शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

अडचणीच्या काळात कायम लोकमतची साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:24 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्ताची मोठी आवश्यकता निर्माण झाली आहे. सध्या राज्याला रक्ताची गरज असून, रक्त नसल्यामुळे अनेक शस्त्रक्रिया थांबून आहेत. ...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्ताची मोठी आवश्यकता निर्माण झाली आहे. सध्या राज्याला रक्ताची गरज असून, रक्त नसल्यामुळे अनेक शस्त्रक्रिया थांबून आहेत. मात्र, लोकमत कायम अडचणीच्या काळात मदत करत असते. हीच भूमिका रक्तदान मोहिमेच्या माध्यमातून त्यांनी दाखवून दिली आहे. त्यामुळे लोकमतचा कायम आधार वाटतो, असे मत नगराध्यक्षा माधवी कदम यांनी व्यक्त केले.

शाहुपुरी येथील ज्ञानवर्धिनी शिक्षण संस्थेच्या प्राथमिक शाळेत लोकमत आयोजित रक्ताचं नातं या रक्तदान मोहिमेचे उद्घाटन नगराध्यक्षा माधवी कदम यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी ज्ञानवर्धिनी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब गोसावी, शाळेचे मुख्याध्यापक संतोष सापते, शाहुपुरी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप शितोळे, लोकमतचे वरिष्ठ शाखा व्यवस्थापक संतोष भोगशेट्टी, मुख्य उपसंपादक दीपक शिंदे, जाहिरात व्यवस्थापक संतोष जाध‌व, वितरण विभागप्रमुख अमोल यादव यांची प्रमुख उपस्थिती होती.

नगराध्यक्षा कदम म्हणाल्या, रक्ताचा पुरवठा आवश्यकतेपेक्षा कमी असल्यामुळे अनेक अडचणी निर्माण होतात. पण, लोकमतने जिल्ह्यात राबविलेल्या रक्ताचं नातं या मोहिमेमुळे सर्वांना आधार मिळणार असून, मोठ्या प्रमाणावर रक्त जमा होणार आहे. त्याचा उपयोग अनेक लोकांना होऊन त्यांना जीवदान मिळेल. त्यामुळे सर्वांनीच या रक्तदान शिबिरामध्ये सहभागी होऊन रक्तदान करावे.

सहायक पोलीस निरीक्षक सापते म्हणाले, रक्तदानासारखे महान कार्य आपल्या हातून होत आहे हे महत्त्वाचे आहे. कोरोनाचे सर्व नियम पाळून रक्तदान करावे, ते इतरांसाठी नक्कीच जीवदान ठरेल.

कार्यक्रमाला लोकमतचे संपादकीय, जाहिरात, वितरण विभागाचे सहकारी, छत्रपती मराठा साम्राज्य संघटना महाराष्ट्राचे ओंकार देशमुख आणि सहकारी, रक्तदाते निवृत्ती पाटील आदी उपस्थित होते.

चौकट

रक्तदान नव्हे जीवदान

वयाची ६५ वर्षे पूर्ण करणारे आणि आत्तापर्यंत ५४ वेळा रक्तदान केलेले निवृत्ती पाटील यांनी हे रक्तदान नव्हे जीवदान आहे, असे मत व्यक्त केले. जेव्हा एखाद्याचा अपघात होतो आणि रक्त उपलब्ध नसल्यामुळे त्याला प्राणांना मुकावे लागते, त्यावेळी रक्ताची किंमत काय आहे याची जाणीव होते. रक्तदानामुळे किमान चार जणांना जीवदान मिळत असते. त्यामुळे सर्वांनी रक्तदान केले पाहिजे. आत्तापर्यंत ५४ वेळा रक्तदान केले असून, आता वय वाढल्याने अजून एकदा रक्तदान करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला.

चौकट

लग्नाचा वाढदिवस रक्तदान करुन साजरा

लोकमतच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात अनेकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला. काहींनी आपल्या वाढदिवसानिमित्त तर काहींनी लग्नाचा वाढदिवसही रक्तदान करून साजरा केला. सहायक प्राध्यापक सूर्यकांत अदाटे आणि कुमुदिनी अदाटे यांनी लग्नाच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान केले, तर सखी मंचच्या सदस्यांनीही रक्तदान केले.