शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
9
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
10
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
11
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
12
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
13
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

रूग्णांचा अजूनही डोलीतून प्रवास!

By admin | Updated: December 9, 2014 00:31 IST

सातर परिसरातील वाड्यावस्त्यांची स्थिती : रस्त्याअभावी ग्रामस्थांचे हाल, विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी रोजचीच पायपीट

सणबूर : वांग-मराठवाडी धरणाच्या एका टोकाला वसलेले सातर हे हजार लोकसंख्येचे गाव़ या गावांतर्गत माहळुंगेवाडी, लखनवाडी, बौध्दवस्ती, सुतारवाडा, धनगरवाडा या वस्त्यांचा समावेश होतो. रस्त्यासाठी संघर्ष करत या वस्त्यांमधील ग्रामस्थांच्या दोन पिढ्या संपल्या आहेत़ मात्र, तरीही शासनाला जाग येत नाही़ शासनाच्या नाकर्तेपणामुळे आजारी व्यक्तींना दवाखान्यात नेण्यासाठी आजही येथे डोलीचा वापर करावा लागत असल्याचे चित्र आहे़पाटण तालुक्याच्या दुर्गम व डोंगरदऱ्यांनी व्यापलेल्या ढेबेवाडीपासून १५ ते १७ किलोमीटरच्या अंतरावर उंच डोंगराच्या माथ्यावर ही गावे एकमेकांपासून केवळ ५०० ते ७०० मीटर अंतरावर वसली आहेत़ या ठिकाणी रस्ताच नसल्याने गावांना मूलभूत सुविधा म्हणजे काय, हे आजही माहीत नाही. जिंती गावापासून वरच्या बाजूला डोंगरातून जाण्यासाठी रस्ता आहे़ फार पूर्वीपासून डोंगरात पाऊलवाट तयार करण्यात आली आहे़ येथील ग्रामस्थ व महिला श्रमदानाने ही पायवाट प्रत्येक वर्षी तयार करतात.मात्र, पावसाळ्यात हा रस्ता वाहून जात असल्याने रस्ता मुजून जातो़ जिंतीपासूून ५ किलोमीटर अंतर दररोज पायी चालावे लागते़ त्याठिकाणी वाहने जाऊ शकत नाहीत़ रात्री-अपरात्री डोंगरदऱ्यांतून चालताना जंगली प्राण्यांच्या आवाजाने जिवाचा थरकाप उडतो. येथील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी जिंती येथे ५ किलोमीटर अंतर रोज चालत जावे लागते़ रस्ता नसल्याने विद्यार्थी डोंगरदऱ्यातून मार्ग काढत शिक्षण घेत आहेत़ या रस्त्यासाठी ग्रामस्थांनी अनेकवेळा नेत्यांना निवेदने देऊन आपल्या अडचणी सांगितल्या़ मात्र, राजकीय नेत्यांनी त्यांना आजपर्यंत फक्त आश्वासने देऊन झुलवत ठेवले आहे़ डोंगरदऱ्यांतून ये-जा करताना वन्य श्वापदांचा त्रास सहन करावा लागत आहे़ केवळ रस्त्याअभावीच ही वेळ ग्रामस्थांवर आली आहे़ या दुर्गम वाड्यावस्त्यांवर रस्ता केव्हा पोहोचणार आणि प्रगतीचे वारे केव्हा पोहोचणार, याची प्रतीक्षा तीन पिढ्या सुरू आहे. (वार्ताहर)