शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

पोलीस ठाण्यात शिरला साप!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2015 20:55 IST

वाई : नागपंचमी दिवशी तक्रार दाखल कराय तर नाही ना आला ?

पांडुरंग भिलारे- वाई शहरात नागपंचमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.़ या शहरातीलच पोलीस ठाण्यात नागपंचमीच्या दिवशी चक्क धामणने दर्शन दिले. त्यावेळी धामणला पाहून अनेकांना काय बोलावे ते सुचेना. शेवटी धामणला पकडून बाहेर सोडून द्यायचा निर्णय झाला. यावेळी उपस्थित नागरिकांमध्ये नागपंचमीच्या मुहूर्तावर साप आपल्या व्यथा मांडण्यासाठी तर पोलीस ठाण्यात आला नाही ना ? अशी कुजबूज सुरू होती. वाई शहरास ऐतिहासिक, सांस्कृतिक असा अनेक शतकांचा वारसा आहे. आध्यात्मिक महत्त्व असल्यामुळे वाई शहराला दक्षिण काशीही समजले जाते़ त्यामुळे वर्षातील प्रत्येक सण अनोख्या पद्धतीने व मोठ्या उत्साहात साजरा केला जातो़ तसेच येथे नागपंचमीचाही सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. येथील कृष्णा नदीच्या जवळ असलेल्या नाग मंदिरात महिला वर्ग जमतो. तसेच वाई शहरातील किसन वीर चौकात ते येत असतात़ येथे अनेक विक्रेते विविध प्रकारची खेळणी, फुगे, सौंदर्यप्रसाधने विक्रीसाठी घेऊन येत असतात. त्यामुळे वाईच्या मुख्य चौकास यात्रेचे स्वरूप आलेले असते़ येथे पोलीस प्रशासनाला मोठा बंदोबस्त ठेवावा लागत असतो़ दरम्यान, अशातच दि. १९ रोजी नागपंचमीच्या दिवशी वाई शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या पोलीस ठाण्यात सायंकाळी साडेसातच्या सुमारास नेहमीप्रमाणे मोठी वर्दळ होती. त्याचवेळी धामण जातीचा साप दिसल्याने सर्वांचीच भंबेरी उडाली. सर्वत्र एकच पळापळ झाली़ साप सुद्धा पर्यावरणातील एक महत्त्वाचा घटक आहे़ हे महत्त्व ओळखून सापाला न मारता पकडण्याचा निर्णय झाला. त्यानंतर सर्पमित्राचा मोबाईल नंबर शोधण्यासाठी सर्वांची लगबग सुरू झाली़ सर्प मित्र येण्यास तब्बल पाऊण तास लागला. तोपर्यंत त्या धामणवर लक्ष ठेवण्याची ड्यूटी पोलिसांवर आली होती.यावेळी पोलीस ठाण्यातील हवालदार शेंडगे हे सापावर लक्ष ठेवून होते़ यावेळी कामानिमित्त आलेल्या अनेक लोकांनी धामण पाहण्यासाठी गर्दी केली होती़ सर्पमित्र अजिज शेख यांनी पाऊण तासाच्या अथक प्रयत्नानंतर सापास पकडले, त्याला जवळच असलेल्या वाई-पाचगणी जंगलात सोडल्याने सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला. यावेळी हवालदार सी़ एन. शेडगे, पी़ डी़ शिंदे, ए. जी. कुंभार, सी़ ए. जाधव, गरूड, धायगुडे उपस्थित होते. पर्यावरणपूरक पद्धतीचा अवलंब करावा सध्याच्या स्थितीत पर्यावरणाचा ऱ्हास मोठ्या प्रमाणावर होत आहे. माणसाने मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केल्याने वन्यजीवांना मनुष्य वस्तीत वास्तव्य करण्याशिवाय पर्याय नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे़ त्यामुळे कधी साप तर कधी बिबट्या मनुष्य वस्तीत आल्याच्या बातम्या येत असतात. माणसाने पर्यावरण संवर्धन टिकविण्याची गरज आहे. तरच पर्यावरण संवर्धन होईल़- विजय लष्करे, व्यावसायिक वाई सर्पमित्राची घ्यावी मदतसर्प हा शेतकऱ्यांचा मित्र आहे. साप दिसला की, टाक धोपाटी ही रुढ आपल्यामध्ये आहे़ त्याला फाटा देऊन रहिवासी वस्तीत कोठे साप आढळल्यास नागरिकांनी सर्पमित्रास बोलवावे. म्हणजे त्याचा जीव वाचेल़ सापावर लक्ष ठेवण्याची बजावली ड्यूटीवाई पोलीस ठाण्यात साप दिसल्यानंतर पोलिसांसह सर्वचजण अवाक् झाले. सर्पमित्राचा फोन नंबर मिळवून त्याच्याशी संपर्क करून तो ठाण्यात येईपर्यंत थोडावेळ लागणार होता. त्यामुळे नेहमी बंदोबस्तात व्यस्त असलेल्या पोलिसांना सापावर लक्ष ठेवण्याची ड्यूटी करावी लागली. सर्पमित्र अजिज शेख आल्यानंतर पोलिसांची ही ड्यूटी संपली.