शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

४२३० गावकारभाऱ्यांसाठी आज मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:33 IST

सातारा : जिल्ह्यातील निम्म्याहून जास्त ग्रामपंचायतींची निवडणूकप्रक्रिया सुरू आहे. गेल्या १५ दिवसांपासून जिल्ह्यात जोरदार राजकीय घडामोडी घडल्या. आता शुक्रवारी ...

सातारा : जिल्ह्यातील निम्म्याहून जास्त ग्रामपंचायतींची निवडणूकप्रक्रिया सुरू आहे. गेल्या १५ दिवसांपासून जिल्ह्यात जोरदार राजकीय घडामोडी घडल्या. आता शुक्रवारी ग्रामपंचायतीसाठी उभ्या असलेल्या ९ हजार ५२१ उमेदवारांचे भविष्य मशीनबंद होणार असून यातून ४ हजार ६३५ सदस्य निवडले जाणार आहेत.

गेल्या पंधरा दिवसांपासून ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झालेल्या गावांत प्रचार मोहिमा सुरू होत्या. गावांतील चौकाचौकांत उमेदवारांचे बॅनर लागले होते. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरीदेखील झडल्या. आता मतदारांच्या हातात अधिकार आले आहेत. गावचा सामूहिक विकास करण्यासाठी योग्य उमेदवार निवडून देण्यासाठी मतदार हाती असलेल्या शस्त्राचा वापर करणार आहेत. शुक्रवारी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच यावेळेत मतदानप्रक्रिया राबविली जाणार आहे. मतदान केलेल्या मशिन्स तालुक्याच्या ठिकाणी स्ट्राँग रुममध्ये ठेवल्या जाणार आहेत तर १८ जानेवारी रोजी मतमोजणी केली जाणार आहे.

संवेदनशील गावे

जिल्ह्यातील निवडणूक लागलेल्या काले, सुर्ली, उंडाळे, शेणोली, कोळे, पाल, वाघेरी, शिरवडे, नावडी, कोडोली, अंगापूर, शेंद्रे, बोरगाव, वाढे, तारगाव, देऊर, बावधन, उडतारे, देगाव, विरमाडे, खानापूर, गुळुंब, भादे, अतिट, तांबवे, काळज, महिगाव, सरताळे, सर्जापूर, निझरे, निमसोड आदी गावे संवेदनशील आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षता

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानावेळी योग्य सामाजिक अंतर, मास्कचा वापर तसेच सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक आहे.

मतदानावेळी मतदान ओळखपत्र, आधारकार्ड, वाहन परवाना, पॅनकार्ड, आस्थापनेचे ओळखपत्र, शासकीय ओळखपत्र यापैकी एक कागदपत्र जवळ असणे आवश्यक आहे.

१८ जानेवारीला निकाल लागणार

१५ जानेवारी रोजी मतदानप्रक्रिया पार पडेल. त्यानंतर ईव्हीएम मशीन तालुक्यातील स्ट्राँग रुममध्ये ठेवण्यात येणार असून १८ जानेवारी रोजी मतमोजणी होईल.

प्रशासनाकडून दक्षता

जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना केलेल्या आहेत. निवडणुकीत अनुचित प्रकार घडल्यास जागच्या जागी कारवाई करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. गैरप्रकारावरदेखील प्रशासनाचे लक्ष आहे.

- शेखर सिंह, जिल्हाधिकारी

पोलीस बंदोबस्त

जिल्ह्यात एकूण २०३८ मतदान केंद्र आहेत. या मतदान केंद्रांवर २ हजार ३८ पोलीस कर्मचारी नेमण्यात आले आहेत. स्थानिक पोलीस ठाण्याचे अधिकारीदेखील सज्ज आहेत. गाेंधळाच्या ठिकाणी कृती दल पाठविण्याची व्यवस्थादेखील पोलीस दलाच्या वतीने करण्यात आलेली आहे. राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी जिल्ह्यात दाखल झाली आहे.