शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

रणरागिणींनी जपला क्रांतिकारी वसा

By admin | Updated: December 23, 2014 23:52 IST

आरक्षणाशिवाय लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लढवून या महिलांनी क्रांतिकारी विचारांचा वारसा जोपासला आहे.

प्रगती-जाधव-पाटील - सातारा  --ळबीडच्या ताराराणी, नायगावच्या सावित्रीबाई अन् धावडशीच्या राणी लक्ष्मीबाई या माहेरवाशिणींच्या कर्तृत्वाला साजेसे काम येथील सासुरवाशिणींनी केले आहे. आरक्षणाशिवाय लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लढवून या महिलांनी क्रांतिकारी विचारांचा वारसा जोपासला आहे. मुलींची कमी होणारी संख्या या विषयावर देश पातळीवर काम करून ‘लेक लाडकी’ अभियानाने साताऱ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. मात्र, दारूबंदी, तंटामुक्ती आणि निर्मल ग्राम अभियानात महिलांना उल्लेखनीय काम करता आले नाही. राजकारण म्हटले की, पुरुष आणि वशिला हे समीकरण दिसते. यंदा झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आरक्षणाशिवाय महिला मोठ्या प्रमाणावर उभ्या राहिल्या. अ‍ॅड. वर्षा माडगुळकर, रजनी पवार यांच्यासह सुमारे १७ महिलांनी निवडणुकीत उभे राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पहिल्यांदाच निवडणूक प्रचार यंत्रणेत महिलांचा वावर असल्याचे चित्र दिसले. जय-पराजय याहीपेक्षा आव्हान देऊन रणांगणात झुंज देण्याची बाणेदार वृत्ती येथील महिलांनी दाखविली. मुलींची संख्या वाढविण्यासाठी कमी कालावधीत प्रभावी काम करण्याचे श्रेय अ‍ॅड. वर्षा देशपांडे यांच्या लेक लाडकी अभियानाला जाते. मुलींची संख्या कमी असणाऱ्या पहिल्या तीन जिल्ह्यात साताऱ्याचे नाव होते. यावर्षी एक हजार मुलांमागे ९१५ मुलींचा जन्म झाल्याचे सकारात्मक चित्र दिसते. वैद्यकीय क्षेत्रातील सर्वाधिक स्टिंग करण्याचा मानही अ‍ॅड. देशपांडे यांना जातो. सुनेत्रा भद्रे यांनी अ‍ॅनिमल इक्वॅलिटी या संस्थेसाठी नेपाळमध्ये उल्लेखनीय काम केले. नेपाळमध्ये गडीमाई देवीची यात्रा दर पाच वर्षांनी भरते. यात्रेसाठी मोठ्या प्रमाणावर भाविक बिहार, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश या भागातून येतात. अंधश्रध्दा नसानसात भिनलेल्या येथील भक्तांशी दोन हात करत सुनेत्रा भद्रे यांनी मुक्या प्राण्यांचे जीव वाचविले. मालमत्तेसाठी महिलांचे कलह पुढे आले. मालमत्तेतून बेदखल केलेल्या वृध्दा. प्रौढ कुमारिका, विधवा यांनी वडिलोपार्जित मालमत्तेतील वाटा घेऊन संघर्ष केल्याचे चित्र दिसले. मालमत्ता हक्काबाबत पिछाडीवर असलेल्या महिलांनाही आता अधिक समज येऊन जागरुकता झाली असल्याचे दिसत आहे. अत्याचाराचा आलेख चढताचया वर्षभरात महिलांवरील अत्याचारात कमी झाली नाही. निर्भया प्रकरणानंतर पोलीस दरबारी बलात्काराच्या गुन्ह्याची नोंद होण्याचे प्रमाण वाढल्याचे चित्र दिसते. मात्र, यातील काही गुन्हे आकसापोटी आणि अन्य विशिष्ट हेतू ठेवून नोंदवल्याचेही समोर आले. यावर्षी दारूबंदी चळवळीला मात्र खीळ बसल्याचे दिसते. त्या बरोबरच बचत गटांचे झालेले राजकारण क्लेशकारक आहे. महिलांच्या उत्स्फूर्त सहभागाने सातारा जिल्ह्याचे नाव देश पातळीवर नेणाऱ्या तंटामुक्ती आणि ग्राम स्वच्छता अभियानही यंदा सातारा जिल्ह्याला विशेष छाप टाकता आली नाही. मुलींचा जन्मोत्सव साजरा करणं, गर्भवतींचे डोहाळे जेवण करणे यांसह मुलींच्या जन्मानंतर त्यांच्या नावाने ठेवी ठेवण्याचा अभिनव प्रयोग काही ग्रामपंचायतींनी राबविला. यामुळे मुलींच्या जन्मानंतर वाटणारे कर्तृत्वाचे ओझे हलके झाले आहे.