शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
3
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
4
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
5
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
6
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
7
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
8
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
9
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
10
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
11
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
12
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
13
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
14
निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला
15
बिहार निकालाचा करिश्मा! बाजारात अखेरच्या तासात 'बुल्स रन'; 'या' क्षेत्रात मोठी वाढ, आयटीत मात्र विक्रीचा दबाव
16
पाकिस्तानातून भारतीय महिला अचानक झाली गायब! शोध घेताच समोर आलं धक्कादायक सत्य
17
IND vs SA 1st Test Day 1 Stumps: पहिला दिवस बुमराहनं गाजवला! आता तिसऱ्या क्रमांकावरील प्रयोगावर नजरा
18
बिहारमध्ये भाजपा नितीश कुमार यांचीच 'विकेट' काढणार? स्वत:चा CM बसवायला JDU गरजच नाही...
19
नीतीश कुमारांचं M अन् मोदींच्या Y समोर, तेजस्वींचं 'MY' समीकरण फेल; NDA साठी हे 2 फॅक्टर ठरले 'टर्निंग पॉइंट'!
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅव्हल्सची चाकं पुन्हा पंक्चर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:34 IST

सातारा : पुणे - बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील सातारा या पर्यटनस्थळी चित्रीकरणासाठी पोषक वातावरण असल्याने हे शहर पर्यटन, प्रवासी वाहतुकीच्या ...

सातारा : पुणे - बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील सातारा या पर्यटनस्थळी चित्रीकरणासाठी पोषक वातावरण असल्याने हे शहर पर्यटन, प्रवासी वाहतुकीच्या नकाशावर आले आहे. जिल्ह्यातून एस. टी., रेल्वेला मिळतो तेवढाच प्रतिसाद खासगी प्रवासी वाहतुकीलाही मिळत होता. परंतु, कोरोनामुळे सारेच चित्र बदलले. लॉकडाऊननंतर परिस्थिती पूर्वपदावर येत असतानाच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला अन् ट्रॅव्हल्सची चाकं पुन्हा पंक्चर झाली.

साताऱ्यातून पुणे, मुंबई, विदर्भ, मराठवाड्यासह बंगलोर आदी शहरांमध्ये खासगी प्रवासी वाहतूक केली जाते. दिवाळी, गौरी-गणपतीमध्ये राज्य परिवहन महामंडळाच्या गाड्यांना मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. अशावेळी सातारकरांना खासगी प्रवासी वाहतुकीचा मोठा आधार मिळतो. या व्यवसायातून चांगले उत्पन्न मिळत असल्यामुळे असंख्य बेरोजगार तरुणांनी बँकांमधून कर्ज काढून वाहने खरेदी केली. मात्र, गेल्यावर्षी कोरोनाचा शिरकाव झाला अन् मार्चपासून सार्वजनिक प्रवासी वाहतूक बंद झाली. त्यामुळे सात-आठ महिने हा व्यवसाय बंद होता. दिवाळीनंतर तो सुरू झाला. सर्व व्यवस्थित होत असतानाच आता पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला. विदर्भ, मराठवाड्यासह मुंबईत रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे लोकांनी प्रवास करणे बंद केले आहे तर कर्नाटक सरकारनेही निर्बंध घातले आहेत. याचा फटका खासगी प्रवासी वाहतुकीला बसत आहे.

चौकट :

५०

कोरोनाआधी रोज बाहेरगावी जाणाऱ्या ट्रॅव्हल्सची संख्या

१२

सध्याची संख्या

कर्नाटकने प्रवेशावर निर्बंध लादले

कमी अंतरातील प्रवासासाठी शक्यतो एस. टी. किंवा स्वत:कडील वाहनाचा वापर केला जातो. मात्र, लांब अंतरातील प्रवास कमी त्रासाचा व्हावा म्हणून खासगी प्रवासी वाहतुकीचा पर्याय निवडला जातो. मात्र, महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने कर्नाटकसह शेजारील अन्य राज्यांनी प्रवेशावर निर्बंध लादले आहेत. त्याचा फटका खासगी प्रवासी वाहतुकीला बसत आहे.

कोट १

शासकीय नोकर भरतीसाठी अनेकदा प्रयत्न करुनही यश मिळाले नाही. त्यामुळे कर्ज काढून गाडी खरेदी केली. सर्व व्यवस्थित सुरू असतानाच लॉकडाऊन लागले. त्यामुळे कितीतरी महिने गाडी दारात उभी होती. आता पुन्हा प्रवासी वाहतूक बंद होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे अडचणीत भरच पडणार आहे.

- दत्ता माने,

व्यावसायिक.

मुंबईला जाण्यासाठी एस. टी.ने वेळ लागतो. शिवशाही सुरू झाली पण दर जास्त असल्याने खासगी प्रवासी बसमुळे कमी खर्चात जाता येत होते. पण कोरोनानंतर या बस बंद झाल्या अन् आता त्यांची संख्याही कमी झाल्याने गैरसोय होत आहे.

- प्रशांत शरणार्थी, प्रवासी.

कोरोनामुळे गेल्या वर्षभरात खासगी प्रवासी वाहतुकीसमोरील अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे सरकारने सहानुभूतीने विचार करण्याची गरज आहे. प्रवासी कर, विम्याच्या हप्त्यात सवलत देण्याची गरज आहे.

- प्रकाश गवळी,

संचालक, ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेस, नवी दिल्ली.