शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस ठाण्याबाहेर तीन ट्रक पेटवले

By admin | Updated: October 25, 2015 23:48 IST

कवठेमहांकाळची घटना : वाळूच्या दोन ट्रकचा समावेश

३० एप्रिल १९०९ च्या सूर्योदयापूर्वी ५ वाजून १५ मिनीटांनी या दैवी गुणसंपन्न बालकाचा जन्म झाला. त्याचवेळी वरखेड क्षेत्री एक घटना घडली. विदेही मूर्ती आडकोजी अलिकडे आपलं स्थान सोडून सहसा कोठे जाईनात पण त्या दिवशी अगदी सकाळी हा अवलिया महत्मा रोमरोमी हर्षाने फुलला. ते जेथे पहुडले होते तेथून उठले व पाच-सहा घरांपलीकडच्या तुकाराम बुवा वानखडे यांचेकडे आलेत. दार ठोठावू लागले व ‘माहा आंबा दे, माहा आंबा दे!’ म्हणत ठाण मांडून बसलेत. तेवढ्यात आजुबाजूचे लोक तेथे आले. तुकाराम बुवांनी घरातून पाच आंबे आणलेत. बाकी लोकही आंबे आणून त्यांच्या पुढ्यात ठेवू लागले. पण त्यातील एकाही आंब्याला ते हात लावेनात. तुकाराम बुवाचा हात पकडून ‘माहा आंबा दे!’ असे पुन्हा पुन्हा हट्टाने म्हणून लागले. तुकारामजीच्या पत्नी बजावार्इंना आठवण झाली की, आडकोजी महाराजांनी मंजुळेच्या तोंडात आंबा पिळला होता. ती गर्भार आहे. तेव्हा यावलीला जावून पहा. बजाबाईच्या या सूचनेवरुन तुकारामबुवाला सर्व अर्थ उलगडला. त्यांनी समर्थांना नमस्कार केला व तडक यावलीचा रस्ता धरला. यावलीला येवून पहातात तर मंजुळेच्या झोपडीजवळ देशमुखांच्या वाड्यात मंगलवाद्य वाजत होती. बजाबाईचा अंदाज खरा ठरला होता. त्यांना ‘माहा आंबा दे!’ चा अर्थ कळला; पण या एक दिवसाच्या मुलाला महाराजांजवळ नेणे शक्य नाही. म्हणून तुकारामबुवा त्वरित वरखेडला गेले. त्यांनी श्री सदगुरु आडकोजीचे पाय धरले व म्हणाले ‘बाबा! तुमचा आंबा थोड्याच दिवसात आणून देतो.’ समर्थांच्या मुखावर स्मित झळकलं; पण रोज केव्हा तरी त्यांच्या दारात येवून ‘माहा आंबा दे!’ असा आलख जागवायला मात्र ते विसरले नाहीत. महाराजांनी आपल्या ‘माझी आत्मकथा’ मध्ये म्हटले आहे - तुकड्यादास म्हणे नवसे मी झाले। प्रसादे लाभलो निधनाच्या।।पुत्र जन्माच्या दिवशीच बंडोजीची झोपडी उडाली. त्यामुळे गावकऱ्यांनी बंडोजीला हिंमत देवून शोजाऱ्यापाजाऱ्यांनी श्रमदान करुन चार-आठ दिवसांत बंडोजीची झोपडी पूर्ववत उभी केली. झोपडी नीट होताच तानाबाईनी नातवाला घरी आणलं.११ मे १९०९ ला बाळ बारा दिवसांचा झाला. बारव्या दिवशी बाळाचे नामकरण संस्कार करावयाचे ठरले. पण बारशाला काय करणार, या विचारात असतानाच आकोटचे श्रीहरीबुवा सरळ यावलीला बंडोजीच्या घरी आले. त्यावेळी प्रज्ञाचक्षू श्री गुलाबराव महाराज यावलीलाच होते. अचानकपणे ते दोघेही एकाचवेळी अनाहुतपणे बंडोजीच्या घरी आले. गावच्या लोकांनी बारशाच्या सोहळ्यासाठी गढ्या तोरणांनी झोपडी सुशोभित केली होती. दारात मंगलवाद्ये वाजत होती. त्यावेळी हे दोघेही दाराजवळ आले. दोघांनाही एकदम आलेले पाहून लोकांना आश्चर्य वाटले. बंडोजींनी त्यांचे स्वागत केले. दोघेही म्हणतात - ‘मंजुळाबाई! आमच्या बाळाला बघू दे!’ असे म्हणून ते झोपडीत शिरले. मंजुळाबाई आपलं बाळ त्याच्या पायावर घालण्याच्या प्रयत्नात असतांनाच हरीबुवांनी बाळ मोठ्या घाईने आपल्या हातावर घेतलं व म्हणाले, ‘बाई! कोणाच्याही पायावर नोको ठुत जावू या लेकराले, याच्याच पायावर जमाना डोकं ठेविन’ आणि हरीबुवा त्या बालकाशी काही बोलू लागले. त्याच वेळी गुलाबराव महाराज म्हणाले ‘सवाष्णीनों! बाळाला पाळण्यात घाला व मंगल गाणी गा’ दोन दोन महात्मे तिथे असल्यामुळे त्यांची तारांबळ उडाली’ त्यांची वाचाच कुंठित झाली. हरीबुवांनी स्वत:च बाळाला पाळ्यात घातले. संत गुलाबराव महाराजांनी बाळाच्या अंगावरुन हात फिरविला. सहज वाणीतून त्यांनी मंगलगीत गायलं. त्यांनी स्वयंस्फूर्त पाळणा गायला सुरुवात केली. पाळण्यानंतर त्या संत द्वयांनी ‘माणिक देव - माणिक देव’ असा उद्घोष केला आणि दोघांनीही पाळणा हलविला. झोके देवू लागले. हा अपूर्व नामकरण विधी डोळे भरुन पाहण्यासाठी शेकडो महिला पुरुष मिळेल त्या जागी अंगणात, रस्त्यावर उभे होते. तानाबाईच्या व बंडोजीच्या नेत्रातून आनंदाश्रू वाहत होते. मंजूळा तर जणू प्रभू स्मरणातच निमग्न होती. ‘मंजुळा तुझा बाळा भाग्यवान आहे बाई!’ असा उच्चार करीतच शेजारणी घरी गेल्यात. महाराजांनी ‘माझी आत्मकथा’ मध्ये हा प्रसंग वर्णिला आहे. आकोट ग्रामीचे हरीबुवा सिध्दा देती आशिर्वाद तान्हपणी।। संत गुलाबराव माधान गावीचे । आशिर्वाद त्यांचे बालकाशी।।- बाबा आवारे