शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
3
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
4
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
5
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
6
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
7
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
8
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
9
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
10
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
11
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
12
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
13
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
14
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
15
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
16
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
17
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
18
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
19
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
20
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या

स्थानिकांना काम तरच टोलनाक्याला जागा

By admin | Updated: June 25, 2015 22:43 IST

आनेवाडी ग्रामस्थांचा विरोध : जमिनी भाडेपट्ट्यावर घेऊन मुलांना कायमस्वरुपी काम देण्याची शिवेंद्रसिंहराजेंकडून मागणी

सातारा : राधिका रस्त्यावरील भोसले मळ्याला लागून असलेल्या आयोध्यानगरी वसाहतीकडे जाणाऱ्या रस्त्याला ओढ्याचे स्वरूप आले आहे. या रस्त्यामध्ये पाणी साचले असून, परिसरात राहणारे वृद्ध व लहान मुलांचे आतोनात हाल होत आहेत. पावसाळ्यापूर्वी हा रस्ता दुरुस्त न झाल्याने अयोध्यानगरीवर ही परिस्थिती ओढावली आहे.काही वर्षांपूर्वी भोसले मळ्याच्या परिसरामध्ये अयोध्यानगरी वसाहात वसविण्यात आली आहे. या ठिकाणी बहुतांश उच्चभू्र लोक वास्तव्य करत आहेत. तसेच शासकीय अधिकारीही आहेत. पावसाळ्यापूर्वी येथील लोकांनी पुढाकार घेऊन रस्ता तयार केला; मात्र प्रशासनाकडून त्यांना कसलीच मदत मिळाली नाही. सध्या असणारा रस्ता अरुंद आहे. त्यामुळे रहदारीलाही मोठी अडचण होत आहे. त्यातच रस्त्याच्या शेजारी गटार आणि शेत आहे. गटारातील पाणी तुंबत असल्यामुळे शेतात आणि रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गढूळ पाणी साचत आहे. सध्या पावसाचे दिवस असल्याने काही वेळेला वसाहतीपर्यंत पाण्याचे लोट जात आहेत. या रस्त्यावरून चारचाकीमधून जाताना फारशी अडचण येत नाही; परंतु पादचारी नागरिकांना गुडघ्याभर पाण्यातून वाट काढत जावे लागत आहे. तर दुचाकीस्वारांना मात्र सर्कस करत जावे लागत आहे. शाळेला जाणाऱ्या लहान मुलांना या पाण्यातून वाट काढताना मोठी कसरत करावी लागत आहे. रस्त्यात पाणी साचल्यामुळे पाण्यातून चालताना अंदाज येत नाही. रस्त्यामध्ये छोटे-मोठे खड्डे पडल्यामुळे पाय मुरगळण्याचे प्रकारही घडत आहेत. वसाहतीच्या बाहेरच्या बाजूस अरुंद नाला आहे. हा नालाही पावसाच्या पाण्यामुळे तुंबत असून, हे पाणी वसाहतीमध्ये शिरण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालिकेने याकडे तातडीने लक्ष देऊन येथील रहिवाशांची होणारी परवड थांबवावी, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)पाण्यात पडल्याने शाळेला दांडी !काही दिवसांपूर्वी या वसाहतीमध्ये राहणारे एक पालक आपल्या मुलाला शाळेत सोडण्यासाठी दुचाकीवरून निघाले होते. पाणी साचलेल्या ठिकाणाहून वाट काढत हळूहळू ते जात होते. मात्र अचानक दुचाकी दगडावरून घसरली. त्यामुळे छोटा मुलगा आणि वडीलही पाण्यात पडले; मात्र सुदैवाने दोघांनाही दुखापत झाली नाही. त्या दिवशी त्या मुलाला शाळेत जाता आले नाही. अशा प्रकारचे वारंवार प्रकार घडत असल्याचे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे.या रस्त्याच्या मंजुरीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. ‘महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान’ या योजनेतून या रस्त्याचे काम होणार आहे. काही महिन्यांपूर्वीच हा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्याची मंजुरी मिळाल्यानंतर तातडीने या वसाहतीच्या रस्त्याचा प्रश्न निकाली काढण्यात येणार आहे. -दिलीप चिद्रे, नगर अभियंता, सातारा पालिकाया ठिकाणी सगळ्या चांगल्या सोयी असल्या तरी दळणवळणाची सोय चांगली नाही. रात्रीच्या सुमारास येथून चालत जाताना अंगावर काटा येतो. रस्त्यात पाणी साचल्यामुळे रस्ता नेमका कुठे आहे, हे दिसत नाही. पालिका प्रशासनाने आमची तातडीने दखल घेऊन रस्त्यातील पाणी काढावे.- संजय जगताप, रहिवासी