शहरं
Join us  
Trending Stories
1
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
2
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
3
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
4
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
5
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
6
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
7
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
8
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
9
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
10
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
11
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
12
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
13
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
14
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
15
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
16
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
17
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
18
Shefali Jariwala : "हार्डवेअर चांगलं होतं पण सॉफ्टवेअर खराब...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूबाबत रामदेव बाबांचं वक्तव्य
19
धक्कादायक! प्रेमी युगुलाने ऑटोत घेतला गळफास; तरुणीचे लग्न ठरल्याने उचलले टोकाचे पाऊल
20
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...

साठेबाजीमुळेच कांद्याचे दर गगनाला..!

By admin | Updated: August 26, 2015 21:28 IST

ग्राहकांची गर्दी : घरात साठवून ठेवलेला कांदा येऊ लागला बाजारात; शेतकऱ्यांना झटपट लॉटरीचा अनुभव

सातारा : मागील दोन महिन्यांपासून कांद्याच्या दराने उच्चांकी गाठली आहे. कांद्याची आवक घटली असल्याचे कारण पुढे करत ही दरवाढ होत आहे. परंतु जून-जुलै मधील आलेली कांद्याची आवक बाजारातून गायब कुठे झाली? याचा कोणीही विचार केला नाही. त्यामुळे कृत्रिम टंचाई करून कांद्याचे दर वाढले असून, हा कांदा साठेबाजांनी दाबून ठेवला असल्याची शक्यता व्यापार व ग्राहकांतून वर्तवली जात आहे.पावसाळ्याच्या चार महिने म्हणजेच जून ते आॅक्टोबर महिन्यांत लागणारा कांदा हा साधरणता एप्रिल ते मे महिन्यांतच बाजारात आलेला असतो. पावसाळ्यात पडलेल्या दुष्काळ, अतिवृष्टीमुळे कांद्याचे पीक हाती लागत नाही. त्यामुळे या चारही महिन्यांसाठी लागणारा कांदा हा एप्रिल मे महिन्यांतच मोठ्या प्रमाणात येतो. उन्हाळ्यात येणाऱ्या कांद्याची आवक ही साधारणता पाच-सहा महिने पुरेल एवढी उत्पादीत झालेली असते; परंतु अलीकडे या गोष्टीचा फायदा घेत जून-जुलै महिन्यांतच आलेला कांदा साठेबाज धनदांडग्यांकडून साठवून ठेवला जातो. साधरणता जुलै-आॅगस्टपासून बाजारपेठेत कांद्याची कृत्रिम टंचाई भासवून दर वाढविला जात आहे. त्यामुळे यामागे एखादी मोठी साठेबाजांची साखळी असण्याची शक्यता व्यापारी व ग्राहकांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.संपूर्ण राज्यात लासलगाव, पिंपळगाव, नाशिक याठिकाणांहून कांद्याची निर्यात होते. साधारणता एप्रिल-मे महिन्यांत ठेवणीचा गरवा जातीचा कांदा हा संपूर्ण पावसाळ्यात टिकेल, असा बाजारात येतो. त्याचे दरही अगदी ८ रुपये ते १५ रुपयांप्रमाणे विक्रीला आलेला असतो. नेमके त्याचवेळी मोठ्या प्रमाणात हा कांदा बाजारातून उचलला जातो. त्यामुळे संपूर्ण राज्यात कांद्याच्या अवकाची घट दिसून येते. व कांदा हळूहळू मागणीमुळे महाग होत जातो. तर पावसाळ्यात कांद्याचे पीक अल्पप्रमाणात घेण्यात येत असल्याने बाजारात कांदा मागणी पेक्षाही कमी असल्याने दर वाढतच जातो. त्यानंतर साठेबाजांचा कांदा बाजारात दाखल होतो. साधारणता १५ रुपयांचा कांदा अगदी ७० ते ८० रुपये दराने विकला जातो. कमी वेळेत जास्त फायदा होत आहे. (प्रतिनिधी)पावसाळ्यातच कांदा महाग का?पावसाळ्यात एकतर दुष्काळजन्य परिस्थिती असते किंवा अतिवृष्टी असते. त्यामुळे कांद्याचे पीक सहजासहजी शेतकरी घेत नाही. याचाच फायदा घेत साठेबाज पावसाळ्यात लागणारा कांदा उन्हाळ्यात घेऊन साठवतात. व पावसाळ्यात कृत्रिम टंचाई भासवून कांद्याला अगदी शंभर रुपयांपर्यंत दर ठेवतात. साधारणता कांदा हा पाच-सहा महिने चांगला टिकतो. पावसाळ्यात वातावरण थंड असल्याने एखाद्या मोकळ्या शेडमध्ये कांदा पसरून ठेवला तर तो अगदी पाच-सहा महिने टिकतो.शासनाने कांदा साठेबाजारांवर कारवाईचे आदेश दिले तर दुसरीकडे कांद्याचे दर आवाक्यात येण्यासाठी कांदा आयातीचा निर्णय घेतला, त्यामुळे साठेबाजांचे धाबे दणाणले. अन् कोणत्याही आयातीशिवाय बाजारात कांद्याची आवक वाढली. शासनाने काढलेल्या आदेशामुळे केवळ एकाच आठवड्यात कांद्याने दराची उंची गाठली होती. ती कमी झाली त्यामुळे कांद्याचा काळाबाजार होते हे सिद्ध होत आहे.-राजेंद्रसिंह रजपूत, ग्राहक