शहरं
Join us  
Trending Stories
1
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
2
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
3
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
4
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
5
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
6
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
7
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
8
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
9
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
10
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
11
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
12
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
13
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
14
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
15
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...
16
धक्कादायक! लिव्ह-इन पार्टनरची केली हत्या, सिग्नलवर गाडी थांबवली, पेट्रोल ओतून पेटवून दिले
17
‘मतचोरीचा अणुबॉम्ब टाकला, आता हायड्रोजन बॉम्ब येणार, त्यानंतर नरेंद्र मोदी...', राहुल गांधींचा निशाणा
18
याला म्हणतात स्टॉक...! झटक्यात ₹३७०० नं वधारला शेअर; एकाच दिवसात गुंतवणूकदारांना केलं मालामाल, आपल्याकडे आहे का?
19
टाटा-महिंद्रामुळे बाजारात पुन्हा तेजी! सेन्सेक्स-निफ्टीची मोठी उसळी; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
'पापा कहते हैं' फेम अभिनेत्रीने सोडली Googleची नोकरी; आता बनली पब्लिसिस ग्रुपची सीईओ

शेती उद्ध्वस्त करणारा पाऊस ‘शासनासाठी अदृश्य’

By admin | Updated: August 24, 2014 22:37 IST

नुकसानीची पाहणी करूनही पंचनामा नाही : पर्जन्यमापकात पावसाचा थेंबही नाही मग भरपाई कसली म्हणे !

परळी : ढगफुटी होऊ दे नाहीतर आभाळ कोसळू दे पर्जन्यमापकात पावसाची नोंद असेल तरच भरपाई मिळेल, ही पद्धत आहे प्रशासकीय कर्मचाऱ्यांची. या कार्यपद्धतीचा फटका परळी खोऱ्यातील काही गावांना बसला आहे.परळी खोऱ्यातील काळोशी, कुरुण, करंजे तर्फ परळी या तीन गावांच्या शेजारील यवतेश्वरच्या डोंगरपट्ट्यातील सात किलोमीटरच्या अंतरात शनिवारी चार वाजता अचानक प्रचंड प्रमाणात पाऊस झाला. यामुळे घरांची पडझड झाली. तसेच भातशेती, शेतीचे बांध वाहून गेले. पूल पाण्याखाली गेले. रस्ते खचले, नदी, नाले तुडुंब वाहिले. सुमारे एक तास जलतांडव सुरू होते. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले. संसार उघड्यावर पडले. नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी तलाठी, कृषी विभागाचे अधिकारी घटनास्थळी हजर झाले. मात्र, त्यांनी नुकसानीचे पंचनामे काही केले नाहीत. भोळ्याभाबड्या लोकांनी भरपाई मिळणार ना, असे विचारताच एका शासकीय कर्मचाऱ्याने दिलेले उत्तर ऐकून जलतांडवाची शिकार झालेल्या ग्रामस्थांच्या पायाखालची जमीनच सरकली.पर्जन्यमापकात पावसाची नोंद किती झाली आहे, यावरच भरपाई मिळणार की नाही, हे ठरणार असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. पण ज्या भागात पाऊस झाला त्याठिकाणाहून सुमारे १७ किलोमीटर अंतरावरील करंडी गावात पर्जन्यमापक आहे. त्याठिकाणी पाऊसच पडला नसल्याने पर्जन्यमापकात शून्य अशी नोंद झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रत्यक्ष मुसळधार पावसाने या गावांमध्ये मोठी हानी झाली असल्याचे दिसत असतानाही शासकीय कर्मचारी मात्र घटनास्थळापासून सतरा किलोमीटर अंतरावर असलेल्या पर्जन्यमापकाच्या भरवशावर का विसंबून आहेत, याचे आकलन मात्र नुकसानग्रस्तांना होत नाही. (वार्ताहर)