शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
3
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
4
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
5
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
6
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
7
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
8
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
9
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
10
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
11
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
12
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
13
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
14
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
15
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
16
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
17
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
18
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
19
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
20
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द

जनतेच्या सहभागातून परिवर्तन शक्य

By admin | Updated: July 30, 2014 23:41 IST

राणी बंग यांचे उद््गार : गडचिरोली जिल्ह्यातील अनुभव ऐकून सातारकर भारावले

सातारा : मागास आदिवासी स्त्री-पुरुषांचे सहकार्य, आरोग्य सुधारणांना जनतेने दिलेली साथ, विविध आरोग्य योजनांतला सहभाग, यामुळेच गडचिरोली जिल्ह्यात समग्र आरोग्य क्रांती आणि व्यसनमुक्तीची महत्त्वाकांक्षी योजना यशस्वी झाली आणि या प्रकल्पाची नोंद संयुक्त राष्ट्रसंघानेही घेतली. सामान्यांनी मनावर घेतले तर अवघड कामेही सोपी होतात, असे विचार ज्येष्ठ समाजसेविका, ‘शोध’ संस्थेच्या संचालिका डॉ. राणी बंग यांनी व्यक्त केले.सातारा जिल्हा स्त्री-आरोग्य आणि प्रसूतीशास्त्र तंत्र संघटनेच्यावतीने ‘विजयगाथा गडचिरोलीची’ या विषयावर जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात झालेल्या व्याख्यानात त्या बोलत होत्या. संघटनेचे माजी अध्यक्ष डॉ. मिलिंद शहा यांच्या आई मनोरमा आणि वडील रसिकलाल शहा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित व्याख्यानमालेत बोलताना डॉ. राणी बंग यांनी गडचिरोली जिल्ह्यात क्रांती घडविणाऱ्या आरोग्य सुधारणांचा आढावा घेतला.त्या म्हणाल्या, ‘तीस वर्षांपूर्वी मी आणि डॉ. अभय बंग यांनी गडचिरोलीत रुग्णालय सुरू केले, तेव्हा प्रतिकूल परिस्थितीशी सामना करावा लागला. आदिवासी महिला, पुरुष आणि बालकांच्या समस्यांचा अभ्यास करून आम्ही त्यावर उपाययोजना करताना त्यांच्या मानसिकतेचाही गांभीर्याने अभ्यास केला. साक्षरतेचे अत्यल्प प्रमाण, बालविवाह, व्यसनाधीनता, कुपोषण अशा अनेक समस्यांवर मात करताना आदिवासी स्त्री-पुरुषांचेच साह्य मिळाले. आदिवासी समाजात सुईणीचे काम करणाऱ्या महिलेला आमच्या ‘शोध’ संस्थेने प्रसुतीचे अत्याधुनिक तंत्रज्ञान शिकवले. गावागावांत पुरुषांना आरोग्यदूत नेमले. अंधश्रध्दा आणि रूढी-परंपरांपासून त्यांची सुटका व्हावी, यासाठी प्रयत्न केले.’ (प्रतिनिधी)