शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

कालव्याजवळ पाट... ... धरणाजवळ सपाट !

By admin | Updated: August 24, 2014 22:40 IST

तांत्रिक बाबींकडे दुर्लक्ष : मातीच्या कॅनॉलवर जागोजागी झुडपे

कालव्याजवळ पाट... ... धरणाजवळ सपाट !तांत्रिक बाबींकडे दुर्लक्ष : मातीच्या कॅनॉलवर जागोजागी झुडपेपरळी : विधानसभा निवडणूक तोंडावर आल्याने उरमोडीच्या पाण्याने पेट घेतला आहे. प्रत्येक पक्षाचे लोकप्रतिनिधीचे आश्वासन उरमोडीचे पाणी घेतल्याशिवाय पूर्ण होत नाही. यासर्व धुमशानीत उरमोडीच्या तांत्रिक बाबींकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाले आहे. पाणी जोड कालव्यास सोडताना तांत्रिक कामे तशीच राहून गेली आहेत. त्यामुळे ‘पुढे पाठ, मागे सपाट’ अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.दुष्काळी तालुके अजूनही पाण्यासाठी तहानलेले आहेत. ही परिस्थिती बदलण्यासाठी उरमोडी प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली. मात्र मूळ उद्देश बाजूला राहून उरमोडीच्या पाण्याने वेगळेच वळण घेतल्याने या पाण्यावरून श्रेयवाद झाले होेत. दोन वर्षांपूर्वी उरमोडी प्रकल्पातून कण्हेर जोड कालव्यात सोडण्यात आले. यावेळी जोड कालव्याचे बरेचसे काम बाकी होते.मात्र, तेव्हापासून आजपर्यंत हा कॅनॉल मातीचाच राहिला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कॅनॉलच्या प्रकल्पानजीक असलेल्या नदीपात्रात पाणी सोडण्यासाठी केलेल्या गेटला आजतागायत वॉल, दरवाजा बसविण्यात आला नाही.उरमोडी धरणाच्या भिंतीलगत असणारा कॅनॉल अजूनही मातीचाच आहे. ४०० क्सुसेक पाण्याचा विसर्ग हे मातीचे कॅनॉल पाण्याचे प्रवाह रोखणार का? या कॅनॉलवर जागोजागी झुडपे उगवली आहेत. अजूनही कॅनॉलचे कामे अपूर्ण आहेत. माण तालुक्यात पाणी नेण्यासाठी कालवा नाही. माण-खटाव तालुक्यांला प्रत्येक ३.२८ अब्ज फुटांचे पाण्याचे वाटप झाले. मात्र, सातारा तालुक्यातील कॅनॉलची कामे अजूनही कागदावरच प्रगतिपथावर आहेत. उरमोडी उपसा योजनेअंतर्गत वाठार किरोली व कोंबडवाडी येथून ४५० फूट पाणी उलचून नेणाऱ्या लाईट बिलाचे घोंगडे अजूनही भिजत आहे. या लाईट बिलाच्या महिन्याचा खर्च ६० लाख आहे. जिल्हा नियोजनामधून दुष्काळी स्थितीतच पाणी बिले करण्याची तरतूद आहे. मग इतर वेळी पाणी उचलून न्यायचे म्हटल्यास त्याचा बोजा उचलणार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे. (वार्ताहर)भिंतीलगत असणारा कॅनॉल मातीचाउरमोडी धरणाच्या भिंतीलगत असणारा कॅनॉल अजूनही मातीचाच आहे. या कॅनॉलवर सर्वत्र झुडपांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. परंतु संबंधित ठेकेदाराने पूर्ण केलेले काम आणि त्याला काँक्रीटचे अदा केले आहे. तरीही अजून कालव्याची कामे अपूर्णच आहे. धरण प्रशासनाची दिवाळखोरीउरमोडी जोड कालव्यापासून पाणी सोडण्यात आल्याने अडीच वर्षांत पहिल्यांदाच गेट बंद करण्यात आले आहे. मात्र, हे गेट सिमेंट काँक्रीटमध्ये बांधण्यात आले आहे. उन्हाळ्यात नदीकाठच्या गावांना पाणी सोडायचे झाल्यास त्या गेटचे काँक्रीट पुन्हा फोडायला लागणार आहे. प्रकल्पाच्या गेटला दरवाजा नसणे ही धरण प्रशासनाची दिवाळखोरीच समजली जात आहे.