शहरं
Join us  
Trending Stories
1
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
2
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
3
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
4
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
5
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
6
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
7
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
8
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
9
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ
10
यूपीपाठोपाठ दिल्लीत एन्काउंटरमध्ये वाढ, जूनच्या पहिल्या पाच दिवसांत पाच एन्काउंटर
11
नेपाळच्या ७ हजार लोकांना अमेरिका सोडावी लागणार, अमेरिकेने विशेष देशाचा दर्जा काढून घेतला
12
अंध वकिलाकडून सुप्रीम कोर्टात प्रथमच युक्तिवाद, भारतीय न्यायव्यवस्थेत ऐतिहासिक क्षण
13
जळक्या नोटा : न्या. वर्मांपुढे आता राजीनाम्याचाच पर्याय
14
मणिपूर पेटले, निदर्शकांनी अंगावर घेतले पेट्रोल ओतून
15
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
16
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
17
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
18
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
19
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
20
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...

पटसंख्येच्या निकषातून दुर्गम भागातील शाळांना अभय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:54 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : सर्व शिक्षा अभियानांतर्गत शासनाने सर्वांना शिक्षणाचे अधिकार उपलब्ध करून दिले आहेत. शिवाय शाळांना किलोमीटरचे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : सर्व शिक्षा अभियानांतर्गत शासनाने सर्वांना शिक्षणाचे अधिकार उपलब्ध करून दिले आहेत. शिवाय शाळांना किलोमीटरचे निकषही घालून दिले आहेत. इंग्रजी माध्यमांबरोबर अन्य बोर्डाच्या अभ्यासक्रमांकडे पालकांचा ओढा अधिक आहे. त्यामुळेच ग्रामीण भागातील जिल्हा परिषदांच्या शाळांना घरघर लागली आहे. जिल्ह्यातील प्राथमिक शाळा १०१४ आहेत. शासनाने एक ते वीस पटसंख्या असणाऱ्या शाळांना कुलूप ठोकण्याचा निर्णय घेतला आहे. शासकीय निकषानुसार जिल्ह्यातील या शाळा बंद होऊ शकतात. मात्र जिल्हयातील कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा दुर्गम भागातील असल्याने त्यांना अभय मिळणार आहे.

सर्वशिक्षा अभियानाच्या निकषानुसार पहिली ते पाचवीपर्यंतच्या शाळांना किमान एक किलोमीटर, तर सहावी ते आठवीपर्यंतच्या शाळांना दोन ते तीन किलोमीटरचा निकष आहे. संबंधित किलोमीटरच्या अंतरावर असणाऱ्या शाळांमध्ये ज्या शाळेची पटसंख्या अधिक आहे, तेथे कमी पटसंख्या असणाऱ्या शाळांचे समायोजन करण्यात येते. मात्र एक ते वीस पटसंख्या असणाऱ्या बहुतांश शाळा दुर्गम भागामध्ये आहेत. समायोजनासाठी जवळपास शाळा नाही. त्यामुळे कमी पटसंख्या असतानाही, विशेष बाब म्हणून या शाळांचे समायोजन न करता त्या सुरूच ठेवण्यात येणार आहेत.

कोणत्याच शाळांचे समायोजन नाही

पटसंख्येअभावी जिल्ह्यातील काही शाळा बंद करण्यात आल्या असल्या, तरी एक ते वीस पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद न करता, सुरूच ठेवण्याचा निर्णय जिल्हा परिषद शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ... शाळा नियमानुसार समायोजित होणे गरजेचे असताना, दुर्गम भागातील विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी शाळांचे समायोजन होणार नाही.

कोट :

शासन निर्णयानुसार शाळांचे समायोजन करणे क्रमप्राप्त आहे, मात्र दुर्गम भागातील शाळा असून, तेथील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत, त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी विशेष बाब म्हणून शाळा बंद न करता, सुरूच ठेवण्यात येणार आहेत. परिणामी जिल्ह्यातील १४१० शाळांमध्ये अध्यापन व शैक्षणिक कामकाज सुरू राहणार आहे.

- प्रभावती कोळेकर, शिक्षणाधिकारी

शिक्षकांनाही अभय

जिल्ह्यात ० ते १९ पटसंख्या असणाऱ्या १०१४ शाळा आहेत. शाळांचे समायोजन झाले, तर नियमानुसार शिक्षकांचेही समायोजन करावे लागते, मात्र शाळांमुळे शिक्षकांनाही अभय प्राप्त झाले आहे.

विद्यार्थ्यांची सोय

पटसंख्येच्या निकषानुसार १०१४ शाळेतील विद्यार्थ्यांचे अन्य शाळांमध्ये समायोजन क्रमप्राप्त होते. मात्र दुर्गम भागातील शाळा असल्याने व गावापासून अंतर अधिक असल्याने लहान मुलांना अन्य शाळेत जाण्यासाठी कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. परिणामी शाळांचे समायोजन करण्याऐवजी त्या सुरूच ठेवल्या आहेत.