शहरं
Join us  
Trending Stories
1
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशूंशी संवाद
2
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
3
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
4
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
7
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
8
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
9
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
10
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
11
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
12
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
13
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
14
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
15
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
16
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
17
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 
18
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
19
केदारनाथ येथील हेलिकॉप्टर अपघातात पायलट मुलाचा मृत्यू, पुत्रवियोगाने दु:खी आईने १३ दिवसांनी सोडले प्राण  
20
Aadhaar Card वर तुम्ही मोबाइल नंबर ऑनलाइन बदलू शकता का? काय आहे सर्वात सोपी प्रोसेस, पाहा

जनतेच्या सहभागातून परिवर्तन शक्य

By admin | Updated: July 30, 2014 23:41 IST

राणी बंग यांचे उद््गार : गडचिरोली जिल्ह्यातील अनुभव ऐकून सातारकर भारावले

सातारा : मागास आदिवासी स्त्री-पुरुषांचे सहकार्य, आरोग्य सुधारणांना जनतेने दिलेली साथ, विविध आरोग्य योजनांतला सहभाग, यामुळेच गडचिरोली जिल्ह्यात समग्र आरोग्य क्रांती आणि व्यसनमुक्तीची महत्त्वाकांक्षी योजना यशस्वी झाली आणि या प्रकल्पाची नोंद संयुक्त राष्ट्रसंघानेही घेतली. सामान्यांनी मनावर घेतले तर अवघड कामेही सोपी होतात, असे विचार ज्येष्ठ समाजसेविका, ‘शोध’ संस्थेच्या संचालिका डॉ. राणी बंग यांनी व्यक्त केले.सातारा जिल्हा स्त्री-आरोग्य आणि प्रसूतीशास्त्र तंत्र संघटनेच्यावतीने ‘विजयगाथा गडचिरोलीची’ या विषयावर जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात झालेल्या व्याख्यानात त्या बोलत होत्या. संघटनेचे माजी अध्यक्ष डॉ. मिलिंद शहा यांच्या आई मनोरमा आणि वडील रसिकलाल शहा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित व्याख्यानमालेत बोलताना डॉ. राणी बंग यांनी गडचिरोली जिल्ह्यात क्रांती घडविणाऱ्या आरोग्य सुधारणांचा आढावा घेतला.त्या म्हणाल्या, ‘तीस वर्षांपूर्वी मी आणि डॉ. अभय बंग यांनी गडचिरोलीत रुग्णालय सुरू केले, तेव्हा प्रतिकूल परिस्थितीशी सामना करावा लागला. आदिवासी महिला, पुरुष आणि बालकांच्या समस्यांचा अभ्यास करून आम्ही त्यावर उपाययोजना करताना त्यांच्या मानसिकतेचाही गांभीर्याने अभ्यास केला. साक्षरतेचे अत्यल्प प्रमाण, बालविवाह, व्यसनाधीनता, कुपोषण अशा अनेक समस्यांवर मात करताना आदिवासी स्त्री-पुरुषांचेच साह्य मिळाले. आदिवासी समाजात सुईणीचे काम करणाऱ्या महिलेला आमच्या ‘शोध’ संस्थेने प्रसुतीचे अत्याधुनिक तंत्रज्ञान शिकवले. गावागावांत पुरुषांना आरोग्यदूत नेमले. अंधश्रध्दा आणि रूढी-परंपरांपासून त्यांची सुटका व्हावी, यासाठी प्रयत्न केले.’ (प्रतिनिधी)