शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

४२३० गावकारभाऱ्यांसाठी आज मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:33 IST

सातारा : जिल्ह्यातील निम्म्याहून जास्त ग्रामपंचायतींची निवडणूकप्रक्रिया सुरू आहे. गेल्या १५ दिवसांपासून जिल्ह्यात जोरदार राजकीय घडामोडी घडल्या. आता शुक्रवारी ...

सातारा : जिल्ह्यातील निम्म्याहून जास्त ग्रामपंचायतींची निवडणूकप्रक्रिया सुरू आहे. गेल्या १५ दिवसांपासून जिल्ह्यात जोरदार राजकीय घडामोडी घडल्या. आता शुक्रवारी ग्रामपंचायतीसाठी उभ्या असलेल्या ९ हजार ५२१ उमेदवारांचे भविष्य मशीनबंद होणार असून यातून ४ हजार ६३५ सदस्य निवडले जाणार आहेत.

गेल्या पंधरा दिवसांपासून ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झालेल्या गावांत प्रचार मोहिमा सुरू होत्या. गावांतील चौकाचौकांत उमेदवारांचे बॅनर लागले होते. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरीदेखील झडल्या. आता मतदारांच्या हातात अधिकार आले आहेत. गावचा सामूहिक विकास करण्यासाठी योग्य उमेदवार निवडून देण्यासाठी मतदार हाती असलेल्या शस्त्राचा वापर करणार आहेत. शुक्रवारी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच यावेळेत मतदानप्रक्रिया राबविली जाणार आहे. मतदान केलेल्या मशिन्स तालुक्याच्या ठिकाणी स्ट्राँग रुममध्ये ठेवल्या जाणार आहेत तर १८ जानेवारी रोजी मतमोजणी केली जाणार आहे.

संवेदनशील गावे

जिल्ह्यातील निवडणूक लागलेल्या काले, सुर्ली, उंडाळे, शेणोली, कोळे, पाल, वाघेरी, शिरवडे, नावडी, कोडोली, अंगापूर, शेंद्रे, बोरगाव, वाढे, तारगाव, देऊर, बावधन, उडतारे, देगाव, विरमाडे, खानापूर, गुळुंब, भादे, अतिट, तांबवे, काळज, महिगाव, सरताळे, सर्जापूर, निझरे, निमसोड आदी गावे संवेदनशील आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षता

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानावेळी योग्य सामाजिक अंतर, मास्कचा वापर तसेच सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक आहे.

मतदानावेळी मतदान ओळखपत्र, आधारकार्ड, वाहन परवाना, पॅनकार्ड, आस्थापनेचे ओळखपत्र, शासकीय ओळखपत्र यापैकी एक कागदपत्र जवळ असणे आवश्यक आहे.

१८ जानेवारीला निकाल लागणार

१५ जानेवारी रोजी मतदानप्रक्रिया पार पडेल. त्यानंतर ईव्हीएम मशीन तालुक्यातील स्ट्राँग रुममध्ये ठेवण्यात येणार असून १८ जानेवारी रोजी मतमोजणी होईल.

प्रशासनाकडून दक्षता

जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना केलेल्या आहेत. निवडणुकीत अनुचित प्रकार घडल्यास जागच्या जागी कारवाई करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. गैरप्रकारावरदेखील प्रशासनाचे लक्ष आहे.

- शेखर सिंह, जिल्हाधिकारी

पोलीस बंदोबस्त

जिल्ह्यात एकूण २०३८ मतदान केंद्र आहेत. या मतदान केंद्रांवर २ हजार ३८ पोलीस कर्मचारी नेमण्यात आले आहेत. स्थानिक पोलीस ठाण्याचे अधिकारीदेखील सज्ज आहेत. गाेंधळाच्या ठिकाणी कृती दल पाठविण्याची व्यवस्थादेखील पोलीस दलाच्या वतीने करण्यात आलेली आहे. राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी जिल्ह्यात दाखल झाली आहे.