शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

पोलीस ठाण्याबाहेर तीन ट्रक पेटवले

By admin | Updated: October 25, 2015 23:48 IST

कवठेमहांकाळची घटना : वाळूच्या दोन ट्रकचा समावेश

३० एप्रिल १९०९ च्या सूर्योदयापूर्वी ५ वाजून १५ मिनीटांनी या दैवी गुणसंपन्न बालकाचा जन्म झाला. त्याचवेळी वरखेड क्षेत्री एक घटना घडली. विदेही मूर्ती आडकोजी अलिकडे आपलं स्थान सोडून सहसा कोठे जाईनात पण त्या दिवशी अगदी सकाळी हा अवलिया महत्मा रोमरोमी हर्षाने फुलला. ते जेथे पहुडले होते तेथून उठले व पाच-सहा घरांपलीकडच्या तुकाराम बुवा वानखडे यांचेकडे आलेत. दार ठोठावू लागले व ‘माहा आंबा दे, माहा आंबा दे!’ म्हणत ठाण मांडून बसलेत. तेवढ्यात आजुबाजूचे लोक तेथे आले. तुकाराम बुवांनी घरातून पाच आंबे आणलेत. बाकी लोकही आंबे आणून त्यांच्या पुढ्यात ठेवू लागले. पण त्यातील एकाही आंब्याला ते हात लावेनात. तुकाराम बुवाचा हात पकडून ‘माहा आंबा दे!’ असे पुन्हा पुन्हा हट्टाने म्हणून लागले. तुकारामजीच्या पत्नी बजावार्इंना आठवण झाली की, आडकोजी महाराजांनी मंजुळेच्या तोंडात आंबा पिळला होता. ती गर्भार आहे. तेव्हा यावलीला जावून पहा. बजाबाईच्या या सूचनेवरुन तुकारामबुवाला सर्व अर्थ उलगडला. त्यांनी समर्थांना नमस्कार केला व तडक यावलीचा रस्ता धरला. यावलीला येवून पहातात तर मंजुळेच्या झोपडीजवळ देशमुखांच्या वाड्यात मंगलवाद्य वाजत होती. बजाबाईचा अंदाज खरा ठरला होता. त्यांना ‘माहा आंबा दे!’ चा अर्थ कळला; पण या एक दिवसाच्या मुलाला महाराजांजवळ नेणे शक्य नाही. म्हणून तुकारामबुवा त्वरित वरखेडला गेले. त्यांनी श्री सदगुरु आडकोजीचे पाय धरले व म्हणाले ‘बाबा! तुमचा आंबा थोड्याच दिवसात आणून देतो.’ समर्थांच्या मुखावर स्मित झळकलं; पण रोज केव्हा तरी त्यांच्या दारात येवून ‘माहा आंबा दे!’ असा आलख जागवायला मात्र ते विसरले नाहीत. महाराजांनी आपल्या ‘माझी आत्मकथा’ मध्ये म्हटले आहे - तुकड्यादास म्हणे नवसे मी झाले। प्रसादे लाभलो निधनाच्या।।पुत्र जन्माच्या दिवशीच बंडोजीची झोपडी उडाली. त्यामुळे गावकऱ्यांनी बंडोजीला हिंमत देवून शोजाऱ्यापाजाऱ्यांनी श्रमदान करुन चार-आठ दिवसांत बंडोजीची झोपडी पूर्ववत उभी केली. झोपडी नीट होताच तानाबाईनी नातवाला घरी आणलं.११ मे १९०९ ला बाळ बारा दिवसांचा झाला. बारव्या दिवशी बाळाचे नामकरण संस्कार करावयाचे ठरले. पण बारशाला काय करणार, या विचारात असतानाच आकोटचे श्रीहरीबुवा सरळ यावलीला बंडोजीच्या घरी आले. त्यावेळी प्रज्ञाचक्षू श्री गुलाबराव महाराज यावलीलाच होते. अचानकपणे ते दोघेही एकाचवेळी अनाहुतपणे बंडोजीच्या घरी आले. गावच्या लोकांनी बारशाच्या सोहळ्यासाठी गढ्या तोरणांनी झोपडी सुशोभित केली होती. दारात मंगलवाद्ये वाजत होती. त्यावेळी हे दोघेही दाराजवळ आले. दोघांनाही एकदम आलेले पाहून लोकांना आश्चर्य वाटले. बंडोजींनी त्यांचे स्वागत केले. दोघेही म्हणतात - ‘मंजुळाबाई! आमच्या बाळाला बघू दे!’ असे म्हणून ते झोपडीत शिरले. मंजुळाबाई आपलं बाळ त्याच्या पायावर घालण्याच्या प्रयत्नात असतांनाच हरीबुवांनी बाळ मोठ्या घाईने आपल्या हातावर घेतलं व म्हणाले, ‘बाई! कोणाच्याही पायावर नोको ठुत जावू या लेकराले, याच्याच पायावर जमाना डोकं ठेविन’ आणि हरीबुवा त्या बालकाशी काही बोलू लागले. त्याच वेळी गुलाबराव महाराज म्हणाले ‘सवाष्णीनों! बाळाला पाळण्यात घाला व मंगल गाणी गा’ दोन दोन महात्मे तिथे असल्यामुळे त्यांची तारांबळ उडाली’ त्यांची वाचाच कुंठित झाली. हरीबुवांनी स्वत:च बाळाला पाळ्यात घातले. संत गुलाबराव महाराजांनी बाळाच्या अंगावरुन हात फिरविला. सहज वाणीतून त्यांनी मंगलगीत गायलं. त्यांनी स्वयंस्फूर्त पाळणा गायला सुरुवात केली. पाळण्यानंतर त्या संत द्वयांनी ‘माणिक देव - माणिक देव’ असा उद्घोष केला आणि दोघांनीही पाळणा हलविला. झोके देवू लागले. हा अपूर्व नामकरण विधी डोळे भरुन पाहण्यासाठी शेकडो महिला पुरुष मिळेल त्या जागी अंगणात, रस्त्यावर उभे होते. तानाबाईच्या व बंडोजीच्या नेत्रातून आनंदाश्रू वाहत होते. मंजूळा तर जणू प्रभू स्मरणातच निमग्न होती. ‘मंजुळा तुझा बाळा भाग्यवान आहे बाई!’ असा उच्चार करीतच शेजारणी घरी गेल्यात. महाराजांनी ‘माझी आत्मकथा’ मध्ये हा प्रसंग वर्णिला आहे. आकोट ग्रामीचे हरीबुवा सिध्दा देती आशिर्वाद तान्हपणी।। संत गुलाबराव माधान गावीचे । आशिर्वाद त्यांचे बालकाशी।।- बाबा आवारे