शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

कालव्याजवळ पाट... ... धरणाजवळ सपाट !

By admin | Updated: August 24, 2014 22:40 IST

तांत्रिक बाबींकडे दुर्लक्ष : मातीच्या कॅनॉलवर जागोजागी झुडपे

कालव्याजवळ पाट... ... धरणाजवळ सपाट !तांत्रिक बाबींकडे दुर्लक्ष : मातीच्या कॅनॉलवर जागोजागी झुडपेपरळी : विधानसभा निवडणूक तोंडावर आल्याने उरमोडीच्या पाण्याने पेट घेतला आहे. प्रत्येक पक्षाचे लोकप्रतिनिधीचे आश्वासन उरमोडीचे पाणी घेतल्याशिवाय पूर्ण होत नाही. यासर्व धुमशानीत उरमोडीच्या तांत्रिक बाबींकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाले आहे. पाणी जोड कालव्यास सोडताना तांत्रिक कामे तशीच राहून गेली आहेत. त्यामुळे ‘पुढे पाठ, मागे सपाट’ अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.दुष्काळी तालुके अजूनही पाण्यासाठी तहानलेले आहेत. ही परिस्थिती बदलण्यासाठी उरमोडी प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली. मात्र मूळ उद्देश बाजूला राहून उरमोडीच्या पाण्याने वेगळेच वळण घेतल्याने या पाण्यावरून श्रेयवाद झाले होेत. दोन वर्षांपूर्वी उरमोडी प्रकल्पातून कण्हेर जोड कालव्यात सोडण्यात आले. यावेळी जोड कालव्याचे बरेचसे काम बाकी होते.मात्र, तेव्हापासून आजपर्यंत हा कॅनॉल मातीचाच राहिला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कॅनॉलच्या प्रकल्पानजीक असलेल्या नदीपात्रात पाणी सोडण्यासाठी केलेल्या गेटला आजतागायत वॉल, दरवाजा बसविण्यात आला नाही.उरमोडी धरणाच्या भिंतीलगत असणारा कॅनॉल अजूनही मातीचाच आहे. ४०० क्सुसेक पाण्याचा विसर्ग हे मातीचे कॅनॉल पाण्याचे प्रवाह रोखणार का? या कॅनॉलवर जागोजागी झुडपे उगवली आहेत. अजूनही कॅनॉलचे कामे अपूर्ण आहेत. माण तालुक्यात पाणी नेण्यासाठी कालवा नाही. माण-खटाव तालुक्यांला प्रत्येक ३.२८ अब्ज फुटांचे पाण्याचे वाटप झाले. मात्र, सातारा तालुक्यातील कॅनॉलची कामे अजूनही कागदावरच प्रगतिपथावर आहेत. उरमोडी उपसा योजनेअंतर्गत वाठार किरोली व कोंबडवाडी येथून ४५० फूट पाणी उलचून नेणाऱ्या लाईट बिलाचे घोंगडे अजूनही भिजत आहे. या लाईट बिलाच्या महिन्याचा खर्च ६० लाख आहे. जिल्हा नियोजनामधून दुष्काळी स्थितीतच पाणी बिले करण्याची तरतूद आहे. मग इतर वेळी पाणी उचलून न्यायचे म्हटल्यास त्याचा बोजा उचलणार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे. (वार्ताहर)भिंतीलगत असणारा कॅनॉल मातीचाउरमोडी धरणाच्या भिंतीलगत असणारा कॅनॉल अजूनही मातीचाच आहे. या कॅनॉलवर सर्वत्र झुडपांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. परंतु संबंधित ठेकेदाराने पूर्ण केलेले काम आणि त्याला काँक्रीटचे अदा केले आहे. तरीही अजून कालव्याची कामे अपूर्णच आहे. धरण प्रशासनाची दिवाळखोरीउरमोडी जोड कालव्यापासून पाणी सोडण्यात आल्याने अडीच वर्षांत पहिल्यांदाच गेट बंद करण्यात आले आहे. मात्र, हे गेट सिमेंट काँक्रीटमध्ये बांधण्यात आले आहे. उन्हाळ्यात नदीकाठच्या गावांना पाणी सोडायचे झाल्यास त्या गेटचे काँक्रीट पुन्हा फोडायला लागणार आहे. प्रकल्पाच्या गेटला दरवाजा नसणे ही धरण प्रशासनाची दिवाळखोरीच समजली जात आहे.