शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed Crime News : परळीत तरुणाला बेदम मारहाण! छातीवर बसला, सभोवती कडं केलं, काठ्यांनी बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल
2
गौप्यस्फोट! अटकेआधी संजय राऊतांचा अमित शाहांना फोन; संतापून म्हणाले, "मला अटक करा..."
3
पाकिस्तानची तिसऱ्या देशाच्या मदतीने भारतात माल निर्यात करण्याची तयारी; सरकारने घेतली दखल
4
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
5
पुढच्या वर्षी बंद होणार Vodafone Idea? सरकारकडे मागितली मदत; म्हटलं, 'काम करणं कठीण...'
6
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
7
आयुष्याचं ‘सुरक्षा चक्र' आहेत या ३ स्कीम्स, कठीण काळात साथ; कमी कमाई असणारेही करू शकतात गुंतवणूक
8
भारताच्या हल्ल्यात नूर खानसह अनेक एअरबेस उद्ध्वस्त; पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांचा कबुलीनामा
9
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
10
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
11
सुटीत गावी आलेल्या न्यायाधीशांनी स्वत: कापले गावातील मुलांचे केस; नेमकं घडलं काय?
12
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
13
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
14
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
15
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
16
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
17
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
18
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
19
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
20
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई

रा. ना. चव्हाण यांच्या विचारांची गरज

By admin | Updated: April 10, 2017 23:36 IST

बाबा आढाव : अशोक चौसाळकर यांचा ‘महर्षी विठ्ठल रामजी शिंदे’ पुरस्काराने गौरव

सातारा : ‘माणूसपण आणि विधायक सामर्थ्य व शक्तींना पुढे नेण्याचे काम महर्षी विठ्ठल रामजी शिंदे व रा. ना. चव्हाण यांनी केले. आजच्या काळात त्यांच्या लेखनाचा अभ्यास करून भूमिका घेणे ही काळाची गरज आहे,’ असे उद्गार डॉ. बाबा आढाव यांनी काढले.वाई येथील रा. ना. चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने चव्हाण यांच्या २४ स्मृतिदिनी व जन्मशताब्दी वर्षात दिला जाणारा २१ वा ‘महर्षी विठ्ठल रामजी शिंदे’ पुरस्कार यावर्षी १९८० नंतरच्या काळात मराठी भाषेतील वैचारिक साहित्याच्या क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावणारे कृतिशील विचारवंत प्रा. डॉ. अशोक चौसाळकर यांना ज्येष्ठ साहित्यिक व समीक्षक प्रा. डॉ. द. ता. भोसले यांच्या हस्ते व सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमात डॉ. बाबा आढाव बोलत होते.कार्यक्रमास प्रतिष्ठानचे विश्वस्त संभाजीराव पाटणे, डॉ. नागनाथ कोतापल्ले, गौरी चौसाळकर, प्राचार्य अभयकुमार साळुंखे, पणजीचे कॉ. रमेश कोलवाळकर, डॉ. अंजली जोशी, प्रा. डॉ. निशा भंडारे, रमेश चव्हाण, सतीश कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी अध्यक्षीय भाषणात डॉ. बाबा आढाव म्हणाले, ‘महर्षी शिंदे गेले तेव्हा मी १५ तर रा. ना. गेले तेव्हा ७५ वर्षांचा होतो. त्यांच्या हयातीत काँग्रेसची स्थापना झाली. त्यानंतर सामाजिक स्वातंत्र्याचा प्रश्न उभा करण्याचे काम शिंदे यांनी केले. रा. ना. चव्हाण यांनी आंबेडकरांची वैचारिक जडणघडण स्वीकारली. आधाराशिवाय कोणतीही क्रांती यशस्वी होत नाही हे दाखवून दिले.’यावेळी प्रतिष्ठानला देणगी देणाऱ्या विविध व्यक्ती व संस्थांचा सत्कार बाबा आढाव यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमात रमेश चव्हाण संपादित ‘महर्षी विठ्ठल रामजी शिंदे’ या रा. ना. चव्हाण यांच्या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. कोत्तापल्ले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संभाजीराव पाटणे, रमेश चव्हाण, वैशाली चव्हाण, रमेश कोलवाळकर, निशा भंडारे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा. निरंजन फरांदे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. प्रियंका साबळे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी) पुरस्कार म्हणजे विचारांचा गौरव : चौसाळकरसत्काराला उत्तर देताना प्रा. डॉ. अशोक चौसाळकर म्हणाले, ‘आज मिळालेला पुरस्कार हा मी विचारांचा गौरव समजतो. रा. ना. व महर्षींचे संबंंध गुरु-शिष्याचे होते. रा .ना. यांनी केलेले लेखन अभ्यासणे जरुरीचे आहे. मी ४० वर्षे त्यांचे लेख वाचत आहे. विद्यापीठातील चर्चासत्रात आल्याने त्याचे व माझे जवळचे संबंध निर्माण झाले. त्यांची स्मृती अतिशय तीक्ष्ण होती. राज्याचा सखोल अभ्यास होता. अशा विचारवंताची उपेक्षाच झाली.विचारांना बळकटी देण्याचे काम : कोतापल्लेडॉ. नागनाथ कोतापल्ले म्हणाले, ‘रा. ना. चव्हाण यांच्या विवेकी विचारांना बळकटी देण्याचे काम या पुरस्कारामुळे होते आहे. समतोल व्यक्तिमत्त्व राखत समाजावर भाष्य करण्याचे काम रा. ना. चव्हाण यांनी केले. त्यांचे वाड्.मय वाचणे आज काळाची गरज आहे. लेखन प्रकाशन व अनेक उपक्रमांतून समाजाचे ॠण फेडण्याचे काम चव्हाण कुटुंब करत आहे,’ वैचारिक संपत्तीचे जतन : भोसलेद. ता. भोसले म्हणाले, ‘वडिलांची वैचारिक संपत्ती जतन करणे, प्रकाशित करणे व लोकांपुढे आणण्याचे कमालीचे मोठे काम चव्हाण कुटुंब करत आहे. मोठ्या कुटुंबापेक्षा सुसंस्कारीत कुटुंबाचा सहवास लाभणे आनंददायी आहे. डॉ. चौसाळकर यांचे बरेच साहित्य मी वाचले आहे. त्यांना हा पुरस्कार मिळणे हा दुग्धशर्करा योग आहे. संशोधन व प्रबोधन कौशल्य त्यांच्यात पाहायला मिळते.