शहरं
Join us  
Trending Stories
1
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
2
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
3
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा
4
IPL 2025: लखनौच्या अडचणीत वाढ, दुखापतीमुळं मयांक यादव आयपीएलमधून बाहेर!
5
Shiv Sena: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील संशयितांची माहिती देणाऱ्याला १० लाख रुपयांचे बक्षीस
6
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
7
बिहार दौऱ्यात राहुल गांधी यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल, पोलिसांनी शंभराहून अधिक जणांना केलं आरोपी
8
India Pakistan Ceasefire: "भारत-पाकिस्तान यांच्यात १८ मेपर्यंत शस्त्रसंधी"; पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री डार यांचे विधान
9
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
10
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
11
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
12
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
13
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
14
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
15
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
16
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
17
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
18
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
19
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
20
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग

पश्चिम भागात पाऊस वाढला; नवजाला ६१ मिलिमीटरची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:46 IST

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढत चालला असून, गुरुवारी सकाळपर्यंत कोयनेला ५०, तर नवजा येथे ६१ मिलिमीटरची ...

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढत चालला असून, गुरुवारी सकाळपर्यंत कोयनेला ५०, तर नवजा येथे ६१ मिलिमीटरची नोंद झाली. यामुळे कोयनेत पाण्याची आवक होत असून, धरणात १०३.३० टीएमसी पाणीसाठा झाला होता. पावसाचा जोर आणखी वाढल्यास कोयनेतून पुन्हा पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता आहे.

सप्टेंबर महिना सुरू झाल्यापासून जिल्ह्यात पाऊस सुरू आहे. कधी दमदार पाऊस झाला, तर काहीवेळा तुरळक स्वरुपात हजेरी लावली. तरीही या पावसामुळे शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. पूर्वेकडील दुष्काळी भागातही पाऊस झाल्याने खरीप हंगामातील पिकांना जीवदान मिळाले. बाजरी, मूग, मटकी, मका आदी पिके चांगली आली आहेत. ही पिके काढणीच्या टप्प्यात आली आहेत. तसेच काही भागात काढणी आणि मोडणीही सुरू झाली आहे.

पश्चिमेकडेही पावसाची चांगली बरसात झाली. कोयना, नवजा, महाबळेश्वर, कास, बामणोली आणि तापोळा भागात सतत १५ दिवस पाऊस होता. त्यानंतर काही दिवस तुरळक हजेरी लावली. पण, दोन दिवसांपासून पुन्हा पाऊस वाढू लागला आहे. यामुळे कोयना, धोम, कण्हेर, उरमोडी, तारळी, बलकवडी अशा प्रमुख धरणांत पाणीसाठा वाढत चालला आहे. सर्व प्रमुख धरणे भरल्यातच जमा आहेत.

महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या कोयना धरणातही पाण्याची आवक वाढत गेली. त्यामुळे १०५.२५ टीएमसी साठवण क्षमता असणाऱ्या कोयना धरणात १०३ टीएमसीवर पाणीसाठा झाला आहे. परिणामी मागील आठवड्यापूर्वी धरणाच्या पायथा वीजगृह आणि सर्व सहा दरवाजांतून विसर्ग करावा लागला. त्यावेळी ५० हजार क्युसेक वेगाने पाणी कोयना नदीपात्रात जात होते. त्यानंतर पाऊस कमी झाल्यानंतर दरवाजे व पायथा वीजगृहातील विसर्ग बंद करण्यात आला. पावसाचा जोर वाढल्यास आणखी पाणी सोडावे लागणार आहे.

चौकट :

पूर्व भागात पाऊस कमी...

मागील दोन दिवसांपासून जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस पडत आहे. या पावसाचा जोर वाढत चालला आहे. गुरूवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनेला ५० मिलिमीटर पाऊस पडला, तर जूनपासून आतापर्यंत ४,२७५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्याचबरोबर नवजाला ६१ आणि यावर्षी आतापर्यंत ५,६०८, तर महाबळेश्वरला ४० आणि जूनपासून ५,६७८ मिलिमीटर पावसाची नोंद झालेली आहे. पूर्व भागात पावसाचे प्रमाण कमी आहे. आता परतीच्या पावसाची प्रतीक्षा आहे.

.................................

तीन धरणांतून विसर्ग...

मागील काही दिवसांपूर्वी चांगला पाऊस झाला होता. त्यामुळे पश्चिम भागातील प्रमुख धरणात पाणी येत आहे. परिणामी धरण पातळी नियंत्रित करण्यासाठी धरणातून विसर्ग करण्यात आला. त्यातच आताही पाऊस होत आहे. यामुळे सद्यस्थितीत तीन धरणांतून पाणी सोडण्यात येत आहे. यामध्ये धोममधून ३७५ क्युसेक, कण्हेर ३२४ आणि बलकवडी धरणातून ९०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कोयना, तारळी, उरमोडी धरणातून पाणी सोडणे बंद आहे.

........................................................