शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

कोयना भागात भाताची लावणी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:26 IST

कोयनानगर : पाटण तालुक्यातील कोयना भागात गत दहा ते बारा दिवसांपासून दमदार पावसाने हजेरी लावण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे ...

कोयनानगर : पाटण तालुक्यातील कोयना भागात गत दहा ते बारा दिवसांपासून दमदार पावसाने हजेरी लावण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी भात लावणीला सुरूवात केली असून, शिवार गजबजून गेल्याचे दिसून येत आहे.

यंदा मे महिन्यापासूनच चक्रीवादळ व अवकाळी रूपाने काही दिवस वगळता पावसाने मुक्काम ठोकल्याने खरीपपूर्व मशागतीची कामे लवकरच उरकली. तसेच ७ जूननंतर होणारी तरवे पेरणी मे अखेरीपासूनच सुरू झाल्याने २१ दिवसांच्या कालावधीनंतर सुरू होणारी भात रोपांची लावणी काहीशी लवकर सुरू झाली आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांच्या अपेक्षेप्रमाणे पाऊस पडत आहे. गत चार दिवसांपासून पावसाने उघडीप घेतली असली तरी ओढे, नाल्याचे आडवे पाट किंवा वीज पंप, इंजिनची सोय असलेल्या शेतात भात लावणी सुरू झाली आहे.

२० ते २२ दिवसांपूर्वी पेरलेले तरू उपटून बैल अथवा यंत्राच्या साह्याने चिखलणी करून गुडघाभर चिखलात भाताची रोपे लावली जातात. लावण पध्दतीने भाताचे उत्पन्न चांगले मिळत असून, चिखलणी करताना तण चिखलात गाडल्याने एक भांगलण वाचते. त्यामुळे बहुतांशी शेतकरी ही पारंपरिक पद्धतच अवलंबत आहेत. सह्याद्रीच्या रांगांमधून विस्तारलेल्या व पावसाचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोयना भागात निसर्गाशी संघर्ष करत उताराच्या जमिनीवर प्रामुख्याने भात, नाचणीची पिके घेतली जातात.

- चौकट

शेतीमध्ये पुन्हा पैरा पद्धत

लहरी निसर्ग, वन्यप्राण्यांचा उपद्रव व मजुरांच्या टंचाईमुळे येथील शेती पुरती अडचणीत आली आहे. दिवसेंदिवस शेतात राबणाऱ्यांची संख्या कमी झाल्यामुळे पैरा पध्दत पुन्हा रूढ होऊ लागली आहे. पैरा पध्दतीत रोजंदारीवर कामावर न जाता एकावेळी अनेकांनी एकाच्या शेतात कामाला जायचे. एकमेकांना मदत करायची. त्यामुळे शेतीची काम योग्य वेळेत होत आहेत.

फोटो : २४ केआरडी ०२

कॅप्शन : पाटण तालुक्यातील कोयना भागात शिरळ येथे शेतकऱ्यांनी भाताच्या रोपांची लावणी सुरू केली आहे. (छाया : नीलेश साळुंखे)