शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
2
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
3
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
4
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
5
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
6
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
7
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
8
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
9
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
10
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
11
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
12
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
13
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
14
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
15
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
16
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
17
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
18
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
19
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
20
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?

‘तहसील’मधूनच रोगांचा प्रसार !

By admin | Updated: October 21, 2016 23:33 IST

शासकीय कार्यालयातच प्रबोधनाची आवश्यकता : अस्वच्छतेमुळे डेंग्यू, मलेरियाच्या लागणीला कारणीभूत

सातारा : डेंग्यू आणि मलेरिया यासारख्या जीवघातकी आजारांपासून बचावासाठी शासन प्रबोधन करत आहे. उघड्यावर साचून राहणारे पाणी टाकण्यासाठी प्रात्यक्षिकही करून दाखवित आहे. परंतु सातारा तहसील कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणात वर्षानुवर्षे उघड्यावर पाणी साचून राहत असून, या परिसरात डासांचे प्रभुत्व वाढले आहे. त्यामुळे येथे रोगांचा प्रसार होत असल्याची नागरिकांनी शंका उपस्थित केली असून, निरोगी राहण्यासाठी आता शासकीय कार्यालयांनाच प्रबोधन केले पाहिजे, अशी प्रतिक्रिया नागरिकांनी ‘लोकमत’ला दिली आहे. सातारा तहसील कार्यालय शहराच्या मध्यठिकाणी आहे. या ठिकाणी दररोज हजारो नागरिक ये-जा करीत असतात. परंतु सध्या या ठिकाणी डासांचे प्रभुत्व वाढले असून, तहसील कार्यालयातील काही ठिकाणी दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे या कार्यालयातील मुद्रांक विक्रेते, पक्षकार, काही राजकीय व्यक्ती नाक धरूनच कामे करत आहे. मागील दोन ते तीन वर्षांपूर्वी वाळू व्यावसायिकांवर कारवाई करून वाळू उपसा करणारी बोट तहसीलदार कार्यालयाने ताब्यात घेतली असून, ती बोट प्रांताधिकाऱ्यांच्या कार्यालयाजवळच ठेवण्यात आली असून, मागील दोन-तीन वर्षांपासून या बोटीत पावसाचे पाणी साचून राहिले आहे. या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात डासाची पैदास होत असून, सायंकाळी पाच वाजल्यापासून येथे काम करणेही अवघड झाले आहे. याचा त्रास केवळ अधिकारी, कर्मचाऱ्यांसोबतच कामानिमित्त तालुक्यातून आलेल्या नागरिकांना होत आहे. याचा बंदोबस्त करण्याची मागणी आहे. (प्रतिनिधी) २० वर्षांच्या टाक्या उघड्यावर या कार्यालयाच्या आवारात पाण्यासाठी मागील २० वर्षांपासून साठवण टाक्या काढण्यात आल्या आहेत. त्या टाक्याही वापराविना पडून असल्याने सध्या या दोन्ही टाक्यांची झाकणे उघड्यावर असून, या टाकीत मोठ्या प्रमाणात घाण साचली असून, पाण्यातून उग्र वास येत आहे आणि याच टाकीतून डासांची निर्मितीही मोठी होत असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले आहे. कार्यालयात वाढली झुडपे याच कार्यालयातील नगर भूमापन अधिकारी कार्यालयाच्या समोर मोठ्या प्रमाणात झुडपे वाढली आहेत तर काना-कोपऱ्यात कचरा साठला आहे. यामुळे येथेही दुर्गंधी पसरली असल्याने दिवसा मच्छरांचा त्रास सहन करावा लागत आहे. मुद्रांक विक्रेत्यांनी अनेकवेळा केली स्वच्छतेसाठी मागणी संपूर्ण तहसीलदार कार्यालयालगत मोठ्या प्रमाणात दुर्गंधी आहे. कचरा अस्ताव्यस्त पडला आहे. तर अनेक ठिकाणी झुडपे वाढली आहेत. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात डासांचा प्रमाण वाढले असून, यातील काही मुद्रांक विक्रेत्यांना डेंग्यू आणि मलेरियाचीही लागण झाली होती. यासाठी तहसीलदारांना येथील मुद्रांक विक्रेत्यांनी साफ-सफाईची मागणी अनेकवेळा केली. परंतु आजही परिस्थिती जैसे-थे आहे.