शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

पालकत्व नाकारले.. अन्

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : सातारा पालिकेने शहरातील भटक्या श्वानांचे पालकत्व नाकारल्यानेच आज त्यांना जीव गमवावा लागत आहे. जर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : सातारा पालिकेने शहरातील भटक्या श्वानांचे पालकत्व नाकारल्यानेच आज त्यांना जीव गमवावा लागत आहे. जर दोन-चार वर्षांपूर्वी पालिकेने निर्बीजीकरणाची मोहीम सक्षमपणे राबविली असती तर श्वानांच्या संख्येवर नियंत्रण आले असते, तसेच अज्ञातांना त्यांच्यावर विषप्रयोग करण्याची वेळही आली नसती, असे मत प्राणितज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.

जिल्ह्यासह सातारा शहरात भटक्या श्वानांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून, आज ती हजारोंच्या घरात पोहोचली आहे. या श्वानांकडून नागरिकांवर हल्ले करण्याच्या घटनाही सातत्याने घडत आहेत. शहरात एकीकडे श्वानांचा उपद्रव सुरू असताना दुसरीकडे चार भटक्या श्वानांचा नुकताच आकस्मित मृत्यू झाल्याने हा विषय पुन्हा एकदा चर्चेचा ठरला आहे. वाढती संख्या व उपद्रवामुळेच या श्वानांवर कोणीतरी विषप्रयोग केला असावा, असे सांगितले जात आहे. असे असले तरी पालिकेने भटक्या श्वानांचा विषय आजवर कधीच गांभीर्याने घेतला नाही. त्यामुळेच मुक्या प्राण्यांना जीव गमवावा लागत असल्याचे प्राणितज्ज्ञांचे म्हणणे आहे.

पालिका प्रशासनाने २०१६ मध्ये श्वानांना पकडण्यासाठी डॉग व्हॅनचा विषय मंजूर केला होता. मात्र, हा विषय आजअखेर केवळ कागदावरच आहे. यानंतर चार वर्षांपूर्वी श्वानांच्या निर्बीजीकरणाची मोहीम हाती घेतली. एका संस्थेशी करार करून पालिकेने शहरात राबविलेली ही मोहीम अर्ध्यावरच थंडावली. त्यामुळे भटक्या श्वानांची संख्या अन् त्यांची दहशत कमी होण्याऐवजी ती वाढू लागली आहे.

(चौकट)

चार वर्षांनंतर निर्बीजीकरण मोहीम !

सातारा शहरात श्वानांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली असून, नागरिकांमधून भटक्या श्वानांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी सातत्याने केली जात आहे. याची दखल घेत पालिकेने चार वर्षांनंतर भटक्या श्वानांच्या निर्बीजीकरणाची मोहीम हाती घेतली आहे. या कामाची निविदा प्रक्रिया सुरू झाली असून, एका खासगी संस्थेमार्फत ही मोहीम राबविली जाणार आहे.

(चौकट)

श्वानांनी जिल्ह्यात इतक्या

जणांना घेतला चावा

२०१७ १६,१३१

२०१८ २१,०६८

२०१९ २६,३९२

२०२० २६,२५७

२०२१ ११६०

(चौकट)

यामुळे पिसाळताहेत श्वान

- संचारबंदीत हॉटेल, हातगाडे, दुकाने बंद होती.

- त्यामुळे श्वानांना सहज मिळणारे अन्न बंद झाले.

- लोकांनी त्यांना खाऊ-पिऊ घालणेही बंद केले.

- मिळेल त्या अन्नासाठी श्वानांमध्ये किळवंड सुरू झाली.

- त्यामुळे श्वान आक्रमक झाले व पिसाळण्याचे प्रमाण वाढले.

- वाहनधारक व पादचाऱ्यांच्या अंगावरही ते धावून जाऊ लागले.

(कोट)

वर्षभरात श्वानाची एक मादी दहा पिलांना जन्म देते. यातील सात-आठ पिले आजाराने व अपघाती मृत्युमुखी पडतात. श्वानांची संख्या रोखण्यासाठी पालिकेने उशिरा का होईना निर्बीजीकरण मोहीम हाती घेतली आहे. ही मोहीम केवळ कागदावर न राहता ती प्रभावीपणे राबवायला हवी.

- सायली त्रिंबके, साया अ‍ॅनिमल केअर, सातारा