शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

बनवडी फाट्यावर मोकाट श्वानांची दहशत वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:37 IST

कोपर्डे हवेली : कोपर्डे हवेली हद्दीतील सिंदल ओढा ते बनवडी फाटा यादरम्यान मोकाट श्वानांचा वावर वाढल्यामुळे वाहनधारक तसेच शेतकऱ्यांनाही ...

कोपर्डे हवेली : कोपर्डे हवेली हद्दीतील सिंदल ओढा ते बनवडी फाटा यादरम्यान मोकाट श्वानांचा वावर वाढल्यामुळे वाहनधारक तसेच शेतकऱ्यांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कऱ्हाड-मसूर रस्त्यावरून मोकाट श्वान फिरत असतात. अचानक वाहनांच्या समोर श्वान आल्याने अपघात घडत आहेत. तर बनवडी फाटा येथे हे श्वान मोठ्या प्रमाणावर वावरत असतात. रस्त्यावरच ते ठाण मांडून बसत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. ग्रामपंचायतीने श्वानांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

कऱ्हाड ते विटा रस्त्याला अतिक्रमणाचा विळखा

कऱ्हाड : कऱ्हाड ते विटा रस्त्यावर अतिक्रमण वाढले असून रस्त्याच्या दुतर्फा झालेल्या अतिक्रमणामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. तसेच वाढलेली बेसुमार झाडेझुडपे, घाणीचे साम्राज्य, रस्त्यावरील मोठे खड्डे, वाहन पार्किंगसाठी जागेचा अभाव आदी गंभीर समस्यांमुळे वाहनधारकांसह प्रवासी त्रस्त झाले आहेत. कऱ्हाड-पंढरपूर-विजापूर हा राज्यमार्ग असून त्याला केंद्र सरकारने राष्ट्रीय महामार्गाची मान्यता दिली आहे. त्यामुळे रस्त्याला वाढते महत्त्व आले असून ही परिस्थिती लक्षात घेऊन बांधकाम विभागाने रस्त्यानजीकचे अतिक्रमण हटवावे, अशी मागणी केली जात आहे.

अनेक वर्षांपासून नाल्यांची सफाईच नाही

मलकापूर : कऱ्हाड-ढेबेवाडी रस्त्याच्या दुतर्फा बांधलेल्या आरसीसी नाल्यांची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे. याचे सर्वाधिकार याच विभागाकडे आहेत. मात्र, नालेनिर्मितीपासून एकदाही या नाल्यांची साफसफाई केलेली नाही. त्यामुळे या परिसरात अनेक ठिकाणी दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. काही ठिकाणी दगड, माती व कचऱ्यामुळे नाले तुंबले आहेत, तर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर झुडपे वाढली आहेत. डासांचा प्रादुर्भावही वाढला आहे. त्यामुळे बांधकाम विभागाने नाल्यांची सफाई करणे गरजेचे आहे.

शेतकऱ्यांचा सेंद्रीय शेतीकडे वाढला कल

कोपर्डे हवेली : वाढता उत्पादन खर्च, उत्पादनातील घट, बाजारपेठेत शेतीमालाला मिळणारा अनियमित भाव, रासायनिक खतांचा अतिरिक्त वापर आणि यामुळे जमिनीचा खालावलेला दर्जा आदी कारणांमुळे कोपर्डे हवेलीसह परिसरातील शेतकऱ्यांचा सेंद्रिय शेती करण्याकडे कल वाढला आहे. पिकांमध्ये सेंद्रिय खते वापरून वाढीव उत्पादनाबरोबरच जमिनीचा पोत सुधारण्यासाठी शेतकरी प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या या प्रयत्नांना यशही येत असल्याचे दिसून येत आहे. सेंद्रिय शेतीमालाला बाजारपेठेत मागणीही चांगली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न मिळत आहे. टोमॅटोसह इतर पिकांमध्येही सध्या सेंद्रिय खते शेतकरी वापरत आहेत.