शहरं
Join us  
Trending Stories
1
'तरुणी हव्या आहेत, घसघशीत कमिशन मिळेल'; युपी-बिहार सोडून केरळमध्ये रचला जातोय भारताविरोधात मोठा कट
2
निसर्ग कोपला! एका दिवसात ११ ठिकाणी ढगफुटी, पूर आणि भूस्खलन; हिमाचल प्रदेशात हाहाकार
3
गाझापट्टीत ६० दिवस युद्धविराम; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
4
FD-RD विसरून जा, हा आहे LIC चा ‘अमृत’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शन संपेल
5
गोगावलेंवर भाजप आमदार भडकले; विधानभवनात परिसरात झाली शाब्दिक चकमक
6
"माझी डॉक्टर पत्नी पाकिस्तानची गुप्तहेर..."; व्यावसायिक पतीचा खळबळजनक दावा, तपास यंत्रणेकडे तक्रार
7
तीन महिन्यांत ७६७ शेतकरी आत्महत्या; मदत व पुनर्वसन मंत्र्यांची विधान परिषदेत कबुली
8
नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित
9
Navi Mumbai: धक्कादायक! नवजात बाळाला प्रवाशांकडे सोडून जन्मदात्री गेली पळून, गुन्हा दाखल
10
२० हून अधिक गर्लफ्रेंड, १० जणींसोबत शारीरिक संबंध; पोलिसांच्या जाळ्यात अडकला 'बोगस पोलीस'
11
पंचतारांकित हॉटेलमध्ये नेऊन विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, प्रतिष्ठित शाळेतील शिक्षिका अटकेत  
12
आजचे राशीभविष्य- २ जुलै २०२५: 'या' राशीतील लोकांनी अवैध कृत्यांपासून दूर राहा, वाणीवर संयम ठेवा
13
मुलींचे लैंगिक शोषण; नराधमांना सोडणार नाही; बीड कोचिंग क्लास प्रकरणात एसआयटी
14
"मी ना तिचा बाप आहे ना बॉयफ्रेंड", 'त्या' अभिनेत्रीसोबतच्या नात्यावर आमिर खानची प्रतिक्रिया
15
"ब्लड टेस्ट करायला गेल्यावर १० मिनिटांनी.."; अंशुमन विचारेच्या पत्नीने सांगितला धक्कादायक अनुभव, काय घडलं?
16
शेतकऱ्यांना फसविले, विमा कंपन्या होणार ब्लॅक लिस्ट; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंची माहिती
17
‘ठाकरे ब्रँड’चे शनिवारी मेळाव्यानिमित्त शक्तिप्रदर्शन; राज-उद्धव वरळी डोममध्ये एकाच व्यासपीठावर
18
शालार्थ आयडी, ३ महिन्यांत होणार एसआयटी चौकशी, शिक्षणमंत्री दादा भुसेंची माहिती
19
कोण खरे बोलते आहे? आणि कोणाचे दावे झूठ आहेत?
20
कुंडमळा पुलाच्या बांधकामात दिरंगाई झाली; सार्वजनिक बांधकाममंत्री भोसले यांची कबुली

रयत क्रांती संघटना करणार कारखान्यांसमोर आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:26 IST

सातारा : येत्या आठ दिवसांत जिल्ह्यातील सर्व कारखान्यांनी एफआरपी न दिल्यास प्रत्येक साखर कारखान्याच्या चेअरमन, संचालकांच्या दारात व ...

सातारा : येत्या आठ दिवसांत जिल्ह्यातील सर्व कारखान्यांनी एफआरपी न दिल्यास प्रत्येक साखर कारखान्याच्या चेअरमन, संचालकांच्या दारात व कारखाना स्थळावर रयत क्रांती संघटनेतर्फे बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संघटनेतर्फे देण्यात आला आहे.

सन २०२०-२१ ऊस गळीत हंगामामध्ये कारखान्यांनी ऊसतोड करुन नेलेल्या ऊस बिलाची रक्‍कम एफआरपीप्रमाणे १४ दिवसांच्या आत देणे बंधनकारक असताना साताऱ्यातील काही कारखान्यांनी गळीत हंगाम सुरु होऊन ९० दिवस उलटून गेले तरी शेतकऱ्यांच्या खात्यावर एफआरपीची रक्‍कम जमा केलेली नाही.

ऊस पिकावर सामान्य शेतकऱ्यांचा कौटुंबिक चरितार्थ व जीवनमान अवलंबून असताना सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या ऊस गाळपाला एफआरपी देण्याचे आश्‍वासन देऊन ऊसतोड करत असतात. परंतु, जिल्ह्यातील काही कारखान्यांनी अद्यापही ऊस बिलाची एफआरपीची रक्‍कम न दिल्याने येत्या चार दिवसांमध्ये जिल्ह्यातील सर्व साखर कारखाना व्यवस्थापनामार्फत एफआरपीची रक्कम देण्यात यावी.

एफआरपीची रक्‍कम १४ दिवसांमध्ये देणे बंधनकारक आहे, तरीसुध्दा जिल्ह्यातील सर्व कारखान्यांनी एफआरपीची संपूर्ण रक्‍कम शेतकऱ्यांना न दिल्यामुळे शेतकऱ्यावर आस्मानी संकट कोसळले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. याकडे जिल्हा प्रशासन याकडे लक्ष देणार की नाही, याबाबत साशंकता वाटते, असे रयत क्रांती संघटनेतर्फे शंकर शिंदे, मुधकर जाधव, प्रकाश साबळे, दत्तात्रय फडतरे यांनी बुधवारी जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.