शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

अवकाळीने वीटभट्टी व्यावसायिकांचे लाखोंचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:31 IST

मायणी : मागील तीन ते चार दिवसांपासून खटाव तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे वीटभट्टी व्यावसायिकांचे लाखोंचे नुकसान ...

मायणी : मागील तीन ते चार दिवसांपासून खटाव तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे वीटभट्टी व्यावसायिकांचे लाखोंचे नुकसान झाले आहे.

कुंभार समाजाचा मुख्य व्यवसाय असलेला माती वीटभट्टी उद्योग हा दरवर्षी दीपावलीनंतर साधारण डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला सुरू होतो. या वर्षी कोरोना विषाणूचा प्रभाव असल्याने वीटभट्टीसाठी येणारे मजूर थोडे उशिरा आल्याने वीटभट्टी हंगाम थोडा उशिरा सुरू झाला.

त्यामुळे अनेक वीटभट्टी व्यावसायिकांनी गेल्या आठ-दहा दिवसांपासून या वर्षीचा वीटभट्टी हंगाम सुरू केला. त्यामुळे बहुतांश वीटभट्टीचा ठिकाणी या कच्च्या मातीच्या विटा तयार करण्याचे काम सुरू आहे. हिवाळ्याचा हंगाम व कडक ऊन नसल्याने कच्ची वीट वाळण्यासाठी थोडा उशीर होत आहे. कच्ची वीट वाळावी म्हणून ती पसरून ठेवली जाते किंवा उभी करून ठेवली जात आहे.

त्यातच गेल्या चार-पाच दिवसांपासून परिसरामध्ये ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. तसेच रात्रीच्या वेळी अवकाळी पाऊस येत असल्याने नुकत्याच तयार केलेल्या मातीच्या विटा पूर्ण भिजत आहेत. त्यामुळे तयार केलेल्या कच्च्या वीट पुन्हा मातीमध्ये मिसळाव्या लागत असल्याने या अवकाळी पावसामुळे वीटभट्टी व्यावसायिकांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे.

कोट..

तयार केलेली कच्ची वीट पूर्ण सुकल्यानंतर ती उभी करून ठेवली जाते. उउभ्या केलेल्या विटा आठ ते दहा दिवस पूर्ण खडखडीत सुकल्यानंतर त्यांची भट्टी रचली जाते. साधारण निम्म्याहून अधिक भट्टी रचून झाल्यावर ती योग्य पद्धतीने पेटवली जाते. ही प्रक्रिया साधारण १० ते १५ दिवसांपर्यंत सुरू असते.

- नितीन कुंभार, वडूज

०८ मायणी विटा

खटाव तालुक्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून निर्माण होणारे ढगाळ वातावरण व रात्रीच्या वेळी पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे कच्च्या विटा अशा पद्धतीने झाकून ठेवाव्या लागत आहेत. (छाया : संदीप कुंभार)