शहरं
Join us  
Trending Stories
1
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
2
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
3
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
4
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
5
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
6
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
9
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
10
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
11
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
12
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
13
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
14
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
15
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
19
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
20
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला

साताऱ्यात ‘आयटीआय’साठी अर्जांचा पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:44 IST

कमी खर्चातील शिक्षण : नोकरीची हमी असल्याने ग्रामीण भागातून वाढतेय मागणी प्रगती जाधव-पाटील लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : आर्थिक ...

कमी खर्चातील शिक्षण : नोकरीची हमी असल्याने ग्रामीण भागातून वाढतेय मागणी

प्रगती जाधव-पाटील

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : आर्थिक विवंचनेतून तातडीने बाहेर पडून सक्षम होण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी अजूनही आयटीआय अभ्यासक्रम नोकरीदायी आहे. दोन वर्षांचे शिक्षण पूर्ण करून खात्रीशीर नोकरी मिळवून देणाऱ्या या अभ्यासक्रमासाठी यंदाही जिल्ह्यातून उत्तम प्रतिसाद मिळाला. ३ हजार ९०० जागांसाठी तब्बल ६४६६ अर्ज दाखल झाले आहेत. प्रवेशासाठी अर्ज करायला अद्याप आठ दिवस असल्याने ही यादी अधिक वाढण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात आयटीआयचे ११ शासकीय आणि ७ खासगी प्रशिक्षण केंद्र आहेत. विद्यार्थ्यांसह विद्यार्थिनीही येथे प्रशिक्षण घेण्यासाठी अर्ज करतात. शासकीय प्रशिक्षण केंद्रात अडीच हजार रुपयांमध्ये वर्षभराचे शिक्षण दिले जाते. त्यामुळे अवघ्या पाच हजार रुपयांमध्ये पदवी संपादन करून हाताला काम मिळत असल्याने ग्रामीण भागातून याला सर्वाधिक मागणी आहे. यंदाही गतवर्षीप्रमाणेच आयटीआय प्रवेशासाठी अर्जांचा पाऊस पडला आहे. प्रवेशाच्या विविध फेऱ्यांच्या माध्यमातून यंदाही प्रवेश निश्चित करण्यात येणार आहेत.

जिल्ह्यातील शासकीय आयटीआय :

शासकीय प्रवेश क्षमता : ३२३६

खासगी आयटीआय : ६६४

एकूण प्रवेश क्षमता : ३९००

आत्तापर्यंत आलेले अर्ज : ६४६६

तालुकानिहाय शासकीय प्रवेश क्षमता

सातारा : ८७६

कऱ्हाड : ९००

लोणंद : २९२

वाई : २१२

महाबळेश्वर : १०८

मेढा : १५२

दहिवडी : १०८

फलटण : १०४

खटाव : १४४

कोरेगाव : १९२

पाटण : १४८

खासगी प्रवेश क्षमता

कऱ्हाड : १८४

सातारा : ८०

पाटण : २१२

ढेबेवाडी : १००

सोमंथळी : ८८

गतवर्षीइतकाच प्रतिसाद

आयटीआय केल्यानंतर विविध कारखान्यांमध्ये नोकरीची खात्रीशीर संधी असल्याचे गणित विद्यार्थ्यांच्या डोक्यात पक्के असल्यामुळे यंदाही गतवर्षीइतकेच प्रवेश झाले आहेत. कमी कालावधीत हाताला काम देऊन कुटुंब स्थिर करण्याचा हमखास मार्ग म्हणूनही विद्यार्थ्यांनी याकडे जाण्याचा कल दर्शविला आहे.

यामुळे टिकून आहे सातत्य...!

कोविडमध्ये अनेकांच्या हातचे काम गेले, तर कोणाला पगार कपातीला सामोरे जावे लागले. या दोन्ही परिस्थितीत हातात कला असणाऱ्यांना मात्र कुठेही अडचण आली नाही, हे सत्य अधोरेखित झाले आहे. त्यामुळे यंदाही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आयटीआयला प्रवेश घेण्याकडे कल ठेवला आहे.

कोट :

व्यवसाय शिक्षण घेण्यासाठी अद्यापही ग्रामीण भागातील मुलांचा ओढा सर्वाधिक आहे. दोन वर्षे शिक्षणानंतर तातडीने हाताला काम देणारे शिक्षण म्हणून याला सर्वाधिक मागणी आहे. यंदाही प्रवेशासाठी क्षमतेपेक्षा अधिकचे अर्ज आम्हाला प्राप्त झाले आहेत.

- सचिन धुमाळ, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी, सातारा

पाच हजार रुपयांत शिक्षण आणि तातडीने हाताला रोजगार मिळवून देणारे शिक्षण म्हणजे आयटीआय. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर आम्ही स्वावलंबी बनण्यासाठी फार काळ प्रतीक्षा करावी लागत नाही. त्यामुळे हा अभ्यासक्रम निवडण्याचे ठरवले.

- भरत मर्ढेकर, विद्यार्थी