शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

रयत क्रांती संघटना करणार कारखान्यांसमोर आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:26 IST

सातारा : येत्या आठ दिवसांत जिल्ह्यातील सर्व कारखान्यांनी एफआरपी न दिल्यास प्रत्येक साखर कारखान्याच्या चेअरमन, संचालकांच्या दारात व ...

सातारा : येत्या आठ दिवसांत जिल्ह्यातील सर्व कारखान्यांनी एफआरपी न दिल्यास प्रत्येक साखर कारखान्याच्या चेअरमन, संचालकांच्या दारात व कारखाना स्थळावर रयत क्रांती संघटनेतर्फे बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संघटनेतर्फे देण्यात आला आहे.

सन २०२०-२१ ऊस गळीत हंगामामध्ये कारखान्यांनी ऊसतोड करुन नेलेल्या ऊस बिलाची रक्‍कम एफआरपीप्रमाणे १४ दिवसांच्या आत देणे बंधनकारक असताना साताऱ्यातील काही कारखान्यांनी गळीत हंगाम सुरु होऊन ९० दिवस उलटून गेले तरी शेतकऱ्यांच्या खात्यावर एफआरपीची रक्‍कम जमा केलेली नाही.

ऊस पिकावर सामान्य शेतकऱ्यांचा कौटुंबिक चरितार्थ व जीवनमान अवलंबून असताना सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या ऊस गाळपाला एफआरपी देण्याचे आश्‍वासन देऊन ऊसतोड करत असतात. परंतु, जिल्ह्यातील काही कारखान्यांनी अद्यापही ऊस बिलाची एफआरपीची रक्‍कम न दिल्याने येत्या चार दिवसांमध्ये जिल्ह्यातील सर्व साखर कारखाना व्यवस्थापनामार्फत एफआरपीची रक्कम देण्यात यावी.

एफआरपीची रक्‍कम १४ दिवसांमध्ये देणे बंधनकारक आहे, तरीसुध्दा जिल्ह्यातील सर्व कारखान्यांनी एफआरपीची संपूर्ण रक्‍कम शेतकऱ्यांना न दिल्यामुळे शेतकऱ्यावर आस्मानी संकट कोसळले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. याकडे जिल्हा प्रशासन याकडे लक्ष देणार की नाही, याबाबत साशंकता वाटते, असे रयत क्रांती संघटनेतर्फे शंकर शिंदे, मुधकर जाधव, प्रकाश साबळे, दत्तात्रय फडतरे यांनी बुधवारी जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.