शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांचा घटस्फोट, ७ वर्षांनी लग्न तुटले!
2
Wimbledon 2025 Final : अल्काराझची हॅटट्रिक हुकली! नंबर वन यानिक सिनरनं विम्बल्डन जेतेपद जिंकत रचला इतिहास
3
इंग्लंड: लंडनच्या साऊथएन्ड विमानतळावर मोठा अपघात! उड्डाणानंतर काही वेळातच विमानाला आग
4
मैत्रिणीला सोडायला गेलेली स्नेहा परत आलीच नाही; थेट यमुना नदीत सापडला मृतदेह; नेमकं काय घडलं?
5
अमरावती: पोलिसांनी उधळली तरुणाईची मद्य पार्टी ! अल्पवयीन मुला-मुलींसह १००-१५० जण ताब्यात
6
टीम इंडियासाठी सोपा वाटणारा पेपर झाला अवघड; ५८ धावांत ४ विकेट्स! KL राहुल एकटा पडला!
7
क्रॉसिंग गेटवर रेल्वेचे ‘झिरो अ‍ॅक्सिडेन्ट’चे लक्ष्य; मध्य रेल्वे नागपूर विभागात सुरक्षा मोहीम
8
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
9
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
10
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
11
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
12
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
13
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
14
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
15
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
16
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
17
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
18
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
19
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
20
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं

शेती उद्ध्वस्त करणारा पाऊस ‘शासनासाठी अदृश्य’

By admin | Updated: August 24, 2014 22:37 IST

नुकसानीची पाहणी करूनही पंचनामा नाही : पर्जन्यमापकात पावसाचा थेंबही नाही मग भरपाई कसली म्हणे !

परळी : ढगफुटी होऊ दे नाहीतर आभाळ कोसळू दे पर्जन्यमापकात पावसाची नोंद असेल तरच भरपाई मिळेल, ही पद्धत आहे प्रशासकीय कर्मचाऱ्यांची. या कार्यपद्धतीचा फटका परळी खोऱ्यातील काही गावांना बसला आहे.परळी खोऱ्यातील काळोशी, कुरुण, करंजे तर्फ परळी या तीन गावांच्या शेजारील यवतेश्वरच्या डोंगरपट्ट्यातील सात किलोमीटरच्या अंतरात शनिवारी चार वाजता अचानक प्रचंड प्रमाणात पाऊस झाला. यामुळे घरांची पडझड झाली. तसेच भातशेती, शेतीचे बांध वाहून गेले. पूल पाण्याखाली गेले. रस्ते खचले, नदी, नाले तुडुंब वाहिले. सुमारे एक तास जलतांडव सुरू होते. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले. संसार उघड्यावर पडले. नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी तलाठी, कृषी विभागाचे अधिकारी घटनास्थळी हजर झाले. मात्र, त्यांनी नुकसानीचे पंचनामे काही केले नाहीत. भोळ्याभाबड्या लोकांनी भरपाई मिळणार ना, असे विचारताच एका शासकीय कर्मचाऱ्याने दिलेले उत्तर ऐकून जलतांडवाची शिकार झालेल्या ग्रामस्थांच्या पायाखालची जमीनच सरकली.पर्जन्यमापकात पावसाची नोंद किती झाली आहे, यावरच भरपाई मिळणार की नाही, हे ठरणार असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. पण ज्या भागात पाऊस झाला त्याठिकाणाहून सुमारे १७ किलोमीटर अंतरावरील करंडी गावात पर्जन्यमापक आहे. त्याठिकाणी पाऊसच पडला नसल्याने पर्जन्यमापकात शून्य अशी नोंद झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रत्यक्ष मुसळधार पावसाने या गावांमध्ये मोठी हानी झाली असल्याचे दिसत असतानाही शासकीय कर्मचारी मात्र घटनास्थळापासून सतरा किलोमीटर अंतरावर असलेल्या पर्जन्यमापकाच्या भरवशावर का विसंबून आहेत, याचे आकलन मात्र नुकसानग्रस्तांना होत नाही. (वार्ताहर)