शहरं
Join us  
Trending Stories
1
"अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
3
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
4
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
5
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
6
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
7
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
8
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
9
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
10
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
11
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
12
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
13
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
14
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
15
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
16
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
18
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
19
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
20
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?

लोकसंख्या 900 कूपनलिका 3500 डांभेवाडी शिवारात

By admin | Updated: April 6, 2016 00:21 IST

जमिनीची चाळण : राज्याबाहेरीलही पाणाड्यांना आलंय भलतंच डिमांड

विठ्ठल नलवडे -- कातरखटाव दुष्काळात उन्हाचे चटके सोसत असलेले शेतकरी जमिनीतील पाणी शोधण्यासाठी ना-ना तऱ्हेने प्रयत्न करत आहेत. खोल-खोल कूपनलिका घेऊन, विहिरीत उभी, आडवी कूपनलिका घेतल्या जातात, हे सर्वांना माहीत आहेच; पण माण तालुक्यातील डांभेवाडीत कहरच झाला आहे. नऊशे लोकसंख्येच्या या खेड्यात तब्बल साडेतीन हजार कूपनलिका घेतल्या आहेत. यामुळे जमिनीची अक्षरश: चाळण झाली आहे. गेल्या दहा-वीस वर्षांत विहिरींवरील मोट, इंजिनच्या जमान्यात बागायती पीक घेण्याकडे फारसा कल नसायचा. सध्या शेतकऱ्यांमध्ये विभक्त कुटुंबपद्धती वाढायला लागल्यामुळे जमिनी तेवढ्याच; पण बागायत करण्याकडे जास्त कल वाढला आहे. डांभेवाडीत १९८३ मध्ये शेतकऱ्यांनी केवळ १,६३२ रुपयांमध्ये पहिली कूपनलिका घेतली. त्यावेळी ११ फुटांवर ४ इंची पाणी लागत होते. १६ वर्षे झाली तरी चांगल्या पद्धतीने बोअरला पाणी टिकत होते. सद्य:स्थितीत १६०० रुपयांत केसिंग पाईपही येत नाही. त्याचा दर सहा हजार रुपये इतका झाला आहे. अर्धा एकर क्षेत्र असलेला शेतकरीही आठ-दहा कूपनलिका घेत आहे. गावातील शेतकरी दर २० ते २५ फुटांवर आपापल्या जमिनीत बोअर घेत आहे. कोण ४४ तर कोण ३० बोअर घेतोय. त्यातल्या कुणाच्या दोन बोअर सुरू आहेत, तर काही शेतकरी जमिनीची चाळण करून बेजार झाले आहेत. पण तरीही कुपनलिका घेण्याचे काम सुरूच आहे. पाणाड्यांच्या ना-ना तऱ्हा... कोण दुपट्याची काठी आपटतो, तर कोण पारंणं पाणी दाखवतो. कोण गजाणं पाणी दाखवतो, तर कोण नारळ उलटा धरतो. काही पाणाडी रक्त गटाचा बाव करतात. काहींना वाटते ‘मी पायाळू आहे’ जमिनीवर चालत असताना पाणाड्याच्या पायाला जिथे मुंग्या आल्यासारखं वाटेल, अशा ठिकाणी पाणी आहे,’ अशी माहिती बागायतदार गौतम बागल यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. भोवतालच्या सजीव सृष्टीचा अभ्यास करून पाणी दाखवणारे पाणाड्यांचा अंदाज ९० टक्के यशस्वी ठरतात. काही पाणाडी जाग्यावर थांबून पाणी काढूनच निघून जातात. तर काहीजण नशिबाला दोष देऊन जातात. त्यामुळे पाणाड्यांवर कितपत विश्वास ठेवायचा, हे ठरवलं पाहिजे. - नाना शिंदे, पाणाडी, कातरखटाव पाणाड्यांच्या तऱ्हा काही पाणाड्यांचे अंदाज वीस-वीस वेळा कूपनलिका घेऊन चुकले आहेत. अशावेळी त्यांची कारणंही ठरलेली आहेत. ‘जागाच थोडी बदलेली दिसतेय, कुणी दगड तर उचलला नाही ना, ...मग या जागी देवस्थानच आहे, असं वाटतंय.’ कोण म्हणतो, ‘देवाची जत्रा करा,’ असे सांगून पाणाडी तिथून पळवाटा काढून निघून जाताना दिसतायंत. ५०० फुटांवर धुरळा ‘जाऊ दे अजून दोन पारा खाली... रान थोड मऊ लागतंय,’ असं म्हणून काहीजण शेतकऱ्यांना घोड्यावर बसवतात. नंतर चारशे ते पाचशे फुटांवर धुरळाच उडत राहिला की, बघणारी लोकं तिथून निघून जातात. डांभेवाडी परिसरात शंभर फुटांच्या पुढे मांजरासारखा खडक लागल्यानंतर त्याच्या खाली पाणी धरणारा खडक नसल्यामुळे पाणी लागत नाही, असं जाणकारांचं मत आहे. भोवतालच्या सजीव सृष्टीचा अभ्यास करून पाणी दाखवणारे पाणाड्यांचा अंदाज ९० टक्के यशस्वी ठरतात. काही पाणाडी जाग्यावर थांबून पाणी काढूनच निघून जातात. तर काहीजण नशिबाला दोष देऊन जातात. त्यामुळे पाणाड्यांवर कितपत विश्वास ठेवायचा, हे ठरवलं पाहिजे. - नाना शिंदे, पाणाडी, कातरखटाव