शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

पालकत्व नाकारले.. अन्

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : सातारा पालिकेने शहरातील भटक्या श्वानांचे पालकत्व नाकारल्यानेच आज त्यांना जीव गमवावा लागत आहे. जर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : सातारा पालिकेने शहरातील भटक्या श्वानांचे पालकत्व नाकारल्यानेच आज त्यांना जीव गमवावा लागत आहे. जर दोन-चार वर्षांपूर्वी पालिकेने निर्बीजीकरणाची मोहीम सक्षमपणे राबविली असती तर श्वानांच्या संख्येवर नियंत्रण आले असते, तसेच अज्ञातांना त्यांच्यावर विषप्रयोग करण्याची वेळही आली नसती, असे मत प्राणितज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.

जिल्ह्यासह सातारा शहरात भटक्या श्वानांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून, आज ती हजारोंच्या घरात पोहोचली आहे. या श्वानांकडून नागरिकांवर हल्ले करण्याच्या घटनाही सातत्याने घडत आहेत. शहरात एकीकडे श्वानांचा उपद्रव सुरू असताना दुसरीकडे चार भटक्या श्वानांचा नुकताच आकस्मित मृत्यू झाल्याने हा विषय पुन्हा एकदा चर्चेचा ठरला आहे. वाढती संख्या व उपद्रवामुळेच या श्वानांवर कोणीतरी विषप्रयोग केला असावा, असे सांगितले जात आहे. असे असले तरी पालिकेने भटक्या श्वानांचा विषय आजवर कधीच गांभीर्याने घेतला नाही. त्यामुळेच मुक्या प्राण्यांना जीव गमवावा लागत असल्याचे प्राणितज्ज्ञांचे म्हणणे आहे.

पालिका प्रशासनाने २०१६ मध्ये श्वानांना पकडण्यासाठी डॉग व्हॅनचा विषय मंजूर केला होता. मात्र, हा विषय आजअखेर केवळ कागदावरच आहे. यानंतर चार वर्षांपूर्वी श्वानांच्या निर्बीजीकरणाची मोहीम हाती घेतली. एका संस्थेशी करार करून पालिकेने शहरात राबविलेली ही मोहीम अर्ध्यावरच थंडावली. त्यामुळे भटक्या श्वानांची संख्या अन् त्यांची दहशत कमी होण्याऐवजी ती वाढू लागली आहे.

(चौकट)

चार वर्षांनंतर निर्बीजीकरण मोहीम !

सातारा शहरात श्वानांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली असून, नागरिकांमधून भटक्या श्वानांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी सातत्याने केली जात आहे. याची दखल घेत पालिकेने चार वर्षांनंतर भटक्या श्वानांच्या निर्बीजीकरणाची मोहीम हाती घेतली आहे. या कामाची निविदा प्रक्रिया सुरू झाली असून, एका खासगी संस्थेमार्फत ही मोहीम राबविली जाणार आहे.

(चौकट)

श्वानांनी जिल्ह्यात इतक्या

जणांना घेतला चावा

२०१७ १६,१३१

२०१८ २१,०६८

२०१९ २६,३९२

२०२० २६,२५७

२०२१ ११६०

(चौकट)

यामुळे पिसाळताहेत श्वान

- संचारबंदीत हॉटेल, हातगाडे, दुकाने बंद होती.

- त्यामुळे श्वानांना सहज मिळणारे अन्न बंद झाले.

- लोकांनी त्यांना खाऊ-पिऊ घालणेही बंद केले.

- मिळेल त्या अन्नासाठी श्वानांमध्ये किळवंड सुरू झाली.

- त्यामुळे श्वान आक्रमक झाले व पिसाळण्याचे प्रमाण वाढले.

- वाहनधारक व पादचाऱ्यांच्या अंगावरही ते धावून जाऊ लागले.

(कोट)

वर्षभरात श्वानाची एक मादी दहा पिलांना जन्म देते. यातील सात-आठ पिले आजाराने व अपघाती मृत्युमुखी पडतात. श्वानांची संख्या रोखण्यासाठी पालिकेने उशिरा का होईना निर्बीजीकरण मोहीम हाती घेतली आहे. ही मोहीम केवळ कागदावर न राहता ती प्रभावीपणे राबवायला हवी.

- सायली त्रिंबके, साया अ‍ॅनिमल केअर, सातारा