शहरं
Join us  
Trending Stories
1
Shubman Gill Double Century : इंग्लंडच्या मैदानात 'द्विशतकी' खेळीसह शुबमन गिलनं रचला नवा इतिहास
2
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
3
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
4
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
5
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
6
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
7
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
8
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
9
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे
10
पाकिस्तानी संघ भारतात येणार, आशिया कप खेळणार; केंद्र सरकारची परवानगी
11
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
12
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
13
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
14
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
15
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
16
२०२५मध्ये आतापर्यंत कोणत्या देशाने सर्वाधिक शस्त्रे खरेदी केली? यादीत भारताचा क्रमांक कितवा?
17
Criminal Justice 4: ‘माधव मिश्रा’ची साधी भोळी पत्नी, खऱ्या आयुष्यात 'फॅशन क्वीन' आहे खुशबू अत्रे ( PHOTOS )
18
भय इथले संपत नाही! तांदळामुळे कॅन्सरचा मोठा धोका? 'हा' राईस आहे सर्वात सुरक्षित
19
निलेश साबळेपाठोपाठ 'चला हवा येऊ द्या'मधून भाऊ कदमचीही एक्झिट, नेमकं कारण तरी काय?
20
अपात्र, दोषी लाडक्या बहि‍णींना पैसे परत द्यावे लागणार?; अदिती तटकरेंनी विधानसभेत काय सांगितले?

रहिमतपुरात पोलिसांची वेषांतर करून ठोकाठोकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:39 IST

रहिमतपूर : रहिमतपुरात पोलिसांनी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी दुचाकींवरून व रस्त्याने विनाकारण विनामास्क फिरणाऱ्या १५२ लोकांवर दंडात्मक कारवाई केली. त्यांच्याकडून ...

रहिमतपूर : रहिमतपुरात पोलिसांनी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी दुचाकींवरून व रस्त्याने विनाकारण विनामास्क फिरणाऱ्या १५२ लोकांवर दंडात्मक कारवाई केली. त्यांच्याकडून ३० हजार ४०० रुपये वसूल केले आहेत. दरम्यान, रहिमतपुरातील गल्लोगल्लीत गटागटाने बसून गप्पांचा फड भरविणाऱ्या युवकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी वेषांतर करून चांगलीच ठोकाठोकी केली.

कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर परिसरासह जिल्हाभर कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. दोन-तीन दिवसांपूर्वी एकाच दिवसांत रहिमतपुरात तब्बल ३४ कोरोनाबाधित आढळले आहेत. हा संसर्ग रोखण्यासाठी इतर प्रशासकीय यंत्रणेबरोबर पोलीस दलही ठोस पावले उचलत आहे. विनामास्क रस्त्यावरून व दुचाकींवर फिरून कोरोना विषाणूला आमंत्रण देणाऱ्यामुळे संसर्ग वाढत आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पोलिसांनी गेल्या दहा दिवसांत रहिमतपूर येथील गांधी चौक, बसस्थानक परिसर, चांदणी चौक, आदर्श शाळा चौक, कोरेगाव चौक आदी ठिकाणी रस्त्याने पायी फिरणाऱ्या व दुचाकीवरून विनामास्क फिरणाऱ्या १५२ लोकांकडून प्रत्येकी २०० रुपये याप्रमाणे ३० हजार ४०० रुपये दंड वसूल केला.

दरम्यान, संचारबंदी व जमावबंदी या शासकीय आदेशाचे उल्लंघन करून रहिमतपुरातील अनेक गल्लीमध्ये ठिकठिकाणी युवकांची टोळकी सायंकाळी ठराविक वेळेत बसून गप्पांचा फड रंगवत होती. या टोळक्यांमुळे कोरोना संसर्ग वाढीला वेग येण्याची भीती निर्माण झाली होती. पाेलिसांच्या सायरनचा आवाज येताच टोळकी पसार होत होती. या टोळक्याला अद्दल घडविण्यासाठी रहिमतपूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश कड यांच्यासह काही पोलीस कर्मचाऱ्यांनी वेषांतर करून गटागटाने बसणाऱ्या टोळकीवर हल्लाबोल केला. साध्या वेशात दांडकी घेऊन युवकांच्या टोळक्याच्या दिशेने पोलीस चालून येत असल्याचे पाहून अनेकांनी धूम ठोकली. मात्र जे तावडीत सापडले त्यांना पोलिसांच्या लाठीचा चांगलाच प्रसाद मिळाला. दोन दिवस पोलिसांचा मार पडत असल्यामुळे अनेक गल्लीतील टोळकी बसणारी ठिकाणे रिकामी पडू लागली आहेत.

(चौकट)

घराबाहेर पडल्यास कारवाई होणारच

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लोकांनी शासकीय आदेशाचे पालन करणे गरजेचे आहे. लॉकडाऊन संदर्भात व्यापारी संघटनेला केलेल्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. परंतु काही लोकांकडून या आदेशाचे उल्लंघन होत आहे. त्यामुळे संसर्ग रोखण्यासाठी नाइलाजास्तव दंडात्मक कारवाई करावी लागत आहे. लोकांनी शासकीय आदेशाचे पालन करावे. विनाकारण विनामास्क घराबाहेर पडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचा इशारा रहिमतपूरचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश कड यांनी दिला आहे.

२३रहिमतपूर

फोटो : रहिमतपूर, ता. कोरेगाव येथे पोलिसांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी कारवाईचा दणका लावल्यामुळे रस्ते सुनसान झाले आहेत. (छाया : जयदीप जाधव)