शहरं
Join us  
Trending Stories
1
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
3
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
4
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
5
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
6
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
7
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
8
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
9
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
10
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
11
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
12
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
13
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
14
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
15
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
16
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
17
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
18
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
19
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
20
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार

पाटणचे जलसंपदा प्रकल्प निधीअभावी रखडले-प्रकल्पग्रस्तांच्या शेतीलाही पाणी मिळेना :

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 22:28 IST

पाटण : पाण्याशिवाय तालुक्यातील डोंगरदऱ्यांतील शेतकºयांची प्रगती नाही. जिल्ह्यामध्ये शासनाच्या जलसंपदा विभागाने २००० मध्ये काही प्रकल्प हाती घेतले. त्यामुळे ...

ठळक मुद्देमोरगिरी, साखरी, निवकणे, बिबी प्रकल्प ठप्प, लोकप्रतिनिधींचे प्रयत्न सुरू

पाटण : पाण्याशिवाय तालुक्यातील डोंगरदऱ्यांतील शेतकºयांची प्रगती नाही. जिल्ह्यामध्ये शासनाच्या जलसंपदा विभागाने २००० मध्ये काही प्रकल्प हाती घेतले. त्यामुळे तालुक्यातील हजारो कोटी खर्च करून उभे राहिलेले प्रकल्प आता काही कोटींच्या निधीसाठी अपूर्णावस्थेत आहेत.

पाटण तालुक्यातील मोरगिरी, साखरी चिटेघर, निवकणे आणि बिबी येथील सलतेवाडीजवळ असणारा लहान प्रकल्प अपूर्णावस्थेत आहे. तालुक्यातील हे प्रकल्प लवकर मंजुरी मिळवून ते लवकर पूर्ण होण्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले होते. हे प्रकल्प पूर्ण होऊन स्थानिकांच्या शेतीला पाणी आणि त्याबरोबर भौगोलिक परिस्थितीचा फायदा व्हावा, यासाठी लोकप्रतिनिधी प्रयत्न करीत होते. या प्रकल्पांमुळे पर्यटन, मत्स्यशेतीलाही फायदा झाला असता. पूरक व्यवसाय उभे राहून भूमिपुत्रांच्या हाताला काम मिळाले असते.

पाटण तालुक्याचा भौगोलिक परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी सर्वात जास्त लहान-मोठे प्रकल्प हे एकट्या पाटण तालुक्यात आले. सुरुवातीला या प्रकल्पाकरिता शासनाने निधीही दिला. मात्र त्यानंतर या प्रकल्पांकडे दुर्लक्ष करण्यात आले. मोरणा गुरेघर प्रकल्पाचे पाणी हे डाव्या तीरावरून सोळा किलोमीटर आणि उजव्या तीरावरून ३२ किलोमीटरचे कालवे काढून शेतीसाठी पुरविण्यात येणार होते. मात्र, सध्या या प्रकल्पात पाणीसाठा असूनही सर्वसामान्य शेतकºयांपर्यंत पाणी पोहोचू शकले नाही. दोन्ही बाजूने कालव्याचे काम करण्यासाठी निधीचा तुडवडा आहे. त्यामुळे कालव्याची कामे रखडली आहेत. तर काही ठिकाणी राजकारण करण्यात आले आहे. त्यामुळे या विभागातील शेतकºयांना कर्ज काढून मोरणा नदीमधून पाणी उचलून शेतीला घ्यावे लागले. कालव्यातून पाणी मिळाले असते तर मोरणा विभाग सधन आणि संपन्न दिसला असता.

बिबी गावाजवळच सलतेवाडी येथील येडोबा नाल्यावर संपूर्ण मातीच्या बंधाºयाचे काम सुमारे ८० टक्के पूर्ण असून, राहिलेल्या कामाचे माती परीक्षण करण्यासाठी पाच वर्षे झाली तरी अद्याप संबंधित विभागाकडून कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे ८० टक्के काम होऊनही पाणीसाठा पूर्ण क्षमतेने झाला नाही. फक्त जमिनी देऊन अपूर्ण राहिलेल्या प्रकल्पाकडे निव्वळ पाहत बसण्याची वेळ तालुक्यातील जनतेवर आली आहे.

निवकणे प्रकल्पाकरिता जनतेला जवळपास पंधरा वर्षे जमिनी देऊनही शेतीला पाणी मिळाले नाही. दरवर्षी या प्रकल्पाच्या कामाकडे शेतकरी डोळे लावून बसलेले असतात. यावर्षी तरी अपूर्ण प्रकल्पाला निधी मिळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना असते. मात्र, शासनांची घोर निराशा करत आहे.

निवकणे प्रकल्पाकरिता जनतेला जवळपास पंधरा वर्षे जमिनी देऊनही शेतीला पाणी मिळाले नाही. दरवर्षी या प्रकल्पाच्या कामाकडे शेतकरी डोळे लावून बसलेले असतात. यावर्षी तरी अपूर्ण प्रकल्पाला निधी मिळेल, अशी अपेक्षा शेतकºयांना असते. मात्र, शासनांची घोर निराशा करत आहे.

 

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरDamधरण