शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
2
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
3
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
4
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
5
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
6
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
7
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
8
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
9
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
10
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...
12
Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
13
Nag Panchami 2025: नागपंचमीला तळणे, चिरणे, कापणे निषिद्ध; वाचा शास्त्रीय आणि धार्मिक कारण!
14
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!
15
"...तर मी त्यांना १०० रुपये देतो", सचिन पिळगावकर आजही आवर्जुन करतात 'ही' गोष्ट, म्हणाले- "ते पैसे लोक फ्रेम करून..."
16
१३ हजारांत १०८ MP कॅमेरा, ६५००mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; नोकियाच्या नव्या फोनची चर्चा!
17
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...
18
श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू
19
Barabanki Awshaneshwar Temple Stampede : माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?

फलटण तालुका रब्बीचा; शेतकऱ्यांचा कल खरिपाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:48 IST

आदर्की : शासन दप्तरी फलटण तालुका रब्बीचा असला तरी बदलले हवामान व धोम-बलकवडीच्या पाण्यामुळे शेतकरी रब्बी हंगामापेक्षा खरीप हंगामात ...

आदर्की : शासन दप्तरी फलटण तालुका रब्बीचा असला तरी बदलले हवामान व धोम-बलकवडीच्या पाण्यामुळे शेतकरी रब्बी हंगामापेक्षा खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात पेरण्या करून उत्पादन वाढवत आहेत. त्यामुळे फलटण तालुक्याच्या पश्चिम भागात खरीप हंगामातील पेरणीपूर्व मशागती अंतिम टप्प्यात आहेत.

फलटण तालुक्याची शासन दरबारी रब्बीचा तालुका म्हणून नोंद असल्याने तालुकास्तरावर रब्बी हंगामाच्या नियोजित बैठका होत असतात; पण तालुक्याच्या पश्चिम भागात धोम-बलकवडीचे पाणी व हवामानातील बदल यामुळे शेतकऱ्यांचा उन्हाळ्यात बागायत शेती करण्याकडे कल असला तरी उन्हाळी पिके खर्चीक असल्याने मोठे भांडवलदार शेतकरी उन्हाळी पिके घेतात. परंतु खरीप हंगामाच्या तयारीसाठी उन्हाळ्यात नांगरट, फणपाळी, शेणखत टाकून कुळवाची पाळी टाकली जाते.

खरीप हंगामात बाजरी मुख्य पीक होते, तर त्यामध्ये आंतरपीक मूग, घेवडा, चवळीची पिके शेतकरी घेत होते. पण धोम-बलकवडीचे पाणी व गत पाच-सहा वर्षांपासून हवामानात बदल होऊ लागले. तसेच बाजरीचे संकरित बियाणे आल्यामुळे कमी क्षेत्रात जादा उत्पादन मिळू लागल्याने मूग, चवळीबरोबर काळा घेवडा, वरुण घेवडा, वाघा घेवडा, सोयाबीन, धना पिके जादा प्रमाणात घेतली जात आहेत. बाजरीपेक्षा मूग, घेवडा, सोयाबीन, धना पिकांना पाणी कमी लागत असते तर रिमझिम पावसावर वाढ चांगली होते. कमी कष्टात समाधानकारक उत्पादन मिळते व त्याला लोणंद, फलटण, वाठार स्टेशन या बाजारपेठा जवळ उपलब्घ असल्याने खरीप हंगामातील पिकाकडे शेतकरी वळला आहे. खरीप हंगामातील पेरणीपूर्व मशागत पूर्णत्वाकडे असून, पेरणीसाठी सज्ज झाल्याचे चित्र दिसत आहे.

चौकट

फलटण पश्चिम भागात मान्सूनचा रिमझिम पाऊस पडतो. त्यामुळे वाघा घेवडा, सोयाबीन क्षेत्रात वाढ झाली. पिकेही चांगले येत आहे; पण बियाणे प्रक्रिया, पेरणी, खते, औषध व काढणी यांचे मार्गदर्शन कृषी विभागाने केल्यास जादा उत्पादन मिळणार आहे.

फोटो

०८आदर्की

आदर्की परिसरात खरीप हंगाम पेरणीपूर्व मशागत बैलजोडीच्या मदतीने केली जाते. (छाया : सूर्यकांत निंबाळकर)