शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

पाचगणीतील अंधाराला कंटाळून पर्यटकांनी ठोकला रामराम !

By admin | Updated: June 26, 2015 22:00 IST

जोरदार पाऊस : चार दिवसांपासून वीजपुरवठा खंडित

पाचगणी : गेल्या चार दिवसांपासून येथील वीजपुरवठा खंडित असल्याने नागरिक व पर्यटकांना अडचणींना तोंड द्यावे लागले. नागरिकांसह पर्यटकांना अंधाराचा सामना करावा लागला. तसेच येथे आलेले अनेक पर्यटक पाचगणी सोडून गेले. पाचगणी व महाबळेश्वर ही जागतिक पर्यटन स्थळे असून, या ठिकाणी पावसाळ्याचा आनंद घेण्यासाठी अनेक हौशी पर्यटक येतात. पाचगणीत गेल्या पाच-सहा दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून, गेल्या चार दिवसांपासून वीजपुरवठा खंडित झाला आहे. पावसाळ्यापूर्वी धोकादायक झाडे तोडणे आणि तारांवर लटकणाऱ्या फांद्या छाटण्याचे काम वीज वितरणकडून केले जाते; परंतु गेल्या दोन वर्षांपासून या कामाकडे कोणीच लक्ष दिल्याचे दिसून येत नाही. परिणामी वादळी वाऱ्याने विद्युतवाहिन्यांवर फांद्या पडून वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. आजही कित्येक ठिकाणी विजेच्या तारांवर धोकायदायकरीत्या लटकत असलेल्या फांद्या दिसत आहेत. कित्येक ठिकाणी विजेच्या खांबावर वेलींचे साम्राज्य आहे. या गोष्टींकडे वेळीच लक्ष दिले असते तर आज ही वेळ आली नसती, अशी प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे.गेले चार दिवस सायंकाळपासूनच पाचगणीची संपूर्ण बाजारपेठ अंधारात गडप होत आहे. नागरिकांना पिण्याचे पाणीही मिळत नाही. वीज नसल्याने बोअरवेलच्या मोटार बंद आहेत. अशा अनेक समस्यांना नागरिकांना व व्यापाऱ्यांना सामोरे जावे लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे. एवढे असूनही वीजवितरण कंपनीचा कारभार सुस्तावला आहे. अपुरे कर्मचारी आणि कामचा विस्तार पाहता वरिष्ठांनी जादा कर्मचारी किंवा खासगी माणसे घेऊन काम करणे गरजेचे असूनही अधिकारी कानाडोळा करत आहेत. याबद्दल संताप व्यक्त होत आहे. (वार्ताहर) अन् शुक्रवारी रात्री वीज आली...झाडे खडसणे आणि बुंध्यात सडलेली झाडे तोडण्यास प्रशासन परवानगी देत नसल्याने भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात दाखल केलेल्या अर्जाचा प्रशासनाने आणि हाय मॉनिटरिंग कमिटीने त्वरित निपटारा करून झाडे तोडण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी होत आहे. दरम्यान, चार दिवसांपूर्वी खंडित झालेला वीजपुरवठा पुन्हा शुक्रवारी रात्री पूर्ववत झाला.