शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे, पाणीप्रश्नी रणजितसिंह यांच्याकडून नरेंद मोदींची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:11 IST

फलटण : ब्रिटिशकाळापासूनच प्रलंबित फलटण-पंढरपूर रेल्वे मार्गाच्या निधीचा प्रश्न, तसेच कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्प, निरा देवघर प्रकल्प व जिहे-कठापूर प्रकल्प ...

फलटण : ब्रिटिशकाळापासूनच प्रलंबित फलटण-पंढरपूर रेल्वे मार्गाच्या निधीचा प्रश्न, तसेच कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्प, निरा देवघर प्रकल्प व जिहे-कठापूर प्रकल्प हे पाणी प्रकल्प त्वरित मार्गी लावून दुष्काळी जनतेला दिलासा द्यावा,’ अशी मागणी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन केली. याबाबत पंतप्रधानांनी सकारात्मकता दर्शविली आहे.

नवी दिल्ली येथे पंतप्रधान कार्यालयात जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर व पत्नी ॲड. जिजामाला नाईक-निंबाळकर यांनी भेट घेऊन माढा लोकसभा मतदारसंघातील विविध प्रश्न सोडविण्याबाबत चर्चा केली.

‘कृष्णा भीमा स्थिरीकरण प्रकल्प हा पश्चिम महाराष्ट्रातील २२ दुष्काळी जिल्ह्याला लाभ देणारा असून, कृष्णा नदीतून वाहून जाणारे अतिरिक्त पाणी कर्नाटक राज्यात न जाता ते आडविले आणि वळविले तर सिंचनाचा पाण्याचा प्रश्न कायमचा सोडण्यास मदत होणार आहे. दरवर्षी येणारी पूरग्रस्त परिस्थिती यामुळे निर्माण होणार नसल्याने ११० टीएमसी महाराष्ट्राला पाणी मिळणारी योजना कायमस्वरूपी मार्गी लावावी आणि यासाठी मुबलक निधी उपलब्ध करावा,’ अशी मागणी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी केली.

ब्रिटिश काळापासून फलटण-पंढरपूर हा महत्त्वाकांक्षी रेल्वे प्रकल्प रखडला आहे. तेथे जाण्यासाठी फलटण ते पंढरपूर हा उपयुक्त रेल्वे मार्ग होणार आहे. केंद्र, राज्य मिळून प्रत्येकी पन्नास टक्के निधी या रेल्वेमार्गासाठी देणार होते; मात्र सत्तांतर झाल्याने महाविकास आघाडीचे सरकार निधी देण्यास टाळाटाळ करीत आहे. फलटण ते पंढरपूर रेल्वे मार्गासाठी निधी देऊन रेल्वे मार्गाचे काम त्वरित सुरू करण्याची मागणी खासदार रणजितसिंह यांनी केली.

नीरा देवघर, तसेच जिहे-कठापूर ही योजना महत्त्वाची असल्याने या योजनेच्या पूर्ततेसाठी लक्ष द्यावे. नीरा-देवघर योजनेसाठी एक हजार कोटी रुपयांची गरज आहे. या योजनेचे पाणी बारामतीकडे पळविले जात आहे. त्यामुळे खंडाळा, फलटण, माळशिरस, सांगोला या दुष्काळी तालुक्यांना पाणी कमी पडत आहे. कै. गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजना (जिहे कटापूर योजना) मुळे माण, खटाव तालुक्यांतील ६७ दुष्काळी गावांना पाणी मिळणार आहे. ही योजना तातडीने मार्गी लावण्यासाठी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतून शंभर टक्के निधी प्राप्त व्हावा, अशी मागणी खासदार रणजितसिंह यांनी केली.

चौकट-

विकासकामांद्वारे ओझे हलके करण्याची ग्वाही

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी देशासाठी बलिदान देणाऱ्या शूूरवीरांची प्रतिमा दिली. दरम्यान, ‘मतदारसंघातील कामांची दिलेली यादी खूप मोठी हे तेच माझ्यावर मोठे ओझे आहे. हे ओझे मी निश्चितच विकासकामांद्वारे हलके करील. तसेच मतदारांचा विश्वास कायम राहील,’ अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.

फोटो

११नरेंद्र मोदी

नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, जिजामाला नाईक-निंबाळकर यांनी शूरवीरांच्या प्रतिमा भेट दिल्या.