शहरं
Join us  
Trending Stories
1
India Lifts First ODI World Cup Trophy: हरमनप्रीतसह संघातील खेळाडूंनी खास अंदाजात उंचावली ट्रॉफी (VIDEO)
2
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
3
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
4
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
5
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
6
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
7
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
8
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
9
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
10
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
11
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
12
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
13
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
14
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
15
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
16
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
17
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
18
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
19
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
20
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास

पोवई नाक्यावर हेरलं.. दुचाकीस्वारांना ‘घेरलं’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:26 IST

सातारा : शनिवार, रविवार लाॅकडाऊनमध्ये विनाकारण बाहेर फिरणाऱ्या वाहनचालकांना पोवई नाक्यावर हेरून पोलिसांनी चारही बाजूंनी घेरलं. यामध्ये संचारबंदीचे उल्लंघन ...

सातारा : शनिवार, रविवार लाॅकडाऊनमध्ये विनाकारण बाहेर फिरणाऱ्या वाहनचालकांना पोवई नाक्यावर हेरून पोलिसांनी चारही बाजूंनी घेरलं. यामध्ये संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या ४६ दुचाकीस्वारांवर कडक दंडात्मक कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे यावर देखरेख करण्यासाठी खुद्द पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल हे स्वत: रस्त्यावर उभे होते. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलिसांनी आपत्ती व्यवस्थापन कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी सुरू केलीय.

जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरण्याच्या मार्गावर असतानाच पुन्हा या लाटेने डोके वर काढलंय. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नव्याने निर्बंध घातले आहेत. शनिवार आणि रविवार हे दोन दिवस सुटीचे असल्यामुळे नागरिक काहीही करणे सांगून घराबाहेर पडतात. हे माहीत असल्यामुळे प्रशासनाने या दोन दिवसांत पूर्णपणे संचारबंदी लागू केली आहे. मात्र, तरीसुद्धा अनेकजण खोटी कारणे सांगून घराबाहेर पडत आहेत. अशा लोकांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी शनिवारी पोवई नाक्यावर चारही बाजूने बंदोबस्त लावला. शहरातून बाहेर पडणारे आणि शहरात येणाऱ्या वाहनचालकांना अडविण्यात येत होते. या ठिकाणी खुद्द पोलीस अधीक्षकच हजर असल्याने पोलिसांनीही कोणाचीही गय केली नाही. संयुक्तिक कारण ज्यांचे नव्हते, अशा वाहनचालकांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. तर काहीजणांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल केला.

शहरातील राजवाडा, मोती चाैक, देवी चाैक या ठिकाणी अक्षरश: शुकशुकाट होता. शहरातही नागरिकांची वर्दळ नव्हती. काही दुकाने सुरू होती. त्यामुळे नागरिक दुकानासमोर उभे होते. दुपारी दोननंतर सर्व दुकाने बंद झाली. शनिवारी अचानक निर्बंध वाढविल्यामुळे अनेक व्यावसायिक संभ्रमात पडले. त्यामुळे सकाळी अनेकांनी दुकाने उघडली होती. परंतु पोलिसांनी गस्त घालण्यास सुरुवात केल्यानंतर दुकानांचे शटर खाली घेण्यात आले.

चाैकट :

पोलिसांकडून दुचाकीस्वारांची पोलखोल..

दुचाकीस्वारांना अडविल्यानंतर कुठे गेला होता, असा पोलिसांचा पहिला प्रश्न होता. या प्रश्नावर अनेक वाहनचालकांची पुढील उत्तरे होती. लस घेण्यासाठी गेलो होतो, वडील दवाखान्यात आहेत, मित्राला डबा घेऊन गेलो होतो, मेडिकलमध्ये निघालोय, अशी एक ना एक कारणे वाहनचालक सांगत होते. यातील काहींच्या कारणांची पोलिसांनी खातरजमा केली. त्यावेळी बरेचजण खोटे बोलत असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी अशा वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई तर केलीच, शिवाय आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत गुन्हाही दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली.