शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

जिल्ह्यातील ६५२ ग्रामपंचायतींसाठी शांततेत मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:43 IST

सातारा : जिल्ह्यातील ८७८ पैकी ६५२ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी सकाळी मतदानास प्रारंभ झाला. सर्वच ठिकाणी सकाळच्या टप्प्यात मतदारांनी रांगा लावल्या ...

सातारा : जिल्ह्यातील ८७८ पैकी ६५२ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी सकाळी मतदानास प्रारंभ झाला. सर्वच ठिकाणी सकाळच्या टप्प्यात मतदारांनी रांगा लावल्या होत्या. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. अनेक कर्मचाऱ्यांना फेसशिल्ड, मास्कचा वापर केला तर मतदारांच्या हातावर सॅनिटायझर लावण्याची सक्ती केली आहे.

जिल्ह्यातील ६५२ ग्रामपंचायतींसाठी २ हजार ३८ मतदान केंद्रांवर शुक्रवारी मतदान सुरू आहे. त्यासाठी १९ हजार ४३७ कर्मचारी कार्यरत आहेत. निवडणूक रिंगणात ९ हजार ५२१ उमेदवार उभे आहेत. बहुतांश मतदान केंद्रावर सकाळपासूनच उत्साह दिसून येत होता. ज्येष्ठ गरिकांना दुचाकी, रिक्षामधून आणले जात होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने काही सूचना केल्या होत्या. त्याचप्रमाणे मतदारांनीही खबरदारी घेल्याचे जाणवत होते. मतदान केंद्राच्या बाहेर मतदारांनी रांगा लावल्या होत्या. त्यामध्ये मतदारांना मास्कचा वापर केला असून केंद्रात आल्यानंतर मतदारांच्या हातावर सॅनिटायझर दिले जात होते.

चौकट :

बोगस मतदान झाल्याचा आरोप

सातारा तालुक्यातील माजगाव ग्रामपंचायतीसाठी परगावाहून आलेल्या व्यक्तींनी मतदान केले आहे. त्यामुळे मतदान प्रक्रिया थांबविण्याची मागणी करण्यात आली. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.