शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

रा. ना. चव्हाण यांच्या विचारांची गरज

By admin | Updated: April 10, 2017 23:36 IST

बाबा आढाव : अशोक चौसाळकर यांचा ‘महर्षी विठ्ठल रामजी शिंदे’ पुरस्काराने गौरव

सातारा : ‘माणूसपण आणि विधायक सामर्थ्य व शक्तींना पुढे नेण्याचे काम महर्षी विठ्ठल रामजी शिंदे व रा. ना. चव्हाण यांनी केले. आजच्या काळात त्यांच्या लेखनाचा अभ्यास करून भूमिका घेणे ही काळाची गरज आहे,’ असे उद्गार डॉ. बाबा आढाव यांनी काढले.वाई येथील रा. ना. चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने चव्हाण यांच्या २४ स्मृतिदिनी व जन्मशताब्दी वर्षात दिला जाणारा २१ वा ‘महर्षी विठ्ठल रामजी शिंदे’ पुरस्कार यावर्षी १९८० नंतरच्या काळात मराठी भाषेतील वैचारिक साहित्याच्या क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावणारे कृतिशील विचारवंत प्रा. डॉ. अशोक चौसाळकर यांना ज्येष्ठ साहित्यिक व समीक्षक प्रा. डॉ. द. ता. भोसले यांच्या हस्ते व सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमात डॉ. बाबा आढाव बोलत होते.कार्यक्रमास प्रतिष्ठानचे विश्वस्त संभाजीराव पाटणे, डॉ. नागनाथ कोतापल्ले, गौरी चौसाळकर, प्राचार्य अभयकुमार साळुंखे, पणजीचे कॉ. रमेश कोलवाळकर, डॉ. अंजली जोशी, प्रा. डॉ. निशा भंडारे, रमेश चव्हाण, सतीश कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी अध्यक्षीय भाषणात डॉ. बाबा आढाव म्हणाले, ‘महर्षी शिंदे गेले तेव्हा मी १५ तर रा. ना. गेले तेव्हा ७५ वर्षांचा होतो. त्यांच्या हयातीत काँग्रेसची स्थापना झाली. त्यानंतर सामाजिक स्वातंत्र्याचा प्रश्न उभा करण्याचे काम शिंदे यांनी केले. रा. ना. चव्हाण यांनी आंबेडकरांची वैचारिक जडणघडण स्वीकारली. आधाराशिवाय कोणतीही क्रांती यशस्वी होत नाही हे दाखवून दिले.’यावेळी प्रतिष्ठानला देणगी देणाऱ्या विविध व्यक्ती व संस्थांचा सत्कार बाबा आढाव यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमात रमेश चव्हाण संपादित ‘महर्षी विठ्ठल रामजी शिंदे’ या रा. ना. चव्हाण यांच्या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. कोत्तापल्ले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संभाजीराव पाटणे, रमेश चव्हाण, वैशाली चव्हाण, रमेश कोलवाळकर, निशा भंडारे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा. निरंजन फरांदे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. प्रियंका साबळे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी) पुरस्कार म्हणजे विचारांचा गौरव : चौसाळकरसत्काराला उत्तर देताना प्रा. डॉ. अशोक चौसाळकर म्हणाले, ‘आज मिळालेला पुरस्कार हा मी विचारांचा गौरव समजतो. रा. ना. व महर्षींचे संबंंध गुरु-शिष्याचे होते. रा .ना. यांनी केलेले लेखन अभ्यासणे जरुरीचे आहे. मी ४० वर्षे त्यांचे लेख वाचत आहे. विद्यापीठातील चर्चासत्रात आल्याने त्याचे व माझे जवळचे संबंध निर्माण झाले. त्यांची स्मृती अतिशय तीक्ष्ण होती. राज्याचा सखोल अभ्यास होता. अशा विचारवंताची उपेक्षाच झाली.विचारांना बळकटी देण्याचे काम : कोतापल्लेडॉ. नागनाथ कोतापल्ले म्हणाले, ‘रा. ना. चव्हाण यांच्या विवेकी विचारांना बळकटी देण्याचे काम या पुरस्कारामुळे होते आहे. समतोल व्यक्तिमत्त्व राखत समाजावर भाष्य करण्याचे काम रा. ना. चव्हाण यांनी केले. त्यांचे वाड्.मय वाचणे आज काळाची गरज आहे. लेखन प्रकाशन व अनेक उपक्रमांतून समाजाचे ॠण फेडण्याचे काम चव्हाण कुटुंब करत आहे,’ वैचारिक संपत्तीचे जतन : भोसलेद. ता. भोसले म्हणाले, ‘वडिलांची वैचारिक संपत्ती जतन करणे, प्रकाशित करणे व लोकांपुढे आणण्याचे कमालीचे मोठे काम चव्हाण कुटुंब करत आहे. मोठ्या कुटुंबापेक्षा सुसंस्कारीत कुटुंबाचा सहवास लाभणे आनंददायी आहे. डॉ. चौसाळकर यांचे बरेच साहित्य मी वाचले आहे. त्यांना हा पुरस्कार मिळणे हा दुग्धशर्करा योग आहे. संशोधन व प्रबोधन कौशल्य त्यांच्यात पाहायला मिळते.