शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
2
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
3
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
4
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
5
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
6
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
7
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
8
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
9
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
10
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
11
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
13
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
14
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
15
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
16
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
17
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
18
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
19
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
20
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
Daily Top 2Weekly Top 5

निरोपाच्या अन् स्वागताच्या तोफा धडाडूनही राजेंचे मौन!

By admin | Updated: January 15, 2017 00:58 IST

कोणतेच भाष्य नाही : जिल्ह्याच्या राजकारणात जोरदार खलबतं

सातारा : जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार खलबते सुरू आहेत. या खलबतांच्या केंद्रस्थानी साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले आहेत. अजिंक्यतारा साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर राष्ट्रवादीच्या मेळाव्यात महारथी नेत्यांनी उदयनराजेंविरोधात रान उठवले. तर दुसऱ्याच दिवशी भाजपचे मातब्बर नेते महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी उदयनराजेंना पक्षात घ्यायला उत्सुकता दर्शवली. निरोपाच्या अन् स्वागताच्या तोफा धडाडत असूनही उदयनराजेंनी मात्र मौन बाळगले आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीविरोधात भूमिका घेतल्याने पक्षाच्या उमेदवाराला पराभवाला सामोरे जावे लागल्याची सल जिल्ह्यातील मातब्बर नेत्यांनी पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्याकडे नुकतीच व्यक्त केली होती. शरद पवारांनी देखील शेखर गोरे यांचा पराभव जिव्हारी लागल्याचे स्पष्ट करत ज्यांना राष्ट्रवादीने निवडून आणले ते कार्यकर्ते पक्षाविरोधात काम करत असतील तर त्यांना बाजूला करण्याचे निर्देश दिले. दुसऱ्याच दिवशी राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी खासदार उदयनराजे भोसले यांचे भाजपमध्ये स्वागतच केले जाईल, असे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. छत्रपती शिवाजी महाराजांचे ते वंशज आहेत, तसेच आम्ही त्यांना मुजरा करतो, असे म्हणत उदयनराजेंना भाजपमध्ये घेण्यासाठी उत्सुक असल्याचे बोलून दाखविले होते. स्वपक्षाचे नेतेमंडळी जाहीरपणे विरोधात भूमिका घेत असताना खासदार उदयनराजेंनी मात्र मौन बाळगले आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये सातारा तालुक्यात दोन्ही राजेंचे कार्यकर्ते स्वतंत्रपणे लढायची तयारी करत आहेत. काही ठिकाणी तर बाह्या वर करून एकमेकांची जिरवण्यासाठी सज्ज आहेत. दुसऱ्या बाजूला भाजपही उदयनराजेंना आपल्याकडे खेचून बळ वाढविण्यासाठी तयारीत दिसते. या घडामोडी वेगाने घडत असताना उदयनराजेंकडून काहीच हालचाली नसल्याने कोंडी कायम राहिली आहे. (प्रतिनिधी) पत्रकयुद्ध का थांबले?जलमंदिर व सुरुची या दोन वाड्यांवरून एकमेकांविरोधातील पत्रकांची सरबत्ती थांबली आहे. वास्तविक, काही दिवसांपूर्वी विरोधात शब्द निघाला तरी दोन्ही वाड्यांवरून पत्रके प्रसिद्धीसाठी पाठविली जात होती. हे पत्रकयुद्ध माध्यमांतून बरेच गाजले होते. हे युद्ध अचानकपणे कसे थांबले?, असा सवाल साताऱ्यातील जनतेला पडला आहे.