शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
3
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
4
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
5
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
6
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
7
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
8
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
9
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
10
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
11
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
12
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
13
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
14
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
15
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
16
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
17
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
18
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
19
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
20
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं

एकाच वेळी गर्दी टाळण्यासाठी नियोजन करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:25 IST

महाबळेश्वर : महाराष्ट्राचे नंदनवन पर्यटकांसाठी खुले करण्यात आले असून बाजारपेठ ही सकाळी नऊ ते सायंकाळी चारपर्यंत उघडण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी ...

महाबळेश्वर : महाराष्ट्राचे नंदनवन पर्यटकांसाठी खुले करण्यात आले असून बाजारपेठ ही सकाळी नऊ ते सायंकाळी चारपर्यंत उघडण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे. परंतु महाबळेश्वर हे पर्यटनस्थळ असून एकाच वेळी स्थानिक आणि पर्यटकांची गर्दी होऊ नये यासाठी सकाळी अत्यावश्यक सेवा व दुपारनंतर इतर दुकानांना उघडण्यास परवानगी देऊन बाजारपेठेतील गर्दीचे विभाजन करावे, अशी मागणी महाबळेश्वर येथील व्यापाऱ्यांनी केली आहे.

तहसीलदार व मुख्याधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यातील कोरोना रुग्णवाढीचा दर खाली आल्याने कोरोनासंदर्भातील नियम शिथिल केले आहेत. महाबळेश्वर व पाचगणी ही दोन्ही पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी खुली केली असून, बाजारपेठेतील सर्व प्रकारची दुकाने सकाळी नऊ ते सायंकाळी चारपर्यंत उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. महाबळेश्वर हे पर्यटनस्थळ असून येथील स्थानिकांपेक्षा पर्यटक मोठ्या संख्येने येतात. शनिवार, रविवारी ही संख्या खूप पटीने वाढते. येथील स्थानिक नागरिक जीवनावश्यक बाबींच्या खरेदीसाठी सकाळी बाहेर पडतात. त्यामुळे सकाळी दोन ते तीन तास बाजारपेठेत ही स्थानिक नागरिकांची गर्दी होते. पर्यटक पावसाळी वातावरणामुळे सकाळी उशिरा उठतात. त्यानंतर ते परिसरातील विविध स्थळांना भेटी देतात. त्यानंतर थोडी विश्रांती घेऊन सायंकाळी खरेदीसाठी बाजारपेठेत येतात. त्यामुळे महाबळेश्वरची बाजारपेठ ही सायंकाळनंतर पर्यटकांनी नेहमी गजबजून जाते. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण जिल्ह्याचा विचार करून दुकानांच्या वेळा ठरविल्या आहेत.

या वेळेनुसार स्थानिक व पर्यटकांची एकाच वेळी गर्दी होणार आहे. या गर्दीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोकाही अधिक आहे म्हणून या गर्दीचे विभाजन करणे आवश्यक आहे. सकाळी स्थानिक नागरिकांच्या सोईसाठी सर्व अत्यावश्यक बाबींची दुकाने नेहमीप्रमाणे सकाळी नऊ ते दुपारी दोन या वेळेत उघडली जातील. दुपारी दोननंतर ही सर्व दुकाने बंद होतील. त्यानंतर स्थानिक विक्रेत्यांची इतर दुकाने सुरू होतील ही दुकाने रात्री आठ अथवा नऊ वाजता बंद होतील. बाजारपेठे अशा प्रकारे दोन वेळांमध्ये उघडण्यात आल्यास गर्दीचे विभाजन होऊन कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोकाही टाळता येणार आहे.

उपनगराध्यक्ष अफजल सुतार यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक व्यापारी यांच्या शिष्टमंडळाने मंगळवारी मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांची भेट घेतली. या शिष्टमंडळात माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर, नगरसेवक उपस्थित होते.