शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
4
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
5
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
6
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
7
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
8
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
9
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
10
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
11
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
12
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
13
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
14
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
15
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
16
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
17
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
18
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
19
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
20
शरीफ उस्मान हादीचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

लोकसंख्या 900 कूपनलिका 3500 डांभेवाडी शिवारात

By admin | Updated: April 6, 2016 00:21 IST

जमिनीची चाळण : राज्याबाहेरीलही पाणाड्यांना आलंय भलतंच डिमांड

विठ्ठल नलवडे -- कातरखटाव दुष्काळात उन्हाचे चटके सोसत असलेले शेतकरी जमिनीतील पाणी शोधण्यासाठी ना-ना तऱ्हेने प्रयत्न करत आहेत. खोल-खोल कूपनलिका घेऊन, विहिरीत उभी, आडवी कूपनलिका घेतल्या जातात, हे सर्वांना माहीत आहेच; पण माण तालुक्यातील डांभेवाडीत कहरच झाला आहे. नऊशे लोकसंख्येच्या या खेड्यात तब्बल साडेतीन हजार कूपनलिका घेतल्या आहेत. यामुळे जमिनीची अक्षरश: चाळण झाली आहे. गेल्या दहा-वीस वर्षांत विहिरींवरील मोट, इंजिनच्या जमान्यात बागायती पीक घेण्याकडे फारसा कल नसायचा. सध्या शेतकऱ्यांमध्ये विभक्त कुटुंबपद्धती वाढायला लागल्यामुळे जमिनी तेवढ्याच; पण बागायत करण्याकडे जास्त कल वाढला आहे. डांभेवाडीत १९८३ मध्ये शेतकऱ्यांनी केवळ १,६३२ रुपयांमध्ये पहिली कूपनलिका घेतली. त्यावेळी ११ फुटांवर ४ इंची पाणी लागत होते. १६ वर्षे झाली तरी चांगल्या पद्धतीने बोअरला पाणी टिकत होते. सद्य:स्थितीत १६०० रुपयांत केसिंग पाईपही येत नाही. त्याचा दर सहा हजार रुपये इतका झाला आहे. अर्धा एकर क्षेत्र असलेला शेतकरीही आठ-दहा कूपनलिका घेत आहे. गावातील शेतकरी दर २० ते २५ फुटांवर आपापल्या जमिनीत बोअर घेत आहे. कोण ४४ तर कोण ३० बोअर घेतोय. त्यातल्या कुणाच्या दोन बोअर सुरू आहेत, तर काही शेतकरी जमिनीची चाळण करून बेजार झाले आहेत. पण तरीही कुपनलिका घेण्याचे काम सुरूच आहे. पाणाड्यांच्या ना-ना तऱ्हा... कोण दुपट्याची काठी आपटतो, तर कोण पारंणं पाणी दाखवतो. कोण गजाणं पाणी दाखवतो, तर कोण नारळ उलटा धरतो. काही पाणाडी रक्त गटाचा बाव करतात. काहींना वाटते ‘मी पायाळू आहे’ जमिनीवर चालत असताना पाणाड्याच्या पायाला जिथे मुंग्या आल्यासारखं वाटेल, अशा ठिकाणी पाणी आहे,’ अशी माहिती बागायतदार गौतम बागल यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. भोवतालच्या सजीव सृष्टीचा अभ्यास करून पाणी दाखवणारे पाणाड्यांचा अंदाज ९० टक्के यशस्वी ठरतात. काही पाणाडी जाग्यावर थांबून पाणी काढूनच निघून जातात. तर काहीजण नशिबाला दोष देऊन जातात. त्यामुळे पाणाड्यांवर कितपत विश्वास ठेवायचा, हे ठरवलं पाहिजे. - नाना शिंदे, पाणाडी, कातरखटाव पाणाड्यांच्या तऱ्हा काही पाणाड्यांचे अंदाज वीस-वीस वेळा कूपनलिका घेऊन चुकले आहेत. अशावेळी त्यांची कारणंही ठरलेली आहेत. ‘जागाच थोडी बदलेली दिसतेय, कुणी दगड तर उचलला नाही ना, ...मग या जागी देवस्थानच आहे, असं वाटतंय.’ कोण म्हणतो, ‘देवाची जत्रा करा,’ असे सांगून पाणाडी तिथून पळवाटा काढून निघून जाताना दिसतायंत. ५०० फुटांवर धुरळा ‘जाऊ दे अजून दोन पारा खाली... रान थोड मऊ लागतंय,’ असं म्हणून काहीजण शेतकऱ्यांना घोड्यावर बसवतात. नंतर चारशे ते पाचशे फुटांवर धुरळाच उडत राहिला की, बघणारी लोकं तिथून निघून जातात. डांभेवाडी परिसरात शंभर फुटांच्या पुढे मांजरासारखा खडक लागल्यानंतर त्याच्या खाली पाणी धरणारा खडक नसल्यामुळे पाणी लागत नाही, असं जाणकारांचं मत आहे. भोवतालच्या सजीव सृष्टीचा अभ्यास करून पाणी दाखवणारे पाणाड्यांचा अंदाज ९० टक्के यशस्वी ठरतात. काही पाणाडी जाग्यावर थांबून पाणी काढूनच निघून जातात. तर काहीजण नशिबाला दोष देऊन जातात. त्यामुळे पाणाड्यांवर कितपत विश्वास ठेवायचा, हे ठरवलं पाहिजे. - नाना शिंदे, पाणाडी, कातरखटाव