शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
4
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
5
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
6
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
7
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
8
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
9
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
10
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
11
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
12
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
13
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
14
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
15
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
16
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
17
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
18
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
19
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
20
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

बिले वसूल करण्यापेक्षा कामांना प्राधान्य द्या!

By admin | Updated: November 11, 2016 22:37 IST

कऱ्हाडात सभा : सभापतींचे ‘वीजवितरण’च्या अधिकाऱ्यांवर ताशेरे

कऱ्हाड : ‘वीजवितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना कोणत्याही प्रश्नाचे गांभीर्य नसते. पंचायत समिती सदस्य हा त्यांच्या विभागातील बारा-पंधरा हजार मतदारांचे प्रतिनिधीत्व करीत असतो. त्यामुळे सदस्यांना लोकांच्या प्रश्नांना उत्तरेही द्यावीच लागतात. अधिकाऱ्यांनी केवळ बिल वसुलीच्या कामास प्राधान्य देण्यासोबत जनतेच्या निगडीत प्रलंबित कामांनाही प्राधान्य द्या,’ अशा शब्दात सभापती देवराज पाटील यांनी वीजवितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना खडसावले. कऱ्हाड पंचायत समितीची मासिक सभा पंचायत समितीच्या सभागृहात पार पडली. यावेळी सभेस गटविकास अधिकारी अविनाश फडतरे, सहायक गटविकास अधिकारी मधुकर देशमुख उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीला सदस्या अश्विनी लवटे यांनी मुंढे येथील डीपी बदलण्याचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित केला. गेल्या अनेक महिन्यांपासून हा प्रश्न प्रलंबित असल्याबद्दल वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना त्यांनी धारेवर धरले. अधिकाऱ्यांकडून महिला सदस्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याचा आरोपही यावेळी लवटे यांनी केला. वीज कंपनीकडून मुंढे गावातच बेकायदेशीरपणे बांधकामास कनेक्शन देण्यात आले आहे, अशी माहिती सदस्या लवटे यांनी सभागृहास दिली. याबाबत जर ग्रामपंचायतीची हरकत नसेल तर कनेक्शन कसे देण्यात आले, याबाबत खुलासा करण्याची सूचना सभापतींनी केली. वीजमीटरचे रिडींग योग्य प्रकारे घेतले जात नसल्यामुळे ग्राहकांना अव्वाच्या सव्वा बिले येत असल्याचा आरोप अनिता निकम यांनी यावेळी केला. यावर लवकरच मीटरचे रिडींग मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याची माहिती वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली. कृषी विभागाकडे विविध औजारांसाठी अनुदान उपलब्ध आहे.परंतु त्यासाठी विहित मुदतीत अर्ज सादर करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. अनिता निकम यांनी एसटी महामंडळाच्या कारभारावर पुन्हा एकदा जोरदार टीका केली. कऱ्हाड आगाराच्या बसेस सेवारस्त्यांवरून न नेता महामार्गांवरूनच नेण्यात येत असल्यामुळे प्रवासी, नोकरदार तसेच विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत असल्याचे निकम यांनी सांगितले. गेल्या काही महिन्यांपासून सुरू असणारी कऱ्हाड-म्होप्रे बस बंद करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामस्थांचे हाल होत आहेत. ही बस बंद करून फक्त भोळेवाडीसाठी बससेवा सुरू करण्याचे कारण काय, असा प्रश्न सदस्य लक्ष्मण जाधव यांनी उपस्थित केला. म्होप्रेसाठी पुन्हा बससेवा सुरू न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला. तलाठी-ग्रामसेवकांच्या आंदोलनामुळे जनतेचे हाल होत असल्यामुळे त्यांच्या मागण्या मान्य करण्याबाबत पाठपुरावा करण्याची मागणी रुपाली यादव यांनी केली. (प्रतिनिधी) तालुक्यात २२६ गावांत ‘मागेल त्याला शेततळे’ मागेल त्याला शेततळे’ ही योजना कऱ्हाड तालुक्यातील २२६ गावांमध्ये राबवली जाणार आहे. यासाठी आॅनलाईन पद्धतीने प्रस्ताव मागवण्यात येणार आहेत. तालुका कृषी अधिकारी खरात यांनी कृषी विभागाचा आढावा सादर करताना माहिती दिली.