शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

कोरेगाव तालुक्यातील रेल्वे गेट राहणार खुले

By admin | Updated: June 24, 2015 00:46 IST

शशिकांत शिंदे : मतदारसंघातील भुयारी रस्त्यासाठी प्रयत्न

कोरेगाव : कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील सातारा आणि कोरेगाव तालुक्यातील असंख्य गावांना रेल्वे गेटमुळे दळणवळणाच्या प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे. त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आमदार शशिकांत शिंंदे यांनी आता ‘मिशन रेल्वे गेट’ हाती घेतले आहे. मध्य रेल्वे प्रशासनाशी सातत्याने संपर्क ठेवून चिंचणेर संमत निंंब आणि मंगळापूर-तांदुळवाडी येथील गेटचे प्रश्न मार्गी लावले आहेत. आता उर्वरित गेटचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी चांगलीच फिल्डिंग लावली आहे.मध्य रेल्वेचा पुणे-कोल्हापूर रेल्वे मार्गामुळे सातारा तालुक्यात भुर्इंज ते जळगाव रस्त्यावर शिवथर येथे, जिहे-कठापूर ते खेड-नांदगिरी मार्गावर गोगावलेवाडी (पुनर्वसित) येथे तसेच वडूथ-सांगवी रस्त्यावर जरंडेश्वर स्टेशननजिक, सातारा -तांदुळवाडी-कोरेगाव रस्त्यावर कोल्हेश्वर विद्यालयानजीक गेट आहे. तेथील दळणवळणाच्या प्रश्नांची गंभीर स्वरुप धारण केले आहे. या ठिकाणी असलेली गेट सकाळी सात ते सायंकाळी सात यावेळेतच खुली राहत असल्याने लोकांना विशेषत शेतकरी आणि नोकरदारांना विविध प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. शाळा-महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि दुग्ध व्यवसाय करणाऱ्यांना तर मोठा त्रास होता. तांदुळवाडी, मंगळापूर, चिंचणेर संमत निंंब या गावांना कोरेगावातून जाण्यासाठी रेल्वे गेटचा अडसर होता. याबाबतीत मध्य रेल्वेच्या पुणे विभागीय व्यवस्थापकांकडे आमदार शिंदे यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर आता २४ तास रेल्वे गेट खुले करण्याची मागणी मान्य झाली आहे. ही मागणी मान्य झाल्याने सुमारे तिन्ही गावांचा फायदा होणार आहे. सातारा तालुक्यातील चिंंचणेर संमत निंब येथील भुयारी मार्ग पूर्ण करण्यात आल्याने तेथील रेल्वे मार्गाचा आता ग्रामस्थांना आणि विद्यार्थ्यांना त्रास होणार नाही. जिहे-कठापूर ते खेड-नांदगिरी मार्गावर गोगावलेवाडी (पुनर्वसित) येथील रेल्वे गेट मुळे गोडसेवाडी आणि कठापूर येथील ग्रामस्थांना गोडसेवाडी मार्गे जावे लागत आहे. तेथून अवजड वाहने जात नसल्याने त्यांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागतो. हाच रस्ता पुढे सातारा तालुक्यातील जिहेसह अंगापूर गावांकडे जात असल्याने सतत वर्दळ असते. याबाबत मध्य रेल्वे प्रशासनशी बोलणे झाले असून, तांत्रिक बाबींची पूर्तता झाल्यावर ते गेट देखील २४ तास खुले राहील, असा विश्वास आ. शिंंदे यांनी व्यक्त केला. वडूथ-सांगवी रस्त्यावर जरंडेश्वर स्टेशननजीक आणि भुर्इंज ते जळगाव रस्त्यावर शिवथर येथील रेल्वे गेटची अडचण ही विशेषत ऊस वाहतुकीसाठी होत आहे. शेतकऱ्यांसह वाहन मालकांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे ही बाब रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. त्यांनी या विषयामध्ये सकारात्मकता दाखविलेली आहे. येत्या काही दिवसांमध्ये हा प्रश्न निकाली निघेल, असेही आ. शिंदे यांनी निदर्शनास आणून दिले. (प्रतिनिधी)देऊरजवळ रेल्वे गेटमुळे वाहतूक कोंडी होत होती. दिवसातून काही तास हे गेट बंद राहत असल्याने गेटच्या दोन्ही बाजूंना तीन ते चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागत होत्या. याबाबतीत खासदार शरद पवार, खासदार विजयसिंंह मोहिते-पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत चर्चा केली आणि त्यांच्या माध्यमातून रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर तेथे उड्डाण पूल मंजूर झाला आहे,’ अशी माहिती आममदार शिंंदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.