शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

जायगाव परिसरातील रस्त्यांची दुर्दशा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:34 IST

कोरेगाव : कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे शेवटचे टोक असलेल्या जायगाव (ता. कोरेगाव) परिसरातील रस्त्यांची दुर्दशा झालेली आहे. दस्तुरखुद्द पालकमंत्र्यांच्याच ...

कोरेगाव : कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे शेवटचे टोक असलेल्या जायगाव (ता. कोरेगाव) परिसरातील रस्त्यांची दुर्दशा झालेली आहे. दस्तुरखुद्द पालकमंत्र्यांच्याच मतदारसंघातील रस्त्यांबाबत बांधकाम विभाग अक्षम्य दुर्लक्ष करत असल्याने ग्रामस्थ हैराण झाले आहेत. पावसाळ्यापूर्वी या रस्त्यांची डागडुजी केली जावी, अशी मागणी जोर धरत आहे.

कोरेगाव तालुक्यात मोडत असलेल्या, मात्र कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे शेवटचे टोक असलेल्या जायगाव परिसरात रस्त्यांचे जाळे शंकरराव जगताप यांनी विणले होते. मात्र, मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर रस्त्यांची दुर्दशा होण्यास सुरुवात झाली. जिल्हा परिषद सदस्य अथवा पंचायत समिती सदस्य या रस्त्यांकडे अजिबात लक्ष देत नाहीत. जायगाव, कण्हेरखेड, वाघजाईवाडीसह अनेक गावे या रस्त्यांद्वारे जोडली गेली आहेत. मात्र ऊस वाहतुकीसह अन्य शेतीमालाच्या वाहतुकीत मोठा अडथळा निर्माण होत आहे. खासगी वाहतूकदार या परिसरात मालवाहतूक करण्यास स्पष्ट शब्दात नकार देतात.

सह्याद्री व जरंडेश्‍वर या दोन्ही कारखान्यांचे कार्यक्षेत्र असल्याने आणि परिसरात पाण्याची उपलब्धता असल्याने उसाचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. ऊस वाहतुकीस अडथळा होत असल्याने शेतकऱ्यांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागत आहे.

मध्यंतरीच्या काळात जायगावच्या शिष्टमंडळाने खासदार श्रीनिवास पाटील यांची भेट घेऊन जायगाव-वाघजाईवाडी-एकंबे रस्त्याच्या दुरुस्तीबाबत प्रश्‍न उपस्थित केला होता, त्यांनी तत्काळ बांधकाम विभागाच्या उच्चपदस्थ अभियंत्यांना सूचना दिल्या होत्या. मात्र, बांधकाम विभागाने सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे.

एसटीच्या नकाशावरून वाघजाईवाडी गायब

एकंबे आणि जायगावच्या मधोमध वाघजाईवाडी हे गाव आहे. या परिसरात आशा भवन संस्थेचे मतिमंद मुलांचे शैक्षणिक संकुल आहे, या परिसराला भेट देण्यासाठी देशभरातून विविध संस्थांचे प्रतिनिधी येत असतात. मात्र रस्ता खराब असल्याने त्यांना देखील मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. कोरेगाव एसटी आगाराने जायगावकडे जाणाऱ्या बसेस एकंबेतून कण्हेरखेड मार्गे वळविल्याने वाघजाईवाडी हे गाव एसटीच्या नकाशावरून गायबच झाल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. एसटीने लांबच्या मार्गावरून प्रवासी वाहतूक सुरू केल्याने तिकीट दराबरोबरच वेळेचाही अपव्यय होत आहे. याबाबत पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी व्यक्तिगत लक्ष घालावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.