शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांपुढे भाकड जनावरांचा प्रश्न

By admin | Updated: December 8, 2015 00:31 IST

चाऱ्यासाठी वणवण: पशुखाद्याचे वाढते भाव; रब्बी हंगामही वाया जाण्याची भीती--दूध का दूध.. कष्टावर पाणी

रशीद शेख- औंध--राज्यात गोहत्या बंदीचा कायदा लागू झाल्याने दूध न देणाऱ्या जनावरांचा प्रश्न गंभीर बनला आहे. दुधाचे दर, पोषक चाऱ्याची कमतरता, पशुखाद्याचे वाढते भाव यामुळे दूध देणारी जनावरे सांभाळणे शेतकऱ्यांसाठी जिकिरीचे बनले असून, दूध न देणाऱ्या जनावरांचे काय असा प्रश्न दूध उत्पादकांसमोर पडला आहे.सध्या खटाव तालुक्यात खरीप हंगामाबरोर रब्बी हंगाम ही वाया जाईल, अशी भीती शेतकऱ्यांना वाटू लागली आहे. तसेच तालुक्यात शेतकऱ्यांच्या जनावरांना चरण्यासाठी कुरणे, पडिक जमिनी मर्यादित स्वरुपात आहेत. तसेच हिरवा चारा, गवत, मका, सातू, सरकीच्या बिया या पशुखाद्यांची चणचण आहे. त्यामुळे भाकड जनावरांचे आणखी जास्त कुपोषण होते.तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना स्वत:च्या कुटुंबापुरते पाणी मिळविण्यासाठी मैलभर जावे लागते अशी येथील स्थिती आहे. मग जनावरांना पाणी व धान्याचे नियोजन कसे करायचे, वैरण कोठून व किती आणायची. त्यातच दुष्काळग्रस्त परिस्थितीमुळेही जनावरे उपासमारीच्या विळख्यात आहेत. मग या भाकड, वृद्ध, आजारी जनावरांचा दूध उत्पादकांनी आर्थिक बोजा कसा पेलायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे. याकडे संबंधितांचे लक्ष गेले तरच दुष्काळी भागातील शेतकरी टिकणार आहे. सध्या खटाव तालुक्यात ऊसतोड सुरू आहे. जिथे तोड सुरू आहे त्या ठिकाणी शेतकरी जाऊन जनावरांना वाडे आणत आहेत. शेतकरी त्यासाठी दररोज जात आहेत. त्यांचे येण्या-जाण्याचा खर्च, कष्ट, दुधाळ जनावरांमधून येणारे उत्पन्न व भाकड जनावरांचा खर्च वजा जाता दूध उत्पादक तोट्यात असल्याचे विदारक चित्र दिसत आहे. ज्या पद्धतीने सुशिक्षित बेकार, तरुण वर्ग या व्यवसायाकडे आकर्षित होऊन वळला होता. आता त्याच वेगाने हे क्षेत्र सोडण्याच्या तयारी असलेले दूध उत्पादक पाहावयास मिळत आहेत. सध्या तालुक्यात जनावरांच्या चाऱ्याची मोठी अडचण निर्माण झाली असून, स्थानिक पातळीवर शासकीय यंत्रनेने चारा डेपोची व्यवस्था करावी, एवढीच माफक अपेक्षा खटाव तालुक्यातील दूध उत्पादकांनी व शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. गोठ्यासह जनावरे काढली विकायला...गेली अनेक वर्षे लाखो रुपये खर्च करून दूध व्यवसाय करणाऱ्या औंधमधील एका शेतकऱ्याने आपला गोठ्यासह जनावरे व सर्व यंत्रसामग्रीच विकायला काढली आहे. दुधाळ जनावरे व भाकड जनावरांचा खर्चाचा ताळमेळ घालता येत नसल्याने हा गोठाच विकण्याचे ठरविले आहे.