शहरं
Join us  
Trending Stories
1
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
2
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
3
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
4
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
5
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
6
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
7
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
8
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
9
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
10
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल
11
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
12
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
13
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
14
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
15
"नवोदित कलाकारांनाही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...
16
चमत्कार! पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील २० जणांचा मृत्यू; ३ महिन्यांची चिमुकली बचावली
17
Vastu Shastra: अंघोळ झाल्यावर करत असाल 'ही' एक चूक तर घरात भरेल नकारात्मक ऊर्जा!
18
नूडल्सने बदललं नशीब? रतन टाटांचा चाहता असलेला 'हा' माणूस कसा झाला इतका श्रीमंत?
19
म्युच्युअल फंड क्षेत्रातही अंबानींची ग्रँड एन्ट्री; ३ दिवसांत १७,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक
20
IND vs ENG: पराभवानंतर इंग्लंडची मोठी खेळी; लॉर्ड्स कसोटीसाठी स्टार वेगवान गोलंदाजाला आणलं संघात

पंतप्रधानांची उद्घाटने काँग्रेसच्याच कामांची !

By admin | Updated: August 23, 2014 23:49 IST

कऱ्हाड : मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची टीका

कºहाड : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या करीत असणारी उद्घाटने ही पूर्वी काँग्रेसने केलेल्या कामांचीच आहेत. आगामी पाच वर्षे जरी मोदी उद्घाटने करीत फिरले तरी ती संपणार नाहीत, अशी टीका मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. आमदार आनंदराव पाटील, मनोहर शिंदे, राहुल चव्हाण, आदी उपस्थित होते. मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याबाबत घडलेल्या प्रकाराची माहिती विचारली असता, ‘काही विशिष्ट पक्षांकडून काँग्रेसच्या मंत्र्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न होत आहे. त्याचा शोध जरूर घेऊ. तसेच उद्धव ठाकरेंनी मरळीच्या सभेत केलेल्या टीकेला योग्यवेळी जशास तसे उत्तर देऊ,’ असेही मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले. आघाडीतील जागावाटपाची चर्चा दिल्लीत झाली आहे. आम्ही १७४ मतदारसंघांतील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या आहेत; पण निवडून येण्याची क्षमता तपासून एखादा इच्छुक मुलाखतीला आला नसला, तरी त्याचा विचार होऊ शकतो. उरमोडीचे पाणी पतंगरावांनी पळविले का? असे विचारले असता, ‘कुणी पळविले आणि कुणी नेले? ही चुकीची माहिती आहे. पिण्यासाठी पाण्याचा पुरवठा करणे आवश्यक आहे. शेतीसाठी ते दिले जाणार नाही,’ असेही मुख्यमंत्री चव्हाण यांनी सांगितले. (प्रतिनिधी) आरक्षणाचे प्रस्ताव केंद्राकडेच पाठवावे लागतात धनगर आणि लिंगायत समाजांच्या आरक्षणाचे प्रस्ताव केंद्राकडे पाठविले जाणार असल्याने ते लटकणार काय? असे छेडले असता मुख्यमंत्री चव्हाण यांनी प्रस्ताव केंद्राकडेच पाठवावे लागतात, असे सांगितले. मात्र, मग लिंगायत समाजासाठी नेमलेली मंत्री सोपल समिती काय कामाची? यावर मात्र त्यांनी उत्तर देणे टाळले. ‘कºहाड दक्षिण’वरील स्वारीचा ‘सस्पेन्स’ कधी संपणार? असा प्रश्न विचारताच ‘संपेल आणि तुम्हाला लवकरच समजेल,’ असे सूचक उत्तर मुख्यमंत्री चव्हाण यांनी दिले; पण नेमका ‘सस्पेन्स’ कधी संपणार, हे सांगणे मात्र त्यांनी टाळले.