शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
3
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
4
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
5
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
6
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
7
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
8
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
9
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
10
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
11
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
12
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
13
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
14
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
15
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
16
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
17
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
18
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
19
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
20
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील तस्करांना लावला कायमचा लगाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 23:40 IST

दत्ता यादव । लोकमत न्यूज नेटवर्क परराज्य व परजिल्ह्यातून दारूची तस्करी करणाऱ्या सराईतांना कायमचा लगाम लावल्यामुळे दारूची तस्करी रोखण्यात ...

दत्ता यादव ।लोकमत न्यूज नेटवर्कपरराज्य व परजिल्ह्यातून दारूची तस्करी करणाऱ्या सराईतांना कायमचा लगाम लावल्यामुळे दारूची तस्करी रोखण्यात यश आले. रात्री-अपरात्री होणाºया दारूच्या चोरट्या वाहतुकीवरही आळा घातला गेला. त्यामुळे पूर्वीप्रमाणे गावठी दारूची होत असलेली विक्री कमी करण्यास यश आले. या संदर्भात राज्य उत्पादन शुल्कचे निरीक्षक राजेंद्रकुमार पाटील यांच्याशी केलेली बातचित..प्रश्न : दारूची तस्करी रोखण्यासाठी नेमके काय केले?उत्तर : दारूच्या तस्करीमध्ये ज्यांची नावे वारंवार पुढे येत होती. त्या लोकांची आम्ही यादी तयार केली. अशा लोकांना हद्दपारही केले. त्यामुळे पूर्वीप्रमाणे परराज्यातून होत असलेली तस्करी आता होत नाही. पैशांच्या लोभापायी अनेकजण दारू तस्करीमध्ये येत असतात; परंतु अशांवर कडक कारवाई केल्यानंतर पुन्हा त्यांची हिम्मत होत नाही. आमच्या विभागाची अशा लोकांवर सूक्ष्म नजर असते.प्रश्न : गोव्यातून मद्याचा साठा सातारा जिल्ह्यात येतो का?उत्तर : गोव्यातून बाहेर येताना सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर येथे तपासणी केंदे्र असतात. तसेच टोलनाक्यावरही तपासणी होते. त्यामुळे सातारा जिल्ह्यात अशा प्रकारचा साठा येत नाही. पूर्वी गोव्यावरून दारूची तस्करी होत होती. परंतु आता ही परिस्थिती कडक तपासणीमुळे पूर्णपणे बदलली आहे.प्रश्न : कारवाई कशी केली जाते?उत्तर : दिवसापेक्षा रात्रीच्या सुमारास दारूची तस्करी केले जाते. त्यामुळे आम्हाला सतर्क राहावे लागते. रात्रीची गस्त घालावी लागते. वाहने तपासून पुढे सोडावी लागतात. भरारी पथकही आमच्या मदतीला असते. विशेषत: या कारवाईमध्ये पोलिसांचेही चांगले सहकार्य मिळते. त्यामुळे कारवाई तत्काळ होतात. दारू दुकानांमध्येही अचानक तपासणी केली जाते. दुकानात साठा किती आहे. चोरट्या मार्गाने साठा येत नाही ना, याची तपासणी आमच्या पथकाला करावी लागते.शरीरासाठी अपायकारकहातभट्टी दारू शरीरासाठी अपायकारक असते. त्यामुळे या दारूची कुठेही निर्मिती होऊ नये, यासाठी आमचे पथक काळजी घेते. मांढरदेवची दुर्घटना घडल्यानंतर जिल्ह्यात हातभट्टीचे प्रमाण कमी झाले. वाई तालुक्यामध्ये विषारी दारूमुळे तिघांचा बळी गेला होता. अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी आम्ही गावोगावी संपर्क ठेवून असतो. परिणामी याची निर्मिती होत नाही.निवडणुकीत दक्ष राहावे लागतेकोणत्याही निवडणुकीत प्रचंड दक्ष राहावे लागते. गैरमार्गाने दारूची वाहतूक होण्याची शक्यता असते. त्यामुळे गस्त घालण्यावर आमचा भर असतो. अधीक्षक अनील चासकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोटेकोरपणे नियोजन केले जाते. गणेशोत्सवामध्येही सध्या वाहनांची तपासणी केली जात आहे. हा उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी आमचा विभाग प्रयत्नशील आहे, असेही पाटील यांनी सांगितले.