शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
2
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
3
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
4
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
5
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
6
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
7
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
8
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
9
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
10
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
11
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
12
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
13
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
14
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
15
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
16
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
17
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
18
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
19
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
20
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला

पोवई नाक्यावर हेरलं.. दुचाकीस्वारांना ‘घेरलं’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:26 IST

सातारा : शनिवार, रविवार लाॅकडाऊनमध्ये विनाकारण बाहेर फिरणाऱ्या वाहनचालकांना पोवई नाक्यावर हेरून पोलिसांनी चारही बाजूंनी घेरलं. यामध्ये संचारबंदीचे उल्लंघन ...

सातारा : शनिवार, रविवार लाॅकडाऊनमध्ये विनाकारण बाहेर फिरणाऱ्या वाहनचालकांना पोवई नाक्यावर हेरून पोलिसांनी चारही बाजूंनी घेरलं. यामध्ये संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या ४६ दुचाकीस्वारांवर कडक दंडात्मक कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे यावर देखरेख करण्यासाठी खुद्द पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल हे स्वत: रस्त्यावर उभे होते. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलिसांनी आपत्ती व्यवस्थापन कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी सुरू केलीय.

जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरण्याच्या मार्गावर असतानाच पुन्हा या लाटेने डोके वर काढलंय. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नव्याने निर्बंध घातले आहेत. शनिवार आणि रविवार हे दोन दिवस सुटीचे असल्यामुळे नागरिक काहीही करणे सांगून घराबाहेर पडतात. हे माहीत असल्यामुळे प्रशासनाने या दोन दिवसांत पूर्णपणे संचारबंदी लागू केली आहे. मात्र, तरीसुद्धा अनेकजण खोटी कारणे सांगून घराबाहेर पडत आहेत. अशा लोकांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी शनिवारी पोवई नाक्यावर चारही बाजूने बंदोबस्त लावला. शहरातून बाहेर पडणारे आणि शहरात येणाऱ्या वाहनचालकांना अडविण्यात येत होते. या ठिकाणी खुद्द पोलीस अधीक्षकच हजर असल्याने पोलिसांनीही कोणाचीही गय केली नाही. संयुक्तिक कारण ज्यांचे नव्हते, अशा वाहनचालकांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. तर काहीजणांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल केला.

शहरातील राजवाडा, मोती चाैक, देवी चाैक या ठिकाणी अक्षरश: शुकशुकाट होता. शहरातही नागरिकांची वर्दळ नव्हती. काही दुकाने सुरू होती. त्यामुळे नागरिक दुकानासमोर उभे होते. दुपारी दोननंतर सर्व दुकाने बंद झाली. शनिवारी अचानक निर्बंध वाढविल्यामुळे अनेक व्यावसायिक संभ्रमात पडले. त्यामुळे सकाळी अनेकांनी दुकाने उघडली होती. परंतु पोलिसांनी गस्त घालण्यास सुरुवात केल्यानंतर दुकानांचे शटर खाली घेण्यात आले.

चाैकट :

पोलिसांकडून दुचाकीस्वारांची पोलखोल..

दुचाकीस्वारांना अडविल्यानंतर कुठे गेला होता, असा पोलिसांचा पहिला प्रश्न होता. या प्रश्नावर अनेक वाहनचालकांची पुढील उत्तरे होती. लस घेण्यासाठी गेलो होतो, वडील दवाखान्यात आहेत, मित्राला डबा घेऊन गेलो होतो, मेडिकलमध्ये निघालोय, अशी एक ना एक कारणे वाहनचालक सांगत होते. यातील काहींच्या कारणांची पोलिसांनी खातरजमा केली. त्यावेळी बरेचजण खोटे बोलत असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी अशा वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई तर केलीच, शिवाय आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत गुन्हाही दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली.