शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
5
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
6
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
7
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
8
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
9
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
10
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
11
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
12
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
13
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
14
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
15
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
16
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
17
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
18
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
19
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

रणरागिणींनी जपला क्रांतिकारी वसा

By admin | Updated: December 23, 2014 23:52 IST

आरक्षणाशिवाय लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लढवून या महिलांनी क्रांतिकारी विचारांचा वारसा जोपासला आहे.

प्रगती-जाधव-पाटील - सातारा  --ळबीडच्या ताराराणी, नायगावच्या सावित्रीबाई अन् धावडशीच्या राणी लक्ष्मीबाई या माहेरवाशिणींच्या कर्तृत्वाला साजेसे काम येथील सासुरवाशिणींनी केले आहे. आरक्षणाशिवाय लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लढवून या महिलांनी क्रांतिकारी विचारांचा वारसा जोपासला आहे. मुलींची कमी होणारी संख्या या विषयावर देश पातळीवर काम करून ‘लेक लाडकी’ अभियानाने साताऱ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. मात्र, दारूबंदी, तंटामुक्ती आणि निर्मल ग्राम अभियानात महिलांना उल्लेखनीय काम करता आले नाही. राजकारण म्हटले की, पुरुष आणि वशिला हे समीकरण दिसते. यंदा झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आरक्षणाशिवाय महिला मोठ्या प्रमाणावर उभ्या राहिल्या. अ‍ॅड. वर्षा माडगुळकर, रजनी पवार यांच्यासह सुमारे १७ महिलांनी निवडणुकीत उभे राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पहिल्यांदाच निवडणूक प्रचार यंत्रणेत महिलांचा वावर असल्याचे चित्र दिसले. जय-पराजय याहीपेक्षा आव्हान देऊन रणांगणात झुंज देण्याची बाणेदार वृत्ती येथील महिलांनी दाखविली. मुलींची संख्या वाढविण्यासाठी कमी कालावधीत प्रभावी काम करण्याचे श्रेय अ‍ॅड. वर्षा देशपांडे यांच्या लेक लाडकी अभियानाला जाते. मुलींची संख्या कमी असणाऱ्या पहिल्या तीन जिल्ह्यात साताऱ्याचे नाव होते. यावर्षी एक हजार मुलांमागे ९१५ मुलींचा जन्म झाल्याचे सकारात्मक चित्र दिसते. वैद्यकीय क्षेत्रातील सर्वाधिक स्टिंग करण्याचा मानही अ‍ॅड. देशपांडे यांना जातो. सुनेत्रा भद्रे यांनी अ‍ॅनिमल इक्वॅलिटी या संस्थेसाठी नेपाळमध्ये उल्लेखनीय काम केले. नेपाळमध्ये गडीमाई देवीची यात्रा दर पाच वर्षांनी भरते. यात्रेसाठी मोठ्या प्रमाणावर भाविक बिहार, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश या भागातून येतात. अंधश्रध्दा नसानसात भिनलेल्या येथील भक्तांशी दोन हात करत सुनेत्रा भद्रे यांनी मुक्या प्राण्यांचे जीव वाचविले. मालमत्तेसाठी महिलांचे कलह पुढे आले. मालमत्तेतून बेदखल केलेल्या वृध्दा. प्रौढ कुमारिका, विधवा यांनी वडिलोपार्जित मालमत्तेतील वाटा घेऊन संघर्ष केल्याचे चित्र दिसले. मालमत्ता हक्काबाबत पिछाडीवर असलेल्या महिलांनाही आता अधिक समज येऊन जागरुकता झाली असल्याचे दिसत आहे. अत्याचाराचा आलेख चढताचया वर्षभरात महिलांवरील अत्याचारात कमी झाली नाही. निर्भया प्रकरणानंतर पोलीस दरबारी बलात्काराच्या गुन्ह्याची नोंद होण्याचे प्रमाण वाढल्याचे चित्र दिसते. मात्र, यातील काही गुन्हे आकसापोटी आणि अन्य विशिष्ट हेतू ठेवून नोंदवल्याचेही समोर आले. यावर्षी दारूबंदी चळवळीला मात्र खीळ बसल्याचे दिसते. त्या बरोबरच बचत गटांचे झालेले राजकारण क्लेशकारक आहे. महिलांच्या उत्स्फूर्त सहभागाने सातारा जिल्ह्याचे नाव देश पातळीवर नेणाऱ्या तंटामुक्ती आणि ग्राम स्वच्छता अभियानही यंदा सातारा जिल्ह्याला विशेष छाप टाकता आली नाही. मुलींचा जन्मोत्सव साजरा करणं, गर्भवतींचे डोहाळे जेवण करणे यांसह मुलींच्या जन्मानंतर त्यांच्या नावाने ठेवी ठेवण्याचा अभिनव प्रयोग काही ग्रामपंचायतींनी राबविला. यामुळे मुलींच्या जन्मानंतर वाटणारे कर्तृत्वाचे ओझे हलके झाले आहे.