शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
2
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
3
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
4
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...
5
"सेलिब्रिटी पैसे देऊन..."; अमिषा पटेलने उलगडलं बॉलिवूड इंडस्ट्रीचं गुपित, सांगितलं 'ते' सत्य
6
शेवटी आईच ती! स्वत:ला झोकून दिले आणि लेकीला मगरीच्या जबड्यातून सोडवले, पण... 
7
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
8
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
9
२२ सप्टेंबरपासून टीव्ही, फ्रीज, एसीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार; किती रुपयांची बचत होईल?
10
Cloudburst In Maharashtra: अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला
11
कहानी में ट्विस्ट! नवऱ्याने बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं, आता 'त्याचं' भलतंच सत्य समोर आलं
12
सचिनला तुम्ही सीनिअर आहात?, मिश्कील प्रश्नावर दिलीप प्रभावळकरांना आलं हसू; मग म्हणाले...
13
दबावाखाली बाजार: ऑक्टोबर ‘ब्रेकआउट’ देईल की ‘ब्रेक’ घ्यावा लागेल?
14
झारखंडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; तीन माओवादी ठार, एकावर एक कोटी रुपयांचे बक्षीस
15
रशिया युक्रेन युद्ध संपूर्ण युरोपात पसरणार, NATO देशांचं सैन्य सज्ज; झेलेन्स्कींचा जगाला मोठा इशारा
16
अहिल्यानगरमध्ये भूकंपाचे धक्के! बोटा, घारगाव परिसर हादरला; लोकांमध्ये भीतीचे वातावरण
17
VIRAL : भूकंपाच्या झटक्यानं आसाम हादरलं, नर्सनी धाडस दाखवलं! स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले बाळांचे प्राण 
18
'दशावतार' पाहायला गेलेल्या अमराठी प्रेक्षकाच्या डोळ्यांत पाणी, दिलीप प्रभावळकरांना दिला कडक सॅल्यूट, थिएटरमधील व्हिडीओ
19
हृदयद्रावक! BMW ने घेतला भारत सरकारच्या मोठ्या अधिकाऱ्याचा जीव; नेमकं काय घडलं?
20
UPI Rule Change: आजपासून मोठा बदल, मोठा दिलासा; आता UPI मधून एका दिवसात करू शकता 'इतक्या' लाखांचं ट्रान्झॅक्शन

चकाचक रस्त्यावर पाचच महिन्यांत टिकाव!

By admin | Updated: September 18, 2014 23:22 IST

येरे माझ्या मागल्या : जुनी जलवाहिनी दुरुस्तीसाठी पालिकेने खोदला रस्ता

सातारा : शहरातील गल्लीबोळातील रस्त्याची चाळण झाल्याने सातारकर दोन वर्षांपासून हैराण झाले होते. त्यानंतर पालिकेने सर्वच प्रमुख रस्त्याचे डांबरीकरण केले; पण हे सुख सातारकरांना फार काळ मिळेल, असे वाटत नाही. जुन्या जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी चक्क पाच महिन्यांतच डांबरी रस्त्यावर टिकाव मारला आहे. चारही बाजूंना डोंगराने वेढलेल्या सातारा शहराला वाढण्यास फार वावच मिळालेला नाही. त्यामुळे वरचा बोगदा, राजपथ व खालचा रस्ता तसेच राधिका रोड या मार्गावरच शहर विभागले गेले आहे. त्याचप्रमाणे सातारा शहरातील सरासरी पर्जन्यमानही चांगले असल्याने उतारावरून मोठ्या वेगाने पाणी वाहत असते. त्यामुळे रस्त्याची चाळण लवकरच होत असते.सर्वच रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे सातारकर तीन-चार वर्षांपासून वैतागले होते. रस्त्यासाठी ठिकठिकाणी आंदोलने झाली होती. काही सामाजिक संघटनेने याकडे लक्ष वेधण्यासाठी चक्क खड्ड्यांचा वाढदिवस साजरा करणे, रस्त्यातील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करण्यासाठी अनोखे आंदोलने केली होती. तर काही वेळा रस्त्यावरील खड्डे मोजण्याची मोहीम राबविली गेली होती. सरतेशेवटी पालिकेने शहरातील सर्वच रस्त्यांचे डांबरीकरणाचे काम एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात हाती घेण्यात आले. डांबरीकरणामुळे चकाचक झालेल्या रस्त्यावर गाड्या सुसाट धावत होत्या; पण सातारकरांचे हे सुख फार टिकेल, असे वाटत नाही. डांबरीकरणापूर्वी सर्वच भागात पाणीपुरवठ्यासाठी नवीन जलवाहिनी टाकण्यात आली होती. तसेच या योजनेची चाचणीही घेण्यात येत होती. तत्पूर्वी नवीन नळजोडण्या घेण्यासंदर्भात सूचना करून सातारकारंना मुदत दिली होती. तरीही या ठिकाणी जुन्या जलवाहिनीतून पाणीपुरवठा केला जात आहे. खालच्या रस्त्यावर शेटे चौकाजवळील नकाशपुरा भागात जुन्याच जलवाहिनीतून पाणीपुरवठा केला जात आहे. या ठिकाणी काही दिवसांपासून पाणी येत नाही. त्यामुळे जलवाहिनी दुरुस्तीसाठी पालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांनी खड्डे खोदण्यास सुरुवात केली आहे. पोलीस मुख्यालयापासून जागोजागी खोदकाम करून जुनी जलवाहिनी तपासली जात आहे. त्यामुळे जलवाहिनीचे काम झाल्यानंतर पूर्ववत रस्ता करावा, अशी मागणी सातारकरांमधून होत आहे. (प्रतिनिधी)या खड्ड्यांचे प्रायोजकनुकताच साजरा झालेल्या गणेशोत्सवात खालच्या रस्त्यावर विद्युत रोषणाई व जाहिरात फलक लावण्यासाठी रस्त्याच्या कडेलाच खड्डे खोदून बांबू रोवण्यात आले होते. हे करत असताना ‘बीएसएनएल’ची जमिनीतील केबल तुटली गेली. त्यामुळे विस्कळीत झालेली सेवा पूर्ववत करण्यासाठी ‘बीएसएनएल’ला खड्डे खोदावे लागले होते.