शहरं
Join us  
Trending Stories
1
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
2
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
3
डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का! 'भारतातून मालाची आयात वाढवण्याचे पुतिन यांचे आदेश; पंतप्रधान मोदींचे कौतुकही केले
4
डॉक्टरांच्या खराब हँडरायटिंगवर हायकोर्टचा 'स्ट्राँग' डोस! म्हणाले, रुग्णांच्या आयुष्याशी खेळ...
5
टाटा मोटर्सचा IPO... दोन दिवसांनी कमाईची संधी, लिस्टिंग कधी, प्राईज बँड काय, सर्वकाही जाणून घ्या
6
"'युद्ध का डर...!'; आम्ही कागदी वाघ, तर मग नाटो कोण?" पुतिन यांचा अमेरिकेवर तगडा प्रहार, भारतासंदर्भातही स्पष्टच बोलले!
7
VIDEO : केएल राहुलनं शिट्टी मारत साजरी केली सेंच्युरी; जाणून घ्या त्यामागचं कारण
8
त्या' 11 संशयितांची कसून चौकशी अकोला, मुंबईचे पोलीस पथक परतवाड्यात दाखल, इंट्रोगेशन सुरू
9
अमेरिकेनंतर आणखी एका मोठ्या देशात शटडाऊन; कर्मचारीच गेले संपावर, पर्यटन स्थळेही झाली बंद...
10
"तसेही आज तेच करावे लागले ना?"; भाजपने उद्धव ठाकरेंना डिवचले, दसरा मेळाव्यावरून हल्ला
11
Mirabai Chanu : मीराबाई चानूने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रचला इतिहास; १९९ किलो वजन उचलून जिंकलं सिल्व्हर मेडल
12
धक्कादायक! मुंबईतील २६/११ मधील हल्ल्यात NSG कमांडोने शौर्य दाखवले; आता गांजा तस्करीच्या आरोपाखाली अटक
13
"रावण वाईट नव्हता, थोडा खोडकर...", अभिनेत्रीची वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
14
Tragedy in Bihar: हृदयद्रावक घटना! वंदे भारत एक्सप्रेसच्या धडकेत ४ ठार; २ जण गंभीर जखमी
15
पुणे हादरले! टीव्ही बंद करण्यावरुन वाद, बापाची मुलाकडून हत्या; कोथरुडमधील घटना
16
टाटा मोटर्स वगळता विक्रीचा दबाव; जागतिक बाजारातील संमिश्र संकेतामुळे भारतीय बाजार रेड झोनमध्ये
17
मला पुरस्कार द्या...! पठ्ठ्याने फास्टॅग पास आल्यापासून २५ दिवसांत ११,००० किमी थार चालविली, वाचले एवढे रुपये...
18
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेसाठी अभिषेक शर्मा-तिलक वर्माची टीम इंडियात एन्ट्री
19
"सुशांतबद्दल सांगायचं तर आम्ही ३ वर्ष...", अभिनेत्याच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच व्यक्त झाल्या सविता प्रभुणे
20
IT क्षेत्रासाठी मोठा धक्का! TCS मधून १२,००० जणांना काढणार, कर्मचाऱ्यांसमोर दोनच पर्याय

यंदाचा पाऊस माळ्याच्या घरी...

By admin | Updated: March 26, 2015 00:06 IST

पाडवा वाचनाची परंपरा : ग्रामीण भागात पंचांग वाचून घेतला जातो हवामानाचा अंदाज

गोंदवले : आजच्या आधुनिक युगात हवामानाचा अंदाज पाहण्यासाठी सहसा कोणी पंचांग पाहत बसत नाही. मात्र, ग्रामीण भागात आजही गावोगावी ‘पाडवा वाचन’ हा कार्यक्रम दरवर्षी घेतला जातो. यामध्ये पंचांग वाचून हवामानाचा अंदाज वर्तविला जातो. यंदाचा पाऊस हा माळ्याच्या घरी असल्यामुळे पर्जन्यमान चांगले असणार असल्याचे गावोगावच्या ‘पाडवा वाचन’मध्ये सांगण्यात आले. चैत्र पाडव्याला गावोगावी पाडवा वाचन होते. यंदाचा पाऊस माळी समाजाच्या घरी असल्याचे सांगण्यात आले. माळी समाज भाजीपाला, फुलांची शेती करत असल्यामुळे माळ्याच्या घरचा पाऊस जास्त पडतो, तर वाण्याच्या घरी पाऊस असेल तर तो मोजूनमापूनच पडतो, असा गावकऱ्यांचा समज असतो. पूर्वापार चालत आलेली ही परंपरा ग्रामीण भागात आजही पाहायला मिळते. आजच्या इंटरनेटच्या जमान्यातही ही परंपरा काही गावांमध्ये टिकून आहे. गुढीपाडव्यापासून मराठी वर्षाची सुरुवात होते. या वर्षातील पहिला सण म्हणजे पाडवा आहे. पाडव्याला वाचन करण्यात येणाऱ्या पंचांग वाचनाला खूप महत्त्व असते. अगदी पूर्वीपासून चालत आलेली ही परंपरा काळाच्या पडद्याआड चालली असली तरी काही गावांमध्ये मात्र ती आजही जपली जात आहे. दरवर्षी ग्रामदैवताच्या मंदिरात एकत्र येऊन पाडवा वाचन केले जाते. पाडवा वाचनाअगोदर ग्रामदैवताच्या मंदिरावर गुढी उभारली जाते. त्यानंतर दुपारी १२ वाजता ग्रामस्थ मंदिरात एकत्र येतात. मानकऱ्याने पंचांगाचे पूजन केल्यानंतर शास्त्री, पुराणिक पंचांग वाचन करतात. वर्षभरात काय-काय घडणार आहे, हे पंचांग वाचून सांगितले जाते. यामध्ये पहिला पाऊस कोणाच्या घरी आहे, हे पाहिले जाते. पंचांगणात यंदाचा पाऊस हा माळ्याच्या घरी असल्याचे दिले आहे. त्यामुळे यंदा जास्त पाऊस पडणार सांगण्यात आले. शेतकऱ्यांच्या दृष्टीने ही समाधानाची गोष्ट असल्यामुळे सर्वत्र आनंदीआनंद आहे. यावेळी गावचे पाटील, सरपंच, देवाचे पुजारी आणि बाराबलुतेदार उपस्थित असतात. पाडवा वाचनानंतर पुजारी सर्वांना लिंब-गुळाचे मिश्रण वाटतात. त्यानंतर कार्यक्रमाची सांगता होते. (वार्ताहर)