शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
6
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
7
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
8
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
9
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
10
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
11
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
16
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
17
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
18
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
20
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 

रामराजे फलटणमध्ये ‘चेहरा’ बदलणार?

By admin | Updated: September 17, 2014 22:29 IST

सर्वांनाच उत्सुकता : दिगंबर आगवणेंसमोर दीपक चव्हाण यांच्याऐवजी दुसरा उमेदवारही शक्य

नसीर शिकलगार -फलटण  -फलटण-कोरेगाव राखीव विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार दीपक चव्हाण यांना पुन्हा उमेदवारी मिळणार की रामराजे नाईक-निंबाळकर ‘चेहरा’ बदलणार, याची उत्सुकता लागून राहिली आहे. महायुतीतर्फे स्वाभिमानी शेतकरी संघटनेला जागा सोडून दिगंबर आगवणे यांचे नाव पक्के झाल्याचे समजते. दिगंबर आगवणे यांच्याविरुद्ध दीपक चव्हाण असणार की आणखी कोण, याबाबतच्या चर्चांना जोर आला आहे.फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघावर राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता आहे. गेल्या वीस वर्षांपासून रामराजेंनी विरोधकांना या मतदारसंघावर वर्चस्व मिळू दिलेले नाही. मागील विधानसभा निवडणुकीत माजी खासदार हिंदुराव नाईक-निंबाळकर, माजी आमदार चिमणराव कदम, रणजितसिंह नाईक-निंबाळकर, प्रल्हादराव साळुंखे-पाटील ही काँग्रेसची मंडळी प्रामाणिकपणे राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरच राहिल्याने राष्ट्रवादीने विधानसभा सहज जिंकत युतीचे बाबूराव माने यांचा पराभव केला होता.मागील पाच वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. निवडून आलेले आमदार दीपक चव्हाण यांना स्वत:ची वेगळी छाप पाडण्यात फारसे यश आले नाही. विरोधकांनी ‘रबर स्टॅम्प’ म्हणून त्यांच्यावर सतत टीका केली. ही टीका खोडून काढण्यात दीपक चव्हाण यांना अपयश आले. मागील पंचवार्षिक काळात बरोबर असणारी काँग्रेसची मंडळी यावेळी राष्ट्रवादीबरोबर राहणार नसल्याचे त्यांनीच स्पष्ट केले आहे.मुख्यमंत्रिपदी पृथ्वीराज चव्हाण आल्यानंतर त्यांच्या सहकार्याने रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी राजकीय ताकद वाढविली. दररोज रामराजे विरुद्ध रणजितसिंह असा सामना सुरू आहे. रणजितसिंहांनी आघाडीधर्म पाळणार नसल्याचे जाहीर करताना दिगंबर आगवणे यांना पाठबळ दिले आहे. दिगंबर आगवणे यांनी नुकताच स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश केला. फलटणची जागा ‘स्वाभिमानी’ला मिळावी यासाठी खासदार राजू शेट्टी, सदाभाऊ खोत यांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. येत्या चार-पाच दिवसांत सर्वच राजकीय पक्षांना फलटण मतदारसंघाचे चित्र स्पष्ट करावे लागेल.फलटण विधानसभा मतदारसंघ महायुतीत शिवसेनेकडे असून, शिवसेनेने तो आम्हाला दिल्याचा दावा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत व दिगंबर आगवणे करीत असले, तरी शिवसेनेने आपल्याला उमेदवारी द्यावी यासाठी माजी आमदार बाबुराव माने आणि उद्योजक डॉ. नंदकुमार तासगावकर यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे महायुतीच्या उमेदवाराकडेही सर्वांचे डोळे लागले आहेत.यंदाची निवडणूक अतिशय चुरशीची होणार असल्याने सर्वांनी अस्तित्वाची निवडणूक केली आहे. रणजितसिंह नाईक-निंबाळकर पूर्णपणे आगवणेंच्या पाठीशी असताना अद्याप हिंदुुराव नाईक-निंबाळकर, माजी आमदार चिमणराव कदम, प्रल्हादराव साळुंखे-पाटील या काँग्रेसच्या नेतेमंडळींनी भूमिका स्पष्ट केलेली नाही. तिघेजण एकत्र बसून विधानसभेबाबत निर्णय घेणार असले तरी राष्ट्रवादीला ते साथ देण्याची शक्यता कमी आहे.