांकडून तक्रारींचाच पाढा वाचण्यात आला. यामुळे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना संबंधित अधिकाऱ्यांना वारंवार कामाबाबत सूचना करावी लागली. तसेच याच बैठकीत वीजचोरी करणाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली.

सातारा जिल्हा परिषदेच्या दिवंगत यशवंतराव चव्हाण बहुद्देशीय सभागृहात पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. खासदार श्रीनिवास पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, आमदार दीपक चव्हाण, आमदार महेश शिंदे, वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता गौतम गायकवाड, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते, शिवसेनेचे सातारा शहरप्रमुख बाळासाहेब शिंदे यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते.

या बैठकीत वीज ग्राहकांना चार-पाच महिने बिल येत नाही. मीटरचे रिडिंग घेण्यात येत नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाढून बिले येतात. हे कुठेतरी थांबण्याची गरज आहे. यापुढे प्रत्येक महिन्याला वीजबिल देण्यात यावे. तसेच वीज चोरी करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी, अशी जोरदार मागणी सदस्यांनी केली. यावर पालकमंत्र्यांनी वस्तूस्थिती मान्य करत वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना कामात बदल करण्याबाबत सूचना केली.

त्याचबरोबर शेती पंपांना विजेची जोडणी न मिळणे, ट्रान्सफार्मरची चोरी आदी मुद्देही बैठकीत मांडण्यात आले. तर खंडाळा तालुक्यातील सदस्याने तेथील औद्योगिक वसाहतीतील वीज गेल्यास तास-दोन तासात येते. पण, शेतकऱ्यांच्या विजेचा घोटाळा झाला तर आठ-दहा दिवस तो दुरुस्त होत नाही, अशी कैफियत मांडली.

बैठकीच्या शेवटी पालकमंत्र्यांनी शेतीसाठी असणारे ट्रान्सफार्मर लवकरात लवकर दुरुस्त करा. तसेच आमदारांनी सुचविलेली कामे पूर्ण करा. तसेच ती पूर्ण झाल्यानंतर त्यांना कळवा, अशी सूचना केली.

ट्रान्सफार्मर दुरुस्तीचे काम विभागून करावे म्हणजे ट्रान्सफार्मर दुरुस्तीला वेळ लागणार नाही. तसेच शेतकऱ्यांच्या तक्रारीही कमी होतील, असे गृहराज्यमंत्री देसाई यांनी स्पष्ट केले.

चौकट :

वेळ जातो ; पण तक्रार सुटत नाही...

समिती तयार झाली आहे. दर महिन्याला वीज ग्राहकांचे गाऱ्हाणं ऐका. पण, तक्रारी कोणी ऐकत नाही. त्यामुळे लोक वैतागले आहेत. वेळ वाया जातो; पण तक्रारी काही सुटत नाही, असे रोखठोकपणे खासदार श्रीनिवास पाटील यांनी सुनावले. तसेच वीज वितरण कंपनीकडे येणाऱ्या तक्रारी संदर्भात दूरध्वनी क्रमांक द्यावा. या दूरध्वनीवर येणाऱ्या तक्रारींचे लवकरात लवकर निराकरण करावे. ज्या तक्रारी जिल्हापातळीवर सोडविण्यासारख्या आहेत. त्या लवकरात लवकर सोडवा, असेही स्पष्टपणे सांगितले.

फोटो दि.२४सातारा वीज कंपनी फोटो...

फोटो ओळ : सातारा येथे जिल्हास्तरीय विद्युत वितरण नियंत्रण समितीच्या बैठकीत पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

.........................................................