शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

येळीव भेगाळला... ग्रामस्थ चवताळला!

By admin | Updated: March 9, 2016 01:13 IST

औंधमध्ये भीषण पाणीटंचाई : खासगी विहीर, कूपनलिकांनी तळ गाठला; तलावात पाणी सोडण्याची मागणी

रशिद शेख -- औंध --औंध गावास पाणीपुरावठा करणाऱ्या येळीव तलावातील पाणीसाठा संपला आहे. त्यामुळे औंधमध्ये भीषण पाणीटंचाईचे संकट ओढवले आहे. येळीव तलावात पाणी सोडावे, अशी जोरदार मागणी होत आहे. येळीव तलावातून मागील दोन वर्षांपासून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. परिसरातील विहिरींनी व खासगी बोअरवेलने तळ गाठला आहे. ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी पायपीट करावी लागत आहे. सद्य:स्थितीत येळीव तलावातील पाणीसाठा पूर्णपणे आटला असून, मागील दोन दिवसांपासून औंधवासीयांना पाणी मिळणे बंद झाले आहे. मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात पाणीटंचाई सुरू झाल्याने संपूर्ण उन्हाळा कसा काढायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे. येळीव तलावात पाणी सोडण्याची मागणी औंध ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आली आहे. प्रशासनाने लवकर पाणी सोडावे, अशी मागणी होत आहे.मार्चमध्येच पाण्यासाठी दाहीदिशा...जलस्रोत आटले : खटाव-माण-फलटण भागातील स्थितीसातारा : उन्हाळ्याचे मार्च, एप्रिल, मे हे तीन महिने बाकी आहेत. मात्र, मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच जिल्ह्यातील दुष्काळी भागात तीव्र स्वरूपाची पाणीटंचाई जाणवू लागली आहे. पाण्याचे स्रोत आटल्याने नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. फलटण तालुक्यातील पश्चिम भागाला ज्या धरणातून पाणी मिळत होते. धोम-बलकवडी धरणात पाणीसाठा शिल्लक नाही, तर औंध भागाला पाणीपुरवठा करणारा येळीव तलाव अक्षरश: भेगाळला आहे. माण तालुक्यात १७ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. मार्च महिन्यातच ही अवस्था तर एप्रिल, मे महिन्यात काय अवस्था होईल, याचा विचार केलेलाच बरा. संभाव्य भीषण टंचाईचा विचार करता प्रशासनाने आतापासूनच उपाययोजना करावी, अशी मागणी दुष्काळी भागातील नागरिकांमधून होत आहे.त्याचप्रमाणे जनावरांसाठी चारा छावणी सुरू करावी, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)मृतसाठाही संपला --येळीव तलावात मृतसाठा म्हणून काही पाणी राखून ठेवण्यात आले होते. या साठ्यातून गेल्या आठवड्यात चारशे मीटर केबल व पाईप टाकून औंधला पाणी देण्यात आले. परंतु त्याचाही काही उपयोग नसून तेही पाणी संपले आहे.औंधमध्ये पाण्याची भीषण टंचाई असून प्रशासनाने लवकरात लवकर येळीव तलावात पाणी सोडावे. आम्ही तशी मागणी आम्ही खटाव तहसीलदारांकडे केली आहे.- रोहिणी थोरात, सरपंच, औंध