शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भगूर नगरपरिषदेत शिवसेनेची २५ वर्षांची सत्ता अजितदादांच्या राष्ट्रवादीने उलथवली; पहा लेटेस्ट अपडेट
2
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
3
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
4
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
5
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
6
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
7
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
8
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
9
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
10
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
11
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
12
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
13
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
14
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
15
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
16
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
17
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
18
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
19
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
20
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
Daily Top 2Weekly Top 5

साठेबाजीमुळेच कांद्याचे दर गगनाला..!

By admin | Updated: August 26, 2015 21:28 IST

ग्राहकांची गर्दी : घरात साठवून ठेवलेला कांदा येऊ लागला बाजारात; शेतकऱ्यांना झटपट लॉटरीचा अनुभव

सातारा : मागील दोन महिन्यांपासून कांद्याच्या दराने उच्चांकी गाठली आहे. कांद्याची आवक घटली असल्याचे कारण पुढे करत ही दरवाढ होत आहे. परंतु जून-जुलै मधील आलेली कांद्याची आवक बाजारातून गायब कुठे झाली? याचा कोणीही विचार केला नाही. त्यामुळे कृत्रिम टंचाई करून कांद्याचे दर वाढले असून, हा कांदा साठेबाजांनी दाबून ठेवला असल्याची शक्यता व्यापार व ग्राहकांतून वर्तवली जात आहे.पावसाळ्याच्या चार महिने म्हणजेच जून ते आॅक्टोबर महिन्यांत लागणारा कांदा हा साधरणता एप्रिल ते मे महिन्यांतच बाजारात आलेला असतो. पावसाळ्यात पडलेल्या दुष्काळ, अतिवृष्टीमुळे कांद्याचे पीक हाती लागत नाही. त्यामुळे या चारही महिन्यांसाठी लागणारा कांदा हा एप्रिल मे महिन्यांतच मोठ्या प्रमाणात येतो. उन्हाळ्यात येणाऱ्या कांद्याची आवक ही साधारणता पाच-सहा महिने पुरेल एवढी उत्पादीत झालेली असते; परंतु अलीकडे या गोष्टीचा फायदा घेत जून-जुलै महिन्यांतच आलेला कांदा साठेबाज धनदांडग्यांकडून साठवून ठेवला जातो. साधरणता जुलै-आॅगस्टपासून बाजारपेठेत कांद्याची कृत्रिम टंचाई भासवून दर वाढविला जात आहे. त्यामुळे यामागे एखादी मोठी साठेबाजांची साखळी असण्याची शक्यता व्यापारी व ग्राहकांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.संपूर्ण राज्यात लासलगाव, पिंपळगाव, नाशिक याठिकाणांहून कांद्याची निर्यात होते. साधारणता एप्रिल-मे महिन्यांत ठेवणीचा गरवा जातीचा कांदा हा संपूर्ण पावसाळ्यात टिकेल, असा बाजारात येतो. त्याचे दरही अगदी ८ रुपये ते १५ रुपयांप्रमाणे विक्रीला आलेला असतो. नेमके त्याचवेळी मोठ्या प्रमाणात हा कांदा बाजारातून उचलला जातो. त्यामुळे संपूर्ण राज्यात कांद्याच्या अवकाची घट दिसून येते. व कांदा हळूहळू मागणीमुळे महाग होत जातो. तर पावसाळ्यात कांद्याचे पीक अल्पप्रमाणात घेण्यात येत असल्याने बाजारात कांदा मागणी पेक्षाही कमी असल्याने दर वाढतच जातो. त्यानंतर साठेबाजांचा कांदा बाजारात दाखल होतो. साधारणता १५ रुपयांचा कांदा अगदी ७० ते ८० रुपये दराने विकला जातो. कमी वेळेत जास्त फायदा होत आहे. (प्रतिनिधी)पावसाळ्यातच कांदा महाग का?पावसाळ्यात एकतर दुष्काळजन्य परिस्थिती असते किंवा अतिवृष्टी असते. त्यामुळे कांद्याचे पीक सहजासहजी शेतकरी घेत नाही. याचाच फायदा घेत साठेबाज पावसाळ्यात लागणारा कांदा उन्हाळ्यात घेऊन साठवतात. व पावसाळ्यात कृत्रिम टंचाई भासवून कांद्याला अगदी शंभर रुपयांपर्यंत दर ठेवतात. साधारणता कांदा हा पाच-सहा महिने चांगला टिकतो. पावसाळ्यात वातावरण थंड असल्याने एखाद्या मोकळ्या शेडमध्ये कांदा पसरून ठेवला तर तो अगदी पाच-सहा महिने टिकतो.शासनाने कांदा साठेबाजारांवर कारवाईचे आदेश दिले तर दुसरीकडे कांद्याचे दर आवाक्यात येण्यासाठी कांदा आयातीचा निर्णय घेतला, त्यामुळे साठेबाजांचे धाबे दणाणले. अन् कोणत्याही आयातीशिवाय बाजारात कांद्याची आवक वाढली. शासनाने काढलेल्या आदेशामुळे केवळ एकाच आठवड्यात कांद्याने दराची उंची गाठली होती. ती कमी झाली त्यामुळे कांद्याचा काळाबाजार होते हे सिद्ध होत आहे.-राजेंद्रसिंह रजपूत, ग्राहक