शहरं
Join us  
Trending Stories
1
७/११तील सर्व दोषी निर्दोष; असदुद्दीन ओवेसी म्हणतात, “गेली १७ वर्षे निष्पाप लोक जेलमध्ये...”
2
"आम्हाला तोंड उघडायला लावू नका..."; सुप्रीम कोर्ट ईडीवर संतापले; काय आहे प्रकरण?
3
"पाती माझ्यासोत जबरदस्ती..."; इंग्लंडचे माजी खासदार अँड्रयू ग्रिफिथ्स यांच्यावर, माजी खासदार पत्नीचा गंभीर आरोप
4
झोपेत असताना तो तिच्यावर लैंगिक अत्याचार करायचा, नंतर लाथा मारायचा; माजी महिला खासदाराने केले गंभीर आरोप
5
हवाई दलाचे विमान महाविद्यालयावर कोसळले; अनेकांच्या मृत्यूचा संशय, बांग्लादेशातील घटना
6
Solapur Crime: घरकुलाचा वाद आणि १० वर्षाच्या कार्तिकची हत्या; आरोपी निघाला जवळचा नातेवाईक, सीसीटीव्हीमुळे गूढ उलगडले
7
"विश्वासघात वेदनादायक होता पण..." नवऱ्याच्या व्हायरल व्हिडीओवर अँडी बायरनच्या पत्नीची पहिली प्रतिक्रिया?
8
७ कोटी मुलांसाठी गुड न्यूज; आता शाळेतच होणार आधारशी निगडीत 'हे' काम, UIDAI ची विशेष सुविधा
9
गोरी दिसण्यासाठी काय नाही केलं, शेवटी देवाकडे नवस केला अन् मग...; 'झांसी की रानी' फेम अभिनेत्रीचा स्ट्रगल
10
कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही...! ओबामांना एफबीआय एजंटनी पाडले, अटक केली? डोनाल्ड ट्रम्पकडून 'फेक' व्हिडिओ शेअर
11
इस्रायल थांबला, पण आता तुर्की सुरू झाला... सिरियामध्ये हाहा:कार, दमास्कसनंतर अलेप्पो 'लक्ष्य'
12
सत्तेची मस्ती, नेत्यांची फ्री स्टाईल कुस्ती! महायुतीतील तिन्ही पक्षांनी जनतेला दाखवला 'लाथा-बुक्क्यांचा सिनेमा'
13
"कृषिमंत्री कोकाटेंचा खुलासा अयोग्यच, एक-दोन वेळा दादांनीही...!"; सुनील तटकरे स्पष्टच बोलले
14
ज्यूस प्यायला नाही म्हणून सांबारमध्ये विष; २ मुलांच्या आईला बॉयफ्रेंडने दिली भयंकर आयडिया अन्...
15
"अजून मारा पण कृषिमंत्र्यांचा राजीनामा घ्या"; मारहाणीनंतर विजयकुमार घाडगे संतप्त; म्हणाले, 'तटकरेंना एक शब्द वाकडा बोललो असेल तर...'
16
IND vs ENG : टीम इंडियातील हा स्टार खेळाडू मालिकेतून 'आउट'; चौथ्या कसोटी आधी आली संघ बदलण्याची वेळ
17
मुंबई विमानतळावर मोठा अपघात टळला! विमान धावपट्टीवरून घसरले, तिन्ही टायर फुटल्याने खळबळ
18
“माझा हक्क आहे, पण विरोधी पक्षनेता असूनही संसेदत बोलू दिले जात नाही”; राहुल गांधींचा आरोप
19
७/११तील सर्व दोषी निर्दोष, भाजपाकडून पहिली प्रतिक्रिया; नेते म्हणाले, “CM फडणवीसांना...”
20
"स्मिता तळवलकर नाराज झाल्या आणि मी...", 'लक्ष्मी निवास' फेम तुषार दळवींनी सांगितला 'तो' किस्सा

निरोपाच्या अन् स्वागताच्या तोफा धडाडूनही राजेंचे मौन!

By admin | Updated: January 15, 2017 00:58 IST

कोणतेच भाष्य नाही : जिल्ह्याच्या राजकारणात जोरदार खलबतं

सातारा : जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार खलबते सुरू आहेत. या खलबतांच्या केंद्रस्थानी साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले आहेत. अजिंक्यतारा साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर राष्ट्रवादीच्या मेळाव्यात महारथी नेत्यांनी उदयनराजेंविरोधात रान उठवले. तर दुसऱ्याच दिवशी भाजपचे मातब्बर नेते महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी उदयनराजेंना पक्षात घ्यायला उत्सुकता दर्शवली. निरोपाच्या अन् स्वागताच्या तोफा धडाडत असूनही उदयनराजेंनी मात्र मौन बाळगले आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीविरोधात भूमिका घेतल्याने पक्षाच्या उमेदवाराला पराभवाला सामोरे जावे लागल्याची सल जिल्ह्यातील मातब्बर नेत्यांनी पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्याकडे नुकतीच व्यक्त केली होती. शरद पवारांनी देखील शेखर गोरे यांचा पराभव जिव्हारी लागल्याचे स्पष्ट करत ज्यांना राष्ट्रवादीने निवडून आणले ते कार्यकर्ते पक्षाविरोधात काम करत असतील तर त्यांना बाजूला करण्याचे निर्देश दिले. दुसऱ्याच दिवशी राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी खासदार उदयनराजे भोसले यांचे भाजपमध्ये स्वागतच केले जाईल, असे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. छत्रपती शिवाजी महाराजांचे ते वंशज आहेत, तसेच आम्ही त्यांना मुजरा करतो, असे म्हणत उदयनराजेंना भाजपमध्ये घेण्यासाठी उत्सुक असल्याचे बोलून दाखविले होते. स्वपक्षाचे नेतेमंडळी जाहीरपणे विरोधात भूमिका घेत असताना खासदार उदयनराजेंनी मात्र मौन बाळगले आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये सातारा तालुक्यात दोन्ही राजेंचे कार्यकर्ते स्वतंत्रपणे लढायची तयारी करत आहेत. काही ठिकाणी तर बाह्या वर करून एकमेकांची जिरवण्यासाठी सज्ज आहेत. दुसऱ्या बाजूला भाजपही उदयनराजेंना आपल्याकडे खेचून बळ वाढविण्यासाठी तयारीत दिसते. या घडामोडी वेगाने घडत असताना उदयनराजेंकडून काहीच हालचाली नसल्याने कोंडी कायम राहिली आहे. (प्रतिनिधी) पत्रकयुद्ध का थांबले?जलमंदिर व सुरुची या दोन वाड्यांवरून एकमेकांविरोधातील पत्रकांची सरबत्ती थांबली आहे. वास्तविक, काही दिवसांपूर्वी विरोधात शब्द निघाला तरी दोन्ही वाड्यांवरून पत्रके प्रसिद्धीसाठी पाठविली जात होती. हे पत्रकयुद्ध माध्यमांतून बरेच गाजले होते. हे युद्ध अचानकपणे कसे थांबले?, असा सवाल साताऱ्यातील जनतेला पडला आहे.