शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
2
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
3
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
4
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
5
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
6
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
7
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
8
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
9
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
11
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
12
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
13
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!
14
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
15
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
16
उल्हासनगर महापालिका कलानी मुक्त करणार; भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश वधारियांचा इशारा
17
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
18
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
19
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
20
शेरवानी घातली, फेटा बांधला, नवरदेव तयार झाला; तितक्यात एक फोन आला अन् सगळ्यांनाच धक्का बसला!

परीक्षेविना दहावीची पोरं पास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:29 IST

सातारा : राज्य माध्यमिक शालांत म्हणजे दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवारी ऑनलाईन जाहीर करण्यात आला. सातारा जिल्ह्याचा निकाल ९९.९२ टक्के ...

सातारा : राज्य माध्यमिक शालांत म्हणजे दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवारी ऑनलाईन जाहीर करण्यात आला. सातारा जिल्ह्याचा निकाल ९९.९२ टक्के लागला असून, विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाआधारे गुण देण्यात आले. वर्ग न भरता, परीक्षा न देता उत्तीर्ण होण्याचा बहुमान प्रथमच दहावीच्या विद्यार्थ्यांनी मिळविला; परंतु शिक्षण मंडळाची वेबसाईट बंद पडल्याने विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहता आला नाही. त्यामुळे अनेकांच्या आनंदावर विरजण पडले.

राज्य शिक्षण मंडळामार्फत दि. २९ एप्रिल ते २३ मे दरम्यान दहावीची लेखी परीक्षा घेण्यात येणार होती. मात्र, कोरोनामुळे परीक्षा रद्द करण्यात आली. त्यानंतर दहावीचा निकाल अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारित जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला. विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन करण्यासाठी आणि ते संगणक प्रणालीत नोंदविण्यासाठी माध्यमिक शाळांना दि. २३ जून ते ३ जुलै अशी मुदत देण्यात आली होती.

शाळांकडून संगणक प्रणालीमार्फत विद्यार्थ्यांचे गुण विभागीय मंडळाकडे पाठविण्यात आले. त्यानंतर विभागीय मंडळाने शाळांकडून आलेले अंतर्गत गुण एकत्रित करून विद्यार्थ्यांचा अंतिम निकाल तयार करण्याचा प्रस्ताव राज्य मंडळाकडे पाठवला. नववीचा अंतिम निकाल, दहावीचे वर्षभरातील प्रात्यक्षिक, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन याच्याआधारे विषयनिहाय निकालासाठी गुणदान करण्यात आले. यानंतर विद्यार्थ्यांना दहावीचे अंतिम गुण देऊन निकाल जाहीर करण्यात आला.

सातारा जिल्ह्यातील दहावीच्या ४० हजार १६६ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. ४० हजार १६५ विद्यार्थ्यांना मूल्यमापनाच्या आधारित गुण देण्यात आले. यापैकी ४० हजार १३४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, एकूण निकाल ९९.९२ टक्के लागला आहे. शुक्रवारी दुपारी एक वाजता ऑनलाईन निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी इंटरनेट कॅफेत निकालाची प्रिंट काढण्यासाठी गर्दी केली. अनेकांनी राज्य मंडळाकडून जाहीर करण्यात आलेल्या संकेतस्थळावर मोबाईलच्या माध्यमातून निकाल पाहण्याचा प्रयत्न केला; परंतु निकालाचे संकेतस्थळ बंद पडल्याने विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहता आला नाही. सायंकाळी उशिरापर्यंत संकेतस्थळ सुरू झाले नव्हते. निकाल म्हटलं की विद्यार्थ्यांमध्ये एकप्रकारची हुरहूर असायची. भीती व आनंदही असायचा. यंदा असे चित्र पाहायला मिळाले नाही. यंदा ना वर्ग भरले ना दहावीची परीक्षा झाली. पास होण्याची खात्री असल्याने विद्यार्थ्यांनी घरूनच आनंद साजरा केला.

(चौकट)

कोल्हापूर विभागात सातारा दुसरा

कोल्हापूर विभागाचा निकाल ९९.९२ टक्के लागला आहे. यामध्ये सांगली ९९.९४, सातारा ९९.९२, तर कोल्हापूर ९९.९० टक्के गुणांसह अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय स्थानी आहे.

(चौकट)

सातारा जिल्ह्याचा लेखाजोखा

* माध्यमिक शाळा ७२६

----------

* नियमित विद्यार्थी

नोंदणी ४०१६६

मूल्यांकनप्राप्त विद्यार्थी ४०१६५

उत्तीर्ण विद्यार्थी ४०१३४

उत्तीर्णतेची टक्केवारी ९९.९२

------------

* पुन:प्रविष्ट विद्यार्थी (रिपिटर)

नोंदणी १५०१

मूल्यांकनप्राप्त विद्यार्थी १५०१

उत्तीर्ण विद्यार्थी १४०४

उत्तीर्णतेची टक्केवारी ९३.५३