शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यरात्रीनंतर सोलार एक्सप्लोजिव्हधील स्फोटांनी हादरले बाजारगाव, एकाचा मृत्यू : १६ कामगार जखमी, चौघे अत्यवस्थ
2
पाकिस्तानी क्रिकेटरवर लैंगिक अत्याचाराचा आरोप, पोलिसांनी मैदानातून उचललं, कोर्टानेदिला निकाल
3
बळीराजाची खरी दिवाळी...! जीएसटी कपातीचा शेतकऱ्यांना काय-काय फायदा होणार? एकदा पहाच... 
4
आजचे राशीभविष्य - ४ सप्टेंबर २०२५, आज यश, कीर्ती व आनंद लाभेल, नोकरीत सहकारी चांगले सहकार्य करतील
5
वाट माझी बघतोय रिक्षावाला संघटना खूश होणार; कार, दुचाकींवर लागणार एवढा जीएसटी...
6
GST: मोठी घोषणा! २२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी दर लागू होणार; काय स्वस्त काय महागले...
7
GST Rate Cuts News: आरोग्य विमा, जीवन विम्यासह ३३ औषधांवर शून्य GST; विद्यार्थ्यांना काय...? 
8
दिल्ली पोलीस पुण्यात आले, बेड्या ठोकून घेऊन गेले; बलात्कार प्रकरणी अभिनेता आशिष कपूरला अटक
9
कामगारांनो, आता ९ तासांऐवजी १२ तास काम, मात्र...; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
10
दादर टर्मिनसबाहेरील पार्किंगमध्ये दुचाकी पेटल्या; १०-१२ दुचाकी खाक
11
भिवंडीत उड्डाणपुलावर दोन भरधाव कारचा अपघात, दुचाकीस्वाराचा थेट रस्त्यावर पडून दुर्दैवी मृत्यू
12
यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली
13
मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
14
जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार...
15
जीएसटी परिषदेबाबत पहिली बातमी! २५०० रुपयांच्या आतील चप्पल, बुटांवर ५ टक्के कर : रिपोर्ट
16
...तोपर्यंत उपोषण, शासन निर्णय फाडणे, होळी करणे थांबवा; छगन भुजबळांचं OBC कार्यकर्त्यांना आवाहन
17
प्रमोशन दिलं नाही, महिला कर्मचारी बॉसवर संतापली! 'असा' बदला घेतला की सगळेच अवाक् झाले
18
सावधान! ChatGPT सोबत गप्पा मारताय? तुमची प्रत्येक गोष्ट ऐकू शकतात पोलीस
19
येत्या काही महिन्यात देशात राजकीय बदल होणार; ‘हायड्रोजन बॉम्ब’चा अर्थ काय? २ नेत्यांचे मोठे दावे
20
उत्तर प्रदेशात एक खाजगी बस पाण्यात उलटली, एका मुलासह दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी

ग्रामीण भागात टपाल सेवा विस्कळीत

By admin | Updated: March 15, 2015 00:14 IST

डाकसेवक संपाचा बोर्डाच्या निकालावरही परिणाम

सातारा : ‘अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवक संघटनेने देशभर पुकारलेल्या संपात जिल्ह्यातील ग्रामीण सेवकांनीही संपूर्णपणे बंद पुकारला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील टपाल सेवा ठप्प झाली असून, संप लवकर मिटला नाही तर या संपाचा दहावी-बारावी बोर्डाच्या निकालावरही परिणाम होऊ शकतो,’ असे संघटनेचे राजकुमार चव्हाण यांनी सांगितले. ग्रामीण डाक सेवकांचा खात्यात समावेश करावा व त्यांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे सर्व सेवा सवलती मिळाव्यात, डाक खात्याचे महामंडळ करू नये, ग्रामीण सेवकांचे नियम व वेतन रचना निश्चित करण्यासाठी न्यायाधीशांची समिती नेमावी, आदी मागण्यांसाठी हा बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात या संपाचा मोठा परिणाम झाला आहे. या संपात जवळपास ६०० ग्रामीण कार्यालय बंद आहेत तर ९५0 हून अधिक ग्रामीण सेवक या संपात सहभागी झाले आहेत. त्यामुळे ग्रामीण डाक सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. सध्या दहावी-बारावीच्या बोर्डाची परीक्षा सुरू आहे. उत्तरपत्रिका पोस्टात आल्या आहेत; पण त्या तपासणीसाठी जाण्यासाठी ग्रामीण सेवकांची आवश्यकता असते. जर या उत्तरपत्रिका वेळेवर तपासणीसाठी पोहोचल्या नाहीत तर बोर्डाचा निकाल वेळेवर लागणार नाही, त्यामुळे या संपाविषयी शासनाने तोडगा काढण्याची मागणीही संघटनेने केली. (प्रतिनिधी)