शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
2
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
3
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
4
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
5
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
6
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
7
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
8
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
9
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
10
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
11
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
12
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
13
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
14
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
15
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
16
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
17
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
18
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
19
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
20
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक

पटसंख्येच्या निकषातून दुर्गम भागातील शाळांना अभय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:54 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : सर्व शिक्षा अभियानांतर्गत शासनाने सर्वांना शिक्षणाचे अधिकार उपलब्ध करून दिले आहेत. शिवाय शाळांना किलोमीटरचे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : सर्व शिक्षा अभियानांतर्गत शासनाने सर्वांना शिक्षणाचे अधिकार उपलब्ध करून दिले आहेत. शिवाय शाळांना किलोमीटरचे निकषही घालून दिले आहेत. इंग्रजी माध्यमांबरोबर अन्य बोर्डाच्या अभ्यासक्रमांकडे पालकांचा ओढा अधिक आहे. त्यामुळेच ग्रामीण भागातील जिल्हा परिषदांच्या शाळांना घरघर लागली आहे. जिल्ह्यातील प्राथमिक शाळा १०१४ आहेत. शासनाने एक ते वीस पटसंख्या असणाऱ्या शाळांना कुलूप ठोकण्याचा निर्णय घेतला आहे. शासकीय निकषानुसार जिल्ह्यातील या शाळा बंद होऊ शकतात. मात्र जिल्हयातील कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा दुर्गम भागातील असल्याने त्यांना अभय मिळणार आहे.

सर्वशिक्षा अभियानाच्या निकषानुसार पहिली ते पाचवीपर्यंतच्या शाळांना किमान एक किलोमीटर, तर सहावी ते आठवीपर्यंतच्या शाळांना दोन ते तीन किलोमीटरचा निकष आहे. संबंधित किलोमीटरच्या अंतरावर असणाऱ्या शाळांमध्ये ज्या शाळेची पटसंख्या अधिक आहे, तेथे कमी पटसंख्या असणाऱ्या शाळांचे समायोजन करण्यात येते. मात्र एक ते वीस पटसंख्या असणाऱ्या बहुतांश शाळा दुर्गम भागामध्ये आहेत. समायोजनासाठी जवळपास शाळा नाही. त्यामुळे कमी पटसंख्या असतानाही, विशेष बाब म्हणून या शाळांचे समायोजन न करता त्या सुरूच ठेवण्यात येणार आहेत.

कोणत्याच शाळांचे समायोजन नाही

पटसंख्येअभावी जिल्ह्यातील काही शाळा बंद करण्यात आल्या असल्या, तरी एक ते वीस पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद न करता, सुरूच ठेवण्याचा निर्णय जिल्हा परिषद शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ... शाळा नियमानुसार समायोजित होणे गरजेचे असताना, दुर्गम भागातील विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी शाळांचे समायोजन होणार नाही.

कोट :

शासन निर्णयानुसार शाळांचे समायोजन करणे क्रमप्राप्त आहे, मात्र दुर्गम भागातील शाळा असून, तेथील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत, त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी विशेष बाब म्हणून शाळा बंद न करता, सुरूच ठेवण्यात येणार आहेत. परिणामी जिल्ह्यातील १४१० शाळांमध्ये अध्यापन व शैक्षणिक कामकाज सुरू राहणार आहे.

- प्रभावती कोळेकर, शिक्षणाधिकारी

शिक्षकांनाही अभय

जिल्ह्यात ० ते १९ पटसंख्या असणाऱ्या १०१४ शाळा आहेत. शाळांचे समायोजन झाले, तर नियमानुसार शिक्षकांचेही समायोजन करावे लागते, मात्र शाळांमुळे शिक्षकांनाही अभय प्राप्त झाले आहे.

विद्यार्थ्यांची सोय

पटसंख्येच्या निकषानुसार १०१४ शाळेतील विद्यार्थ्यांचे अन्य शाळांमध्ये समायोजन क्रमप्राप्त होते. मात्र दुर्गम भागातील शाळा असल्याने व गावापासून अंतर अधिक असल्याने लहान मुलांना अन्य शाळेत जाण्यासाठी कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. परिणामी शाळांचे समायोजन करण्याऐवजी त्या सुरूच ठेवल्या आहेत.