शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
4
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
5
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
6
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
7
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
8
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
10
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
11
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
13
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
14
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
15
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
16
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
17
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
18
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
19
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
20
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद

स्वातंत्र्यदिनी घडलं देशभक्तीचं दर्शन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:39 IST

देशाला स्वातंत्र्य सहजासहजी मिळालं नाही. त्यासाठी अनेकांनी प्राणांची आहुती दिली. अनेकांचं रक्त सांडलं, काहींना घरेदारे सोडून भूमिगत व्हावं लागलं, ...

देशाला स्वातंत्र्य सहजासहजी मिळालं नाही. त्यासाठी अनेकांनी प्राणांची आहुती दिली. अनेकांचं रक्त सांडलं, काहींना घरेदारे सोडून भूमिगत व्हावं लागलं, अनेक वर्षांच्या संघर्षानंतर स्वातंत्र्याचा दिवस उगवला. या स्वातंत्र्यदिनाचा सोहळा वाई नगरीत अभूतपूर्व असा साजरा झाला. त्यासाठी मुलांनी रात्रभर कमानी उभारल्या होत्या, रस्ते स्वच्छ केलेले. १५ ऑगस्ट १९४७च्या सकाळी वाईतील भाजी मंडईत झेंडा वंदनाचा कार्यक्रम शेकडोंच्या उपस्थितीत झाला अन् देश गुलामगिरीतून मुक्त झाल्याचे समाधान सर्वांच्या चेहऱ्यावर दिसून आले, अशा आठवणी प्रा. संभाजीराव पाटणे यांनी जागविल्या.

मूळचे वाई येथील प्रा. संभाजीराव पाटणे हे सध्या साताऱ्यात वास्तव्याला आहेत. त्यांचा जन्म नोव्हेंबर १९३६मध्ये झाला. सुरुवातीची अनेक वर्षे त्यांनी वाईत काढली. तेथेच त्यांनी देश स्वतंत्र झाला तो दिवस पाहिला. देश स्वतंत्र झाला तेव्हा ते ११ वर्षांचे होते. वाईतील ११ नंबरच्या शाळेत पाचवीमध्ये शिकत होते. वाईमध्ये स्वातंत्र्यापूर्वी राष्ट्र सेवा दलाची शाखा भरत होती. त्यात ते जात होते. ३० ऑगस्ट १९४४ला त्यांचे वडील सखाराम बळवंत पाटणे हे महात्मा गांधीजींना पाचगणीवरून वाईत घेऊन आले होते. त्याठिकाणी त्यांना प्रथम महात्मा गांधी यांचे दर्शन झाले. त्यांची प्रार्थना एकायला मिळाली. तर ब्राह्मो समाज संस्थेत कर्मवीर भाऊराव पाटील यांना पाहता आले. राष्ट्र सेवा दलात त्यांना राष्ट्रीय एकात्मता, ऐक्य, पारतंत्र्याची भूमिका, इंग्रजांची गुलामगिरी, पारतंत्र्याचे तोटे समजून आले.

देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा संभाजीराव पाटणे हे ११ वर्षांचे होते. देश स्वतंत्र होत असल्याचा आनंद त्यांना व त्यांच्या मित्रांना झाला होता. मध्यरात्री बाराच्या सुमारास देशाला स्वातंत्र्य मिळणार होते. तेव्हा त्यांनी ते राहात असलेल्या परिसरात कमानी उभारल्या. त्यासाठी अशोक व आंब्याच्या झाडाची पाने कमानीला लावण्यात आली होती. तसेच मुलांनी व ग्रामस्थांनी गावातील रस्ते स्वच्छ केले. सर्वत्र रांगोळी काढण्यात आली. १५ ऑगस्ट रोजी सकाळी भाजी मंडई याठिकाणी झेंडावंदन कार्यक्रम झाला.

या झेंडावंदन कार्यक्रमाला स्वातंत्र्यसैनिक अप्पाशास्त्री सोहनी, काकासाहेब देवधर, रामभाऊ मेरूरकर, शंकरराव जेजुरीकर तसेच स. ब. पाटणे हे उपस्थित होते. त्यावेळी शाळेतील मुलांना लिमलेटची गोळी, चॉकलेट आणि बिस्किटे देण्यात आली. हे सर्व एक - दोन नाही तर खिशे भरून वाटण्यात आले. त्याचबरोबर तेथे बिल्लेही विकायला आले होते. त्यावर महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, नेताजी सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभाई पटेल, क्रांतिसिंह नाना पाटील यांचे चित्र होते. त्यावेळी एक आणि दोन आण्याला बिल्ला मिळत होता. त्याचवेळी वाईमध्ये सामुदायिकरित्या जिलेबी तयार करुन ती वाटण्यात आली, अशी आठवणही संभाजीराव पाटणे यांनी जागवली. तरीही आजची परिस्थिती पाहून त्यांना कुठेतरी खंत वाटत असल्याचेही दिसून आले.

प्रतिक्रिया :

उदात्त स्वरूपाचा ध्येयवाद, अमर्याद कर्तृत्व, समर्पण वृत्ती, देशभक्तीची भावना, ऐक्य, एकात्मता, मानवता, परस्पर सामाजिक समन्वय याला जागृत करण्यासाठी भारतीय लोक जीवन आनंदी व्हावे म्हणून स्वातंत्र्य मिळविण्यासाठी लढत होते. तर छत्रपती शिवरायांनी माणसाच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत प्रज्वलित केली होती. या ज्योतीने स्वातंत्र्याची प्रेरणा दिली. स्वातंत्र्यपूर्व काळात ही प्रेरणादायी वृत्ती उपयुक्त ठरली. देशासाठी आपले सर्वस्व अर्पण करण्यासाठी या देशभक्त तरुणांमध्ये चेतना निर्माण झाली. देश स्वतंत्र झाला. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना मनामध्ये कोणते विचार येत आहेत, काय करायला हवे, काय घडते यावर शांत चित्ताने विचार करण्याची आता वेळ आली आहे.

- प्रा. संभाजीराव पाटणे

फोटो मेल .. १४ संभाजीराव पाटणे सातारा हाफ फोटो...

- नितीन काळेल

.........................................................................