शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
3
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
4
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
5
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
6
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
7
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
8
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
9
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
10
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
11
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
12
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
13
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
14
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
15
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
16
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
17
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
18
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
19
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
20
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...

कोरेगाव तालुक्यातील रेल्वे गेट राहणार खुले

By admin | Updated: June 24, 2015 00:46 IST

शशिकांत शिंदे : मतदारसंघातील भुयारी रस्त्यासाठी प्रयत्न

कोरेगाव : कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील सातारा आणि कोरेगाव तालुक्यातील असंख्य गावांना रेल्वे गेटमुळे दळणवळणाच्या प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे. त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आमदार शशिकांत शिंंदे यांनी आता ‘मिशन रेल्वे गेट’ हाती घेतले आहे. मध्य रेल्वे प्रशासनाशी सातत्याने संपर्क ठेवून चिंचणेर संमत निंंब आणि मंगळापूर-तांदुळवाडी येथील गेटचे प्रश्न मार्गी लावले आहेत. आता उर्वरित गेटचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी चांगलीच फिल्डिंग लावली आहे.मध्य रेल्वेचा पुणे-कोल्हापूर रेल्वे मार्गामुळे सातारा तालुक्यात भुर्इंज ते जळगाव रस्त्यावर शिवथर येथे, जिहे-कठापूर ते खेड-नांदगिरी मार्गावर गोगावलेवाडी (पुनर्वसित) येथे तसेच वडूथ-सांगवी रस्त्यावर जरंडेश्वर स्टेशननजिक, सातारा -तांदुळवाडी-कोरेगाव रस्त्यावर कोल्हेश्वर विद्यालयानजीक गेट आहे. तेथील दळणवळणाच्या प्रश्नांची गंभीर स्वरुप धारण केले आहे. या ठिकाणी असलेली गेट सकाळी सात ते सायंकाळी सात यावेळेतच खुली राहत असल्याने लोकांना विशेषत शेतकरी आणि नोकरदारांना विविध प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. शाळा-महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि दुग्ध व्यवसाय करणाऱ्यांना तर मोठा त्रास होता. तांदुळवाडी, मंगळापूर, चिंचणेर संमत निंंब या गावांना कोरेगावातून जाण्यासाठी रेल्वे गेटचा अडसर होता. याबाबतीत मध्य रेल्वेच्या पुणे विभागीय व्यवस्थापकांकडे आमदार शिंदे यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर आता २४ तास रेल्वे गेट खुले करण्याची मागणी मान्य झाली आहे. ही मागणी मान्य झाल्याने सुमारे तिन्ही गावांचा फायदा होणार आहे. सातारा तालुक्यातील चिंंचणेर संमत निंब येथील भुयारी मार्ग पूर्ण करण्यात आल्याने तेथील रेल्वे मार्गाचा आता ग्रामस्थांना आणि विद्यार्थ्यांना त्रास होणार नाही. जिहे-कठापूर ते खेड-नांदगिरी मार्गावर गोगावलेवाडी (पुनर्वसित) येथील रेल्वे गेट मुळे गोडसेवाडी आणि कठापूर येथील ग्रामस्थांना गोडसेवाडी मार्गे जावे लागत आहे. तेथून अवजड वाहने जात नसल्याने त्यांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागतो. हाच रस्ता पुढे सातारा तालुक्यातील जिहेसह अंगापूर गावांकडे जात असल्याने सतत वर्दळ असते. याबाबत मध्य रेल्वे प्रशासनशी बोलणे झाले असून, तांत्रिक बाबींची पूर्तता झाल्यावर ते गेट देखील २४ तास खुले राहील, असा विश्वास आ. शिंंदे यांनी व्यक्त केला. वडूथ-सांगवी रस्त्यावर जरंडेश्वर स्टेशननजीक आणि भुर्इंज ते जळगाव रस्त्यावर शिवथर येथील रेल्वे गेटची अडचण ही विशेषत ऊस वाहतुकीसाठी होत आहे. शेतकऱ्यांसह वाहन मालकांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे ही बाब रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. त्यांनी या विषयामध्ये सकारात्मकता दाखविलेली आहे. येत्या काही दिवसांमध्ये हा प्रश्न निकाली निघेल, असेही आ. शिंदे यांनी निदर्शनास आणून दिले. (प्रतिनिधी)देऊरजवळ रेल्वे गेटमुळे वाहतूक कोंडी होत होती. दिवसातून काही तास हे गेट बंद राहत असल्याने गेटच्या दोन्ही बाजूंना तीन ते चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागत होत्या. याबाबतीत खासदार शरद पवार, खासदार विजयसिंंह मोहिते-पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत चर्चा केली आणि त्यांच्या माध्यमातून रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर तेथे उड्डाण पूल मंजूर झाला आहे,’ अशी माहिती आममदार शिंंदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.