शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

वांग-मराठवाडीच्या बोगद्यातील पाईप फुटली

By admin | Updated: June 22, 2015 22:23 IST

दर्जाहीन कामाचा ‘उजेड’ : शंभर मीटर बोगद्यात पाईप कापण्याचे काम

ढेबेवाडी : वांग-मराठवाडी धरणाच्या पाण्यावर वीजनिर्मितीसाठी काढलेल्या बोगद्यातील लोखंडी पाईप दाबाने फुटून उद्ध्वस्त झाल्याने कामाच्या दर्जाबाबत शंका निर्माण झाली आहे. शंभर मीटर लांबीच्या बोगद्यातील फुटलेली पाईप कटरच्या साह्याने कापून काढण्याचे काम चालू आहे. दरम्यान, वीजनिर्मितीपूर्वीच दर्जाहीन कामाचा ‘उजेड’ पडल्याने धरणग्रस्त संघटनाही आक्रमक झाली आहे. तब्बल अठरा वर्षांपासून रडतखडत चालू असलेल्या पाटण तालुक्यातील वांग-मराठवाडी धरणप्रकल्पाचा प्रवास अजून किती दिवस चालणार? असा प्रश्न धरणग्रस्तांसह लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. धरणाच्या पाण्याचा लाभ मिळणाऱ्या कऱ्हाड-पाटण तालुक्यांतील ४६ गावांतील शेतकऱ्यांनी आपल्या चार एकरापेक्षा जास्त असणाऱ्या जमिनी धरणग्रस्तांना देऊ केल्या. उर्वरित जमिनीला पाणी मिळेल, या अपेक्षेने लाभक्षेत्रातील शेतकरी पाण्याकडे डोळे लावून बसले आहेत. शेतीच्या पाण्याबरोबरच सुमारे तीन टीएमसी पाणीसाठा होणाऱ्या या धरणावर दोन मेगावॅट वीजनिर्मितीचा प्रकल्प साकारण्याचे कृष्णा खोरे विकास महामंडळाचे ध्येय आहे. धरणाच्या कामाबरोबरच येथे सुमारे शंभर मीटर लांबीचा बोगदाही तयार करण्यात आला आहे. या बोगद्याच्या दोन्ही बाजूला लोखंडी गेट बसवून बोगद्यात सुमारे वीस फूट व्यासाची लोखंडी पाईप टाकण्यात आली होती. दरम्यान, दोन वर्षांपूर्वी येथील धरणग्रस्तांचा विरोध झुगारून प्रकल्पाची घळभरणी करून पाणीसाठा करण्यात आला. यावेळी पाणीपातळी झपाट्याने वाढून काही गावांत पाणी शिरले म्हणून घाई गडबडीत या बोगद्यातून पाणी सोडण्याचा निर्णय घेतल्याने लोखंडी पाईप फुटून उद्ध्वस्त झाल्या. (वार्ताहर) पंधरा दिवसांपासून जमा करताहेत पाईपचे तुकडे बोगद्यात पाणी येऊ नये म्हणून धरणातील पाण्याला घातलाय बांध कामगार जीवावर उधार होऊन करताहेत १५० फूट खोलीवर काम या बोगद्यातील पाईपचे काम २०११ मध्ये झाले होते. त्यावेळी धरणग्रस्तांनी कामाला विरोध केला होता. त्यानंतर पावसाच्या तोंडावर काम पूर्ण झाले; पण लगेचच त्या बोगद्यातून पाणी सोडल्याने त्या पाईप उद्ध्वस्त झाल्या तुटलेल्या पाईप बाहेर काढण्याचे काम चालू आहे. मात्र, यामुळे धरणाला कोणताही धोका नाही. - आर. वाय. रेड्डीयार, कार्यकारी अभियंता, कृष्णा खोरे

पाण्याच्या दाबाने लोखंडी पाईप फुटून उद्ध्वस्त होत असतील, तर या कामाची तपासणी कशी केली? संबंधित अधिकाऱ्यांनी त्याचा अहवाल देताना कामाचा दर्जा पाहणे गरजेचे होते. एकूणच याबाबत वरिष्ठ पातळीवर चौकशी व्हावी. - जगन्नाथ विभुते ,धरणग्रस्त नेते.