शहरं
Join us  
Trending Stories
1
हेट स्पीच: राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले
2
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
3
रक्षाविसर्जनावेळी मयताचा सावत्र मुलगा आल्याने वाद; दोन गटांत हाणामारी 
4
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
5
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
6
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
7
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
8
थंडी सुरु झाली...! रात्री झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये या तेलाचे दोन थेंब टाका, मिळतील ७ आरोग्यदायी फायदे...
9
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
10
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
11
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
12
'या' बँकेच्या शेअरनं लोकांना केलं मालामाल, १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला भाव; किंमतही खिशाला परवडणारी! झुनझुनवालांचा मोठा डाव
13
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
14
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
15
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
16
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
17
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
18
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
19
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
20
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
Daily Top 2Weekly Top 5

किल्ल्यांचे जतन, संवर्धन काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:48 IST

नागठाणे : ‘किल्ले हे महाराष्ट्राचे वैभव असून त्यांचे जतन व संवर्धन करणे काळाची गरज बनली आहे,’ असे उद्गार ...

नागठाणे : ‘किल्ले हे महाराष्ट्राचे वैभव असून त्यांचे जतन व संवर्धन करणे काळाची गरज बनली आहे,’ असे उद्गार सातारा येथील शिवाजी काॅलेजमधील इतिहास विभागाचे माजी प्रा. मनोहर निकम यांनी काढले.

आर्ट्स अँड काॅमर्स काॅलेज, नागठाणे या महाविद्यालयात इतिहास विभाग व क्रांतिसिंह अभ्यास मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा यांच्याबरोबर केलेल्या लिंकेजेस अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या ‘किल्ल्यांचे जतन व संवर्धन’ या विषयावरील व्याख्यानाप्रसंगी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

निकम म्हणाले, ‘कोणत्याही ऐतिहासिक वास्तूच्या संवर्धनासाठी केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या नियमांनुसार वास्तूंचे अत्याधुनिक पद्धतीने सर्वेक्षण, वास्तूंची दुरुस्ती, किल्ल्याचे व वास्तूंचे संवर्धन केले पाहिजे. तसेच किल्ल्यांचे जतन व संवर्धन करीत असताना योग्य वृक्षलागवड, मार्ग व्यवस्था, वास्तूंचे दिशादर्शक फलक व नकाशा आदी बाबींचे नियोजन करणे आवश्यक आहे.’

प्राचार्य डाॅ. जे. एस. पाटील म्हणाले, ‘स्वराज्य उभारणीमध्ये गड-किल्ल्यांचे योगदान मोलाचे असून, किल्ल्यांच्या जतन व संवर्धनासाठी स्थानिकांबरोबरच पर्यटकांचीही जबाबदारी तेवढीच आहे. तसेच किल्ले हा राज्याचा आत्मा असून, शास्रशुद्ध पद्धतीने किल्ल्याचे जतन व संवर्धन करणे गरजेचे आहे.’

याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांनी यासंदर्भात विद्यार्थी व प्राध्यापकांच्या प्रश्न व शंकांचे निरसन करण्यात आले. कार्यक्रमाचे इतिहास विभागाचे प्रमुख प्रा. डाॅ. अजितकुमार जाधव यांनी प्रास्ताविक केले. प्रा. निकिता जाधव यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. आर. जे. राठोड यांनी आभार मानले.